शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

नदी स्वच्छतेसाठी एकवटले प्रशासन, स्वयंसेवी संस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2019 13:35 IST

केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानामध्ये शहरामधून वाहणाऱ्या नद्या, ओढे-नाल्यांची स्वच्छता हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे.

ठळक मुद्देआयुक्त सौरभ राव यांनी केली रामनदी व बावधान येथील जिवंत झ-याची पाहणीविठ्ठल वाडी व अन्य ठिकाणी काही प्रमाणात काम सुरु

पुणे: शहराच्या जीवनवहिन्या म्हणून ओळख असलेल्या मुळा-मुठा व रामनदीला पुन्हा पूर्वीचे रुप देण्यासाठी व नद्यांच्या स्वच्छतेसाठी आता महापालिका प्रशासन, विविध स्वयंसेवी संस्था आणि नागरिक एकत्र आले आहे. रविवार (दि.२) रोजी आयुक्त सौरभ राव यांनी आपल्या संबंधित सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी नदी, पर्यावरण, पाणी यादी विषयांवर काम करणा-या विविध संस्थांचे प्रतिनिधी आणि स्थानिक नागरिकांनी मिळून औंध-बावधान येथील रामनदी पात्र आणि येथील जिवंत झ-याला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी नदी स्वच्छतेसाठी स्वयंसेवी संस्थाच्या मदतीने महापालिकेचे सर्व विभागाचे अधिकारी एकत्र येऊन ठोस उपाय-योजना करतील, असे आश्वासन राव यांनी यावेळी दिले.    केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानामध्ये शहरामधून वाहणाऱ्या नद्या, ओढे-नाल्यांची स्वच्छता हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. यामुळेच महापालिका प्रशासनाने यावेळी शहरातील प्रामुख्याने मुळा-मुठा, रामनदीच्या स्वच्छचेसाठी मोठी मोहिम हाती घेतली आहे. यासाठी आयुक्तांनी संबंधित सर्व स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधी यांची बैठक घेऊन स्वच्छ सर्वेक्षण, महापालिका करत असलेल्या उपाय-योजना व संस्थांकडून अपेक्षित कामांची माहिती दिली. यावेळी संस्थेच्या प्रतिनिधीने आयुक्तांना स्वत: काही ठिकाणी भेट देऊन पाहणी करण्याची मागणी केली. त्यानुसार गेल्या पंधरा-वीस दिवसांपासून दर रविवारी आयुक्त विविध ठिकाणी भेट देऊन नदी किनार, तेथे करावी लागणारी कामे याची माहिती घेत आहे. याचाच एक भाग म्हणून रविवार (दि.२) रोजी औंध, बावधन येथील रामनदीला भेट दिली.यावेळी जीवीत नदीच्या शैलजा देशपांडे, सागर मित्र, जल बिरादरीचे विनोद बावधनकर, जलदेवता सेवा अभियानाचे शैलेद्र पटेल, मिशन ग्राऊड वॉटरचे वैशाली पाटकर, रामनदी पुनरुज्जीवन करिता काम करणारे अनेक संस्थांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. तसेच महापालिकेचे विविध विभागाचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.    याबाबत जीवीत नदीच्या शैलजा देशपांडे यांनी सांगितले की, महापालिका प्रशासनाने स्वच्छ सर्वेक्षण अभियानामुळे तरी किमान आता नदी स्वच्छतेसाठी पाऊल उचचली आहेत. याबाबत आयुक्त राव सकारात्मक असून, त्यांनी दोन रविवार प्रत्येक्ष येऊन भेट दिली आहे. त्यानुसार विठ्ठल वाडी व अन्य ठिकाणी काही प्रमाणात काम सुरु केले असून, रामनदीसाठी आता पुढाकार घेतला आहे. महापालिका प्रशासन, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आणि महत्वाचे स्थानिक नागरिक एकत्र येऊन नदी स्वच्छतेचा विचार करत आहेत. यामुळे आपल्या शहरातील नद्यांमध्ये नक्कीच काहीतरी चांगला बदल घडले.

टॅग्स :PuneपुणेriverनदीSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानWaterपाणीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड