शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
3
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
4
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
5
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
6
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
7
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
8
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
9
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
10
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
11
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
12
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
13
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
14
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
15
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
16
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
17
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
18
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
19
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
20
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाच्या झळांत वाढ : खेड तालुक्यात पशुधन विक्रीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 00:27 IST

खेड तालुक्याच्या पूर्व भागात यंदाच्या वर्षी पावसाने पाठ फिरवली असल्याने नदी-नाले कोरडेठाक पडले आहेत. जनावरांचा चारा प्रश्न निर्माण झाल्याने अनेक पशुपालकांनी पशुधनाची विक्री करण्यास सुरुवात केली आहे.

दावडी - खेड तालुक्याच्या पूर्व भागात यंदाच्या वर्षी पावसाने पाठ फिरवली असल्याने नदी-नाले कोरडेठाक पडले आहेत. जनावरांचा चारा प्रश्न निर्माण झाल्याने अनेक पशुपालकांनी पशुधनाची विक्री करण्यास सुरुवात केली आहे. मात्र भावही चांगला मिळत नसल्याने चाऱ्याअभावी जनावरांचे होणारे हाल सहन होत नसल्याने पशुपालकांना कमी भावात जनावरांची विक्री करावी लागत आहे.खेड तालुक्याच्या पूर्व भागात मोठ्या प्रमाणावर दुष्काळी संकट निर्माण झाले आहे. एवढी दुष्काळी झळाची परिस्थिती निर्माण होऊनही स्थानिक प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. प्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. गेल्या पाच वर्षांतील यंदाचा दुष्काळ भयानक आहे. विहिरी, बोअरवेल यांच्यात उपलब्ध थोड्याफार पाण्यावर मदार आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.पूर्व भागातील चिंचबाईवाडी, टाकळकरवाडी, चौधरवाडी, कनेरसर, वरुडे, वाफगाव, वाकळवाडी, गुळाणी, गोसासी या गावांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. परिसरात दिवसेंदिवस दुष्काळ उग्र रूप धारण करत असतानाच पशुधनाच्या चाºयाबरोबरच पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. पशुधन पालक अडचणीत सापडला आहे. आता जनावरांना काय काय खायला घालायचे हा प्रश्न शेतकºयांसमोर आहे म्हणून शेतकरी आपल्या पशुधनाची विक्री बेभाव करीत आहे. परिसरातील कनेरसर मंडळ दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर झाले असून, परंतु सध्या स्थितीला जनावरांच्या चाºयाचा आणि पाण्याचा प्रश्न सोडण्यासाठी शासनाने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.सध्या स्थितीला जनावरांना शेतातील उपलब्धतेनुसार चारा खाऊ घातला जात आहे. परंतु आता शेतीच्या मशागतीचे काम संपले असताना दुष्काळ परिस्थितीमुळे दुभती जनावरे शेतीचे काम करणारे बैल कसे सांभाळायचे हा प्रश्न उभा राहिला आहे. काही शेतकरी जनावरे उपाशी मरू नये म्हणून बाहेरून हिरवा चारा विकत घेत आहेत. काही शेतकºयांकडे चारा नसल्यामुळे शेतकरी मिळेल त्या भावाने जनावरे विकू लागला आहे. दुष्काळ असल्यामुळे जनावरांच्या चाºयासाठी एका पेंडीला तीस रुपये मोजावे लागत आहे. एवढा खर्च कुठून करायचा, असा प्रश्न पशुपालकासमोर असल्याने शेतकरी जनावरांची बेभाव विक्री करत आहेत. परिसरात प्रत्येक ठिकाणी पाणीटंचाई भासत असून त्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची गरज निर्माण झाली आहे.मागील महिन्यात आमदार सुरेश गोरे, तहसीलदार सुचित्रा आमले पाटील व कृषी विभागाने या भागाचा दुष्काळी पाहणी दौरा केला होता. त्या वेळी मागेल त्या गावाला टँकर देऊ तसेच जेणेकरून जनतेची पाण्यासाठी पायपीट होणार नाही. चारा छावणी, दावणीला चारा पाणी देऊन मुक्या जनावरांचा चाराप्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप दुष्काळ कागदावरच आहे. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.नदी कोरडी; बंधाºयात अल्प पाणीसाठापूर्व भागातून जाणारी वेळ नदी कोरडी पडली आहे. अजून दुष्काळाचे सहा महिने कसे जाणार, अशी चिंता येथील शेतकºयांना सतावत आहे. वेळ नदीवरील वाफगाव येथील मातीच्या बंधाºयात तीस टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तोही शेतकरी पिकांसाठी पाण्याचा उपसा करीत आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाई या परिसरात होणार असल्याचे चित्र दिसत आहे. गुळाणी येथील तलावात वीस टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यामुळे येथेही पाणीटंचाई होणार आहे.जनावरांच्या किमतीत निम्म्याने घटबाजारात जनावरांची मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी येत असल्याने पशुधनाचेही दर उतरले आहेत. एरवी साठ ते सत्तर हजार रुपयांना मिळणारी बैलजोडी पंचवीस-तीस हजार रुपयांना मिळत आहे.

टॅग्स :droughtदुष्काळPuneपुणे