शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

शेतीपिकांवर अळी, मावा, तुडतुडे याचा प्रादुर्भाव, बळीराजाच्या चिंतेत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:07 IST

ढगाळ वातावरणामुळे शेतीपिकांवर अळी, मावा, तुडतुडे याचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. तरकारी पिकांवर तसेच फळभाज्या, पालेभाज्या, फळे यांवर हिरव्या, ...

ढगाळ वातावरणामुळे शेतीपिकांवर अळी, मावा, तुडतुडे याचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. तरकारी पिकांवर तसेच फळभाज्या, पालेभाज्या, फळे यांवर हिरव्या, पिवळ्या तसेच काळ्या माव्याचा पादुर्भाव दिसून येत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.

सततच्या ढगाळ हवामानामुळे कितीही औषधे मारली, तरीही मावा, अळी, तुडतुडे, तसेच सर्वच प्रकारच्या किडी आटोक्यात येण्याची शक्यता दिसत नाही. यामुळे बळीराजाच्या चिंतेत वाढ झाली आहे.

त्यातच कोरोना मारामारीमुळे ब्रेक द चेन अंतर्गत शनिवार आणि रविवारी संपूर्ण मार्केट बंद ठेवण्यात येत आहे. परिणामी, दोन दिवसांत न तुटलेला शेतमाल याचबरोबर इतर पाच दिवसांत रखडलेल्या तोडणीयोग्य शेतमालाची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने तसेच किरकोळ विक्रेत्यांना फक्त सकाळी सात ते अकरा याच वेळेत विक्रीसाठी परवानगी असल्याने त्याचा परिणाम बाजारपेठेवर होत असून यामुळे शेतमालाचे बाजारभाव कोसळले आहेत. याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. सकाळी फक्त चार तास मालाची विक्री करता येत असल्याने खरेदीदार व्यापारी थोड्याच प्रमाणात मालाची खरेदी करत आहेत. कडक उन्हाळा असल्यान उत्पादन कमी निघत आहे. तर दुसरीकडे संपूर्ण मालाची विक्री होत नाही .पिकांचा उत्पादन खर्च वाढलेला आहे. एकीकडे शेतमालाला बाजारभाव नाही आणि दुसरीकडे औषधे व औषध फवारणीच्या वाढीव खर्चाने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. तसेच कांदा पिकावर करप्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. तसेच उसावर लोकरी मावा दिसून येत आहे. त्यातच हवामान खात्याने अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त केल्याने बळीराजा धास्तावला आहे. गेल्या वर्षभरापासून शेतकऱ्यांवर एकामागून एक संकट येत असल्याने बळीराजा पूर्णपणे मेटाकुटीला आला आहे. शेतकऱ्यांची काही संकटे संपण्याची चिन्हे दिसत नाहीत.शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लावावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.