शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

यंदा इंदापूरला भासणार नाही पाण्याची चणचण; उन्हाळा तालुक्याला लाभदायक ठरणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2020 15:45 IST

यावर्षी शेती, पिण्याच्या पाण्याचा व जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न भेडसावणार नाही..

ठळक मुद्देइंदापुर तालुक्यात खडकवासला धरणसाखळी व भाटघर, विर धरणाच्या माध्यमातून पाणी..

इंदापुर (कळस) : गेल्या वर्षी परतीच्या पावसाने अतिवृष्टी झाल्याने शेतकरी व नागरिकांना मोठा फटका बसला. मात्र, या पावसामुळे अर्धवट राहिलेली धरणे ओव्हरफ्लो झाली त्यामुळे पुणे जिल्ह्यातील सर्वच धरणांमध्ये चांगला पाणीसाठा राहिला. यामुळे इंदापुर तालुक्याला मोठा दिलासा मिळाला आहे. ऐन उन्हाळ्यात खडकवासला, निरा डावा कालव्यावरील आवर्तने चालु राहिली. पिण्याच्या पाण्यासाठी गेल्यावर्षी तब्बल ६६ टँकर होते. यंदा मात्र मुबलक पाण्यामुळे टँकरची गरज भासणार नाही. त्यामुळे यंदाचा उन्हाळा तालुक्याला लाभदायक ठरणार आहे.इंदापुर तालुक्यात सिंचनासाठी खडकवासला धरणसाखळी व भाटघर, विर धरणाच्या माध्यमातून पाणी येते. तसेच उजनी जलाशयावरुन मोठ्या प्रमाणावर सिंचन होते. या सर्व धरणांमध्ये चांगला पाणीसाठा शिल्लक आहे.  त्यामुळे खडकवासला कालवा व निरा डावा कालव्यावरील यावर्षी शेतीसिंचनाचा व पिण्याच्या पाण्याचा व जनावरांना पाण्याचा प्रश्न भेडसावणार नाही.  इंदापुर तालुका हा रब्बीचा तालुका म्हणून ओळखला जातो. मान्सून पुर्व व मान्सुन पाऊस तालुक्यात नेहमी कमीच प्रमाणात होतो. हमखास टँकरची मागणी असणाऱ्या इंदापुर तालुक्यात उन्हाळ्याचे काही महिने पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. गतवर्षी सुमारे ६६ टँकरच्या माध्यमातून दररोज २१० खेपा करुन पाणीपुरवठा करण्यात येत होता. यामध्ये ४४ गावे व ६१ वाड्यावस्तीवरील १ लाख ३० हजार ३९५ लोकसंख्येचा समावेश होता. तसेच ७०९९ जनावरांना देखील पाणी पुरवठा करण्यात येत होता, त्याचबरोबर १० विहीरी व ९ बोअरवेल अधिग्रहीत करण्यात आले होते. मात्र, यंदा पाण्याच्या मुबलकतेमुळे टँकरच्या पाण्याची मागणी झालेली नाही.  अद्याप एकही टँकर मागणीचा प्रस्ताव प्रशासनाकडे आलेला नाही. तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ४५० मिलीमीटर आहे. मागील वर्षी पावसाने ही सरासरी ओलांडली होती त्यामुळे यंदा पाण्याची टंचाई भासणार नाही. सध्या जिल्हात भोर, हवेली, जुन्नर, खेड, आंबेगाव  या पाच तालुक्यात २१ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मात्र, पावसाळा सुरू होण्यास एक महिन्याचा कालावधी राहीला असल्याने इंदापुर तालुक्यात नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. .................. टँकर मागणीचे प्रस्ताव पंचायत समितीकडे अजुन तरी आले नाहीत. मान्सुनने ओढ दिली तर जुनमध्ये अडचण येईल. मात्र, सध्या तरी तालुक्यात टँकर मागणी नाही. गेल्यावर्षी ६६ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. यावर्षी समाधानकारक परिस्थिती स्थिती आहे. दाऊद शेख,सहाय्यक अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, पंचायत समिती,इंदापुर

टॅग्स :IndapurइंदापूरFarmerशेतकरीWaterपाणीRainपाऊसDamधरण