शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

सोशल मीडियामुळे जनजागृतीत वाढ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2019 23:00 IST

सोशल माध्यमे हे दुधारी शस्त्र...

ठळक मुद्देगुन्हेगाराचा शोध घेण्याकरिता असलेल्या साधनसामुग्रीचा तुटवडा याने प्रश्न आणखी गंभीर

अ‍ॅड. सुप्रिया कोठारी - सोशल माध्यमांचा वाढता वापर यामुळे महिला अत्याचारात वाढ होते आहे असे म्हणणे चुकीचे ठरेल. याचे कारण म्हणजे आपण त्या माध्यमाचा कशापद्धतीने वापर करतो हे आहे. याउलट फेसबूक, व्हाट्सअप सारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजात जनजागृती वाढत आहे असे आवर्जून सांगावेसे वाटते.आजकाल सगळ्याच गोष्टी सोशल मीडियावर पोस्ट केल्या जात आहेत. याचा परिणाम संबंधित व्यक्ती तिच्या संपकार्तील इतर व्यक्ती एकूणच तिच्या व्यक्तिमत्त्वावर होत असल्याचे दिसून येते. पूर्वी आपल्या ओळखीची चार दोन माणसे त्यांच्याबरोबरचा रोजचा होणारा संवाद एवढी काय ती आपली सोशल होण्याची मर्यादा होती. आता त्याचा परीघ बराचसा विस्तारला आहे. मागील काही दिवसांपूर्वी चर्चेत असणाऱ्या  ‘मी टू’ च्या चळवळीला सोशल मीडियावर मिळालेला प्रतिसाद खुप काही सांगणारा होता. सोशल माध्यमे हे दुधारी शस्त्र असून त्याची परिणामकारकता वापरकर्त्यावर अवलंबून आहे. हे प्रामुख्याने लक्षात घेण्याची गरज आहे. अमुक एखादी व्यक्ती ज्यावेळी फेसबुकवर दुसऱ्या अनोळखी व्यक्तीच्या संपर्कात येते तेव्हा तिने सावध भूमिका घेणे गरजेचे आहे. आपण त्या व्यक्तीशी काय बोलतो, तिला कुठली माहिती सांगतो इतकेच नव्हे तर आपले जी वैयक्तिक गोष्ट आहे त्याबद्दल सांगतो तेव्हा ते आपल्याकरिता धोकादायक ठरणार असते. हे आपल्याला त्यावेळी समजत नाही. दुसरी महत्वाची बाब म्हणजे आपल्या पोलीस प्रशासनाला सायबर गुन्हयांविषयी असलेली अपुरी माहिती हे आहे. सर्वसामान्य महिलेला ज्यावेळी आपली फेसबुक अथवा व्हाटसअपच्या माध्यमातून बदनामी, फसवणूक झाली आहे असे समजते तेव्हा काय करावे, कुणाकडे तक्रार द्यावी याविषयी तिला कुठल्याही स्वरुपाची माहिती नसते. अशावेळी ती पोलीसांकडून सहकार्य मिळेल अशा अपेक्षेत असताना प्रत्यक्षात पोलीसांक डे असलेली अपुरी माहिती, गुन्हेगाराचा शोध घेण्याकरिता असलेल्या साधनसामुग्रीचा तुटवडा याने प्रश्न आणखी गंभीर होतो.  मुळातच स्वत:ला जास्तीत जास्त प्रकाशझोतात आणण्याच्या निमित्ताने आपण कशापध्दतीने या माध्यमांवर व्यक्त होतो हे सर्वांनी तपासून पाहणे गरजेचे आहे. हे सुचवावेसे वाटते. आभासी दुनियेत किती काळ रमायचे? त्याला कितपत महत्व द्यायचे? या सर्व गोष्टी आपल्याच हातात आहेत........

प्रगती पाटील, अ‍ॅडव्होकेट आणि सामाजिक कार्यकर्त्या महिलांवरील अत्याचारांसाठी सोशल मीडियाला जबाबदार धरू शकत नाही. तेलंगणा किंवा निर्भया प्रकरणातील बलात्काराच्या घटना पाहिल्या तर आरोपी हे सुशिक्षित नाहीत असे दिसते. त्यांची पार्श्वभूमी चांगली नाही. त्यांच्या मनात विकृती आहे. त्यांच्यात संस्कृतपणा नाही. या घटनांसाठी सोशल मीडिया नव्हे तर ती व्यक्ती जबाबदार असते. सोशल मीडियाला काही अंशी यासाठी जबाबदार धरता येईल की महिला त्यांचे फोटो मीडियावर अपलोड करताना काळजी घेत नाहीत. त्याचा गैरवापर होऊ शकतो हेच त्यांना कळत नाही. इंटरनेटचा वापर चुकीच्या पद्धतीने होता कामा नये. पण दुसऱ्या बाजूला विचार केला तर सोशल मीडियामुळे एखाद्या घटनेबददल दबाव गटही निर्माण होऊ शकतो. सोशल मीडियाचा शस्त्र म्हणूनही विधायक कामासाठी वापर होऊ शकतो. एखादा चांगला संदेश दोन मिनिटात सर्वत्र पोहोचू शकतो. हे देखील लक्षात घेतले पाहिजे..       

 

टॅग्स :PuneपुणेadvocateवकिलSocial Mediaसोशल मीडिया