शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
3
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
4
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
5
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
6
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
7
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
8
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
9
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
10
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
11
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
12
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
13
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
14
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
15
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
16
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
17
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
18
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
19
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
20
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार

वेल्हे तालुक्यातील पानशेत धरणग्रस्तांचा स्वातंत्र्यदिनी जलसमाधीचा इशारा; ६० वर्षांनंतरही त्यांच्या नावावर नाहीत सातबारे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 18:59 IST

पानशेत धरण बांधण्यासाठी वांजळवाडी येथील 36 शेतकऱ्यांची 292 एकर क्षेत्र धरणात गेलेली आहे

ठळक मुद्दे १२ ऑगस्ट पूर्वी जर धरणग्रस्तांच्या नावे सातबारे झाले नाहीत तर स्वातंत्र्य दिनी १५ ऑगस्टला पुन्हा एकदा धरणग्रस्त जलसमाधी घेणार

मार्गासनी: साठ वर्षानंतर देखील सातबारे नावावर न झाल्याने वेल्हे तालुक्यातील पानशेत धरणग्रस्तांनी स्वातंत्र्यदिनी पुन्हा एकदा जलसमाधी घेण्याचा इशारा दिला आहे. यासंबंधीचे निवेदन तहसीलदार शिवाजी शिंदे, पोलीस निरीक्षक मनोज पवार यांना दिले आहे. 

धरणग्रस्तांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, पानशेत धरण बांधण्यासाठी वांजळवाडी येथील ३६ शेतकऱ्यांची २९२ एकर क्षेत्र धरणात गेलेली आहे. येथील ३६ धरणग्रस्तांसाठी हवेली तालुक्यातील नांदोशी येथे सहा एकर जागेमध्ये गावठाण वसलेले आहे. याठिकाणी धरणग्रस्त अनेक वर्षापासून राहत आहे. परंतु या जागेच्या सातबारा उताऱ्यावर अद्याप मूळ मालकांच्या नोंदी आहेत ही जमीन धरणग्रस्तांच्या किंवा शासनाच्या नावावर अद्याप झालेली नाही.

मूळ मालकांच्या नावावर ती या जमिनी आहेत. या जमिनी वर धरणग्रस्तांची नोंद होऊन सातबारे धरणग्रस्तांच्या नावावर झाले पाहिजेत ही मुख्य मागणी धरणग्रस्तांची आहे. यासाठी १२ जुलै पानशेत प्रलय दिनाच्या दिवशी जलसमाधी आंदोलनाचा इशारा धरणग्रस्त कडून देण्यात आला होता.

परंतु जिल्हाधिकारी व धरणग्रस्त यांच्या मध्ये झालेल्या चर्चेमुळे आणि कोरोना महामारीच्या अनुषंगाने सामाजिक भान ठेवत धरणग्रस्तांनी जलसमाधी आंदोलन रद्द केले. १२ ऑगस्ट पूर्वी जर धरणग्रस्तांच्या नावे सातबारे झाले नाहीत तर स्वातंत्र्य दिनी १५ ऑगस्टला पुन्हा एकदा धरणग्रस्त जलसमाधी घेणार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.  

टॅग्स :Puneपुणेbhor-acभोरDamधरणSocialसामाजिकPoliceपोलिसGovernmentसरकार