शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
4
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
5
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
6
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
7
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
8
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
9
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
10
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
11
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
12
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
13
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
14
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
15
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
16
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
17
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
18
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
19
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
20
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?

शेतीपिकांवर अळी, मावा, तुडतुडे याचा प्रादुर्भाव, बळीराजाच्या चिंतेत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:07 IST

ढगाळ वातावरणामुळे शेतीपिकांवर अळी, मावा, तुडतुडे याचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. तरकारी पिकांवर तसेच फळभाज्या, पालेभाज्या, फळे यांवर हिरव्या, ...

ढगाळ वातावरणामुळे शेतीपिकांवर अळी, मावा, तुडतुडे याचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. तरकारी पिकांवर तसेच फळभाज्या, पालेभाज्या, फळे यांवर हिरव्या, पिवळ्या तसेच काळ्या माव्याचा पादुर्भाव दिसून येत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.

सततच्या ढगाळ हवामानामुळे कितीही औषधे मारली, तरीही मावा, अळी, तुडतुडे, तसेच सर्वच प्रकारच्या किडी आटोक्यात येण्याची शक्यता दिसत नाही. यामुळे बळीराजाच्या चिंतेत वाढ झाली आहे.

त्यातच कोरोना मारामारीमुळे ब्रेक द चेन अंतर्गत शनिवार आणि रविवारी संपूर्ण मार्केट बंद ठेवण्यात येत आहे. परिणामी, दोन दिवसांत न तुटलेला शेतमाल याचबरोबर इतर पाच दिवसांत रखडलेल्या तोडणीयोग्य शेतमालाची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने तसेच किरकोळ विक्रेत्यांना फक्त सकाळी सात ते अकरा याच वेळेत विक्रीसाठी परवानगी असल्याने त्याचा परिणाम बाजारपेठेवर होत असून यामुळे शेतमालाचे बाजारभाव कोसळले आहेत. याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. सकाळी फक्त चार तास मालाची विक्री करता येत असल्याने खरेदीदार व्यापारी थोड्याच प्रमाणात मालाची खरेदी करत आहेत. कडक उन्हाळा असल्यान उत्पादन कमी निघत आहे. तर दुसरीकडे संपूर्ण मालाची विक्री होत नाही .पिकांचा उत्पादन खर्च वाढलेला आहे. एकीकडे शेतमालाला बाजारभाव नाही आणि दुसरीकडे औषधे व औषध फवारणीच्या वाढीव खर्चाने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. तसेच कांदा पिकावर करप्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. तसेच उसावर लोकरी मावा दिसून येत आहे. त्यातच हवामान खात्याने अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त केल्याने बळीराजा धास्तावला आहे. गेल्या वर्षभरापासून शेतकऱ्यांवर एकामागून एक संकट येत असल्याने बळीराजा पूर्णपणे मेटाकुटीला आला आहे. शेतकऱ्यांची काही संकटे संपण्याची चिन्हे दिसत नाहीत.शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लावावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.