शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
3
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
4
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
5
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
6
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
7
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
8
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
9
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
10
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
11
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
12
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
13
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
14
दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार : अजित पवार
15
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
16
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
17
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
18
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
19
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
20
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश

वेल्हे तालुक्यातील पानशेत धरणग्रस्तांचा स्वातंत्र्यदिनी जलसमाधीचा इशारा; ६० वर्षांनंतरही त्यांच्या नावावर नाहीत सातबारे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 18:59 IST

पानशेत धरण बांधण्यासाठी वांजळवाडी येथील 36 शेतकऱ्यांची 292 एकर क्षेत्र धरणात गेलेली आहे

ठळक मुद्दे १२ ऑगस्ट पूर्वी जर धरणग्रस्तांच्या नावे सातबारे झाले नाहीत तर स्वातंत्र्य दिनी १५ ऑगस्टला पुन्हा एकदा धरणग्रस्त जलसमाधी घेणार

मार्गासनी: साठ वर्षानंतर देखील सातबारे नावावर न झाल्याने वेल्हे तालुक्यातील पानशेत धरणग्रस्तांनी स्वातंत्र्यदिनी पुन्हा एकदा जलसमाधी घेण्याचा इशारा दिला आहे. यासंबंधीचे निवेदन तहसीलदार शिवाजी शिंदे, पोलीस निरीक्षक मनोज पवार यांना दिले आहे. 

धरणग्रस्तांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, पानशेत धरण बांधण्यासाठी वांजळवाडी येथील ३६ शेतकऱ्यांची २९२ एकर क्षेत्र धरणात गेलेली आहे. येथील ३६ धरणग्रस्तांसाठी हवेली तालुक्यातील नांदोशी येथे सहा एकर जागेमध्ये गावठाण वसलेले आहे. याठिकाणी धरणग्रस्त अनेक वर्षापासून राहत आहे. परंतु या जागेच्या सातबारा उताऱ्यावर अद्याप मूळ मालकांच्या नोंदी आहेत ही जमीन धरणग्रस्तांच्या किंवा शासनाच्या नावावर अद्याप झालेली नाही.

मूळ मालकांच्या नावावर ती या जमिनी आहेत. या जमिनी वर धरणग्रस्तांची नोंद होऊन सातबारे धरणग्रस्तांच्या नावावर झाले पाहिजेत ही मुख्य मागणी धरणग्रस्तांची आहे. यासाठी १२ जुलै पानशेत प्रलय दिनाच्या दिवशी जलसमाधी आंदोलनाचा इशारा धरणग्रस्त कडून देण्यात आला होता.

परंतु जिल्हाधिकारी व धरणग्रस्त यांच्या मध्ये झालेल्या चर्चेमुळे आणि कोरोना महामारीच्या अनुषंगाने सामाजिक भान ठेवत धरणग्रस्तांनी जलसमाधी आंदोलन रद्द केले. १२ ऑगस्ट पूर्वी जर धरणग्रस्तांच्या नावे सातबारे झाले नाहीत तर स्वातंत्र्य दिनी १५ ऑगस्टला पुन्हा एकदा धरणग्रस्त जलसमाधी घेणार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.  

टॅग्स :Puneपुणेbhor-acभोरDamधरणSocialसामाजिकPoliceपोलिसGovernmentसरकार