शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

जिल्ह्यात वाढली टंचाईची दाहकता

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 2:42 AM

एकूण ३८ टँकरनी पाणीपुरवठा : बारामतीत १५, तर शिरूरमध्ये ११ टँकर, पुणे विभागातील १०० गावांत १०० टँकर

पुणे : दुष्काळाची दाहकता वाढू लागली असून, पुणे विभागातील १०० दुष्काळी गावांमध्ये १०० टँकरनी पाणीपुरवठा केला जात आहे. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात सर्वाधिक ३१, तर पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात १५ आणि शिरूरमध्ये ११ टँकर सुरू आहेत. विभागातील १ लाख ८२ हजार २६० नागरिक दुष्काळाने बाधित असून, बाधित जनावरांची संख्या १९ हजार ९०१ आहे. पुणे जिल्ह्यातील टँकरची संख्या ३० वरून ३८ झाली आहे.पुणे विभागातील सातारा, सांगली, पुणे व सोलापूर या जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस टँकरची संख्या वाढत चालली आहे. विभागात ६ डिसेंबर रोजी ९१ टँकर सुरू होते, तर १० डिसेंबर रोजी टँकरची संख्या १०० वर गेली. सध्या १०० गावे आणि ६७६ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. साताऱ्यात ३९, पुण्यात ३८, सांगलीत १८ आणि सोलापूर जिल्ह्यात ५ टँकर सुरू आहेत.पुणे विभागातील सातारा जिल्ह्यात माणमध्ये ३१, खटावमध्ये ५ तर कोरेगावमध्ये १ आणि फलटण येथे २ टँकर सुरू आहेत. जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागली आहे. अनेक गावांत तसेच वाड्यावस्त्यांत पाण्याची कायमस्वरूपी सोय नसल्याने टँकरच्या मागणीत वाढ होऊ लागली आहे. जिल्ह्यात जवळपास सहा तालुक्यांतील २५ गावे आणि २७१ वाड्यावस्त्यांमधील ७२ हजार ९५९ गावांना ३८ टँकरनी पाणीपुरवठा केला जात आहे. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच दुष्काळाची दाहकता वाढली आहे.भविष्यात या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील जवळपास १२ गावे तसेच १३१ वाड्यावस्त्यांवर १५ टँकरनी पाणीपुरवठा सध्याच्या स्थितीत सुरू आहे. बारामातीपाठोपाठ शिरूरमध्ये सर्वाधिक ११ टँकर सुरू आहेत. शिरूर तालुक्यातील ५ गावे आणि ४६ वाड्यावस्त्यांना टँकरने पाणी पुरवले जात आहे.दौंड तालुक्यातील ७ गावे आणि ६३ वाड्यावस्त्यांसाठी ७ टँकर सुरू करण्यात आले आहेत. तसेच, पुरंदर व जुन्नरमध्ये प्रत्येकी २ आणि आंबेगावमध्ये १ असे एकूण ३८ टँकर सुरू आहेत. सांगलीत खानापूर येथे ३, आटपाडीत ८, जतमध्ये ४, कवठे महांकाळ येथे २ आणि तासगाव येथे १ टँकर सुरू आहे. तसेच, सोलापूर जिल्ह्यात माढा येथे ३ आणि करमाळा तालुक्यात २ टँकर सुरू आहेत.जिल्ह्यात धरण परिसरात समाधानकारक पाऊस झाल्याने धरणे जवळपास भरली. मात्र, शेतीसाठी आवश्यक असा पाऊस न झाल्याने आजही अनेक तालुक्यांतील नद्या तसेच तलाव कोरडे पडले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दुष्काळाची दाहकता वाढली आहे. राज्यभरात प्रशासनाने दुष्काळी स्थिती जाहीर केली आहे. सुरुवातीला ९ टँकरद्वारे जिल्ह्यात पाणीपुरवठा सुरू होता. मात्र, यात वाढ झाली असून ही संख्या ३८वर पोहोचली आहे.जिल्ह्यात ७२ हजार ९५९ नागरिकांची तहान टँकरवरपुणे जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत आहे. जवळपास ६ तालुक्यांतील २५ गावे आणि २७१ वाड्यावस्त्यांवरील ७२ हजार ९५९ नागरिकांची तहान ही टँकरच्या पाण्याने भागवली जात आहे. डिसेंबर महिन्यातच ही स्थिती असल्याने भविष्यात टँकरच्या मागणीत आणखी वाढ होणार आहे. 

टॅग्स :water shortageपाणीटंचाईPuneपुणे