शहरं
Join us  
Trending Stories
1
"वायफळ बडबड करू नका..."; राऊतांचा दावा काँग्रेसनेच खोडला, ठाकरे गटालाही फटकारलं
2
संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न
3
“जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील
4
शरद पवारांना दुहेरी धक्का; २ अत्यंत विश्वासू शिलेदार पक्षाची साथ सोडणार?
5
“सहाव्या टप्प्यात इंडिया आघाडीने २७२ जागांचा आकडा गाठला, भाजपाचा पराभव निश्चित”: काँग्रेस
6
१ जूनपासून गॅस सिलेंडर ते बँकिंगचे नियम बदलणार; थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार
7
Cyclone Remal: 'रेमल' चक्रीवादळ आज बंगालमध्ये धडकणार, एनडीआरएफचे पथक सतर्क; महाराष्ट्रावर परिणाम होणार?
8
“पंतप्रधान मोदींची भाषा अन् भाजपाच्या जागा दोन्ही सातत्याने घसरत चालल्या आहेत”: राहुल गांधी
9
“PM मोदींची १०० वेळा जगभ्रमंती, उद्धव ठाकरे परदेशात गेले तर पोटात का दुखते”; राऊतांची टीका
10
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
11
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
12
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
13
"नशिबाने माझ्या नावाचा कोणी सुलतान नव्हता, नाहीतर...", नावावरून ट्रोल करणाऱ्यांना आस्ताद काळेने सुनावलं
14
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
15
Hardik-Natasa Divorce : हार्दिक पांड्याबरोबरच्या घटस्फोटाच्या चर्चांवर नताशाने दोन शब्दात दिलं उत्तर, म्हणाली...
16
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
17
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
18
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
19
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
20
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल

वढूतील घटनेची चौकशी व्हावी! - मराठा क्रांती मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2018 3:38 AM

वढू येथील घटनेची सखोल चौकशी करून त्याच्या मुळाशी असणाºयांवर कडक कारवाई करावी, यावरून झालेल्या हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाच्या कुटुंबीयांना सरकारने २५ लाख रुपयांची भरपाई द्यावी, अशा मागण्या करतानाच मराठा समाजाला शांतता राखण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे.

पुणे - वढू येथील घटनेची सखोल चौकशी करून त्याच्या मुळाशी असणाºयांवर कडक कारवाई करावी, यावरून झालेल्या हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाच्या कुटुंबीयांना सरकारने २५ लाख रुपयांची भरपाई द्यावी, अशा मागण्या करतानाच मराठा समाजाला शांतता राखण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे.वढूतील घटनेनंतर दोन समाजांतील गट समोरासमोर उभे राहिल्याचे चित्र निर्माण झाले आहे. बुधवारी विविध संघटनांनी राज्यव्यापी बंद पुकारला होता. या पार्श्वभूमीवर, मराठा क्रांती मोर्चाची बैठक शिवाजीनगर येथे झाली. तीत मराठा समाजाला कायदा-सुव्यवस्था राखण्याबाबत आवाहन करणारा ठराव झाला. संघटनेचे शांताराम कुंजीर, राजेंद्र कोंढरे, धनंजय जाधव, तुषार काकडे या वेळी उपस्थित होते. वढू येथे उसळलेल्या संघर्षात शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई येथील एका तरुणाला जीव गमवावा लागला. कोरेगाव भीमा व नगर रस्त्यावरील नागरिकांच्या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.ग्रामस्थांनी पूर्वकल्पना देऊनही पोलीस प्रशासनाने योग्य खबरदारी घेतली नाही. अशा पोलीस अधिकाºयांवर कारवाई करावी, समाजमाध्यमांद्वारे तेढ निर्माण करणाºयांना अटकाव करावा, अशा मागण्या मोर्चाने केल्या.सर्वांनीच राज्यघटनेचे पालन करावे, कायदा हातात घेऊ नये, शासकीय मालमत्तेचे नुकसान करू नये, असे आवाहन या वेळी करण्यात आले.बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी हालअपेष्टा सोसणाºया क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी राज्यातील शाळा-महाविद्यालयेबंद राहिली, याचा खेद व्यक्त करण्यात आला.यातील मृतांच्या वारसांना२५ लाख रुपये द्यावेत आणि मालमत्तेची नुकसानभरपाई मिळावी, अशा मागण्या मराठा मोर्चाच्या वतीने करण्यात आल्या. दंगलखोरांना शोधून त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

टॅग्स :Maharashtra Bandhमहाराष्ट्र बंद