शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
2
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
3
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
4
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
5
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
6
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
7
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
8
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
9
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
10
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
11
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
12
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
13
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
14
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
17
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
18
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
19
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
20
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीत ‘ते’ स्वत:च भयभीत झालेत; राज्यमंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांचा राष्ट्रवादीला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2022 15:55 IST

ठळक मुद्दे- - २०२४ ला बारामतीत भाजपचा खासदार - कधीही पक्ष पाहून विकासकामे करत नाही

बारामती (पुणे) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात काम करण्याची पद्धत बदलली आहे. बारामतीत ज्यांच्या भितीची चर्चा होते, ते स्वत: भयभीत झाले आहेत. आमच्यासोबत राहिला नाहीत तर विकास होऊ न देण्याची भीती दाखवली जात आहे. ताकदीचा काहींना गर्व होता, विकासकामांत भेदभाव केला जात होता. चेहरा पाहून कामे करण्याची वेळ आता गेली आहे, असा टोला केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग आणि जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव न घेता लगावला.

बारामती लोकसभा मतदारसंघात लवकरच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा दुसरा दौरा होणार आहे. या दौऱ्याच्या पूर्वतयारीच्या पार्श्वभुमीवर पटेल यांचा लोकसभा मतदारसंघात दोन दिवसीय दौरा पार पडला. यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार राम शिंदे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, बाळासाहेब गावडे, पृथ्वीराज जाचक, रंजन तावरे, दिलीप खैरे, अविनाश मोटे, पांडूरंग कचरे, सतीश फाळके ,शिवाजी निंबाळकर, अभिराज देवकाते आदी उपस्थित होते.

२०२४ ला बारामतीत भाजपचा खासदार-

येथील भाजप कार्यलयात भाजप कार्यकर्ता मेळाव्यात पटेल बोलत होते. पटेल पुढे म्हणाले, अत्यंत कठीण परिस्थितीतून भाजप हा पक्ष पुढे आला आहे. आज देशभर पक्षाचा विजय रथ दौडतो आहे. देशातील अनेक राज्यात भाजप किंवा भाजप सहयोगी पक्षाचे सरकार आहे. २०२४ ला बारामतीतून कोणत्याही परिस्थितीत भाजपचा खासदार निवडून जाईल. भयमुक्त बारामती बनविण्याचा संकल्प याचवेळी पूर्णत्वाला जाईल. त्या खासदाराला जिल्हाधिकारी जेव्हा विजयी झाल्याचे प्रमाणपत्र देतील ते प्रमाणपत्र येथील जनतेच्या भयमुक्तीचे प्रमाणपत्र असेल. भयमुक्त तर तुम्ही त्यापूर्वीच झालेला असाल. परंतु प्रमाणपत्रामुळे त्यावर शिक्कामोर्तब झालेले असेल, असे पटेल म्हणाले.

कधीही पक्ष पाहून विकासकामे करत नाही-

भाजपमध्ये केंद्रीय अध्यक्षपासून ते शहराध्यक्षापर्यंतच्या कोणत्याही पदावर सामान्य व्यक्तीला संधी मिळू शकते. इतर पक्षांमध्ये अशी नेतृत्व बदलाची ताकद नाही. आम्ही कधीही पक्ष पाहून विकासकामे करत नाही. कोणत्या जाती-धर्माचे सरकार आहे हे बघत नाही. जी योजना आणतो ती समाजातील प्रत्येक गरजूला मिळाली पाहिजे, याचा विचार भाजपकडून केला जातो.

'मविआने उत्तर दिले पाहिजे'-

महाराष्ट्रात ३८ टक्के जनेतला नळाद्वारे पाणी मिळत होते. २०१९ ला जलजीवन मिशनची सुरुवात करण्यात आली. त्यावेळी २०२२ ला ही आकडेवारी ७१ टक्क्यांवर गेली. दुसरीकडे शेजारील गोवा राज्यात भाजपचे सरकार होते. तेथे १०० टक्के नागरिकांना नळाद्वारे पाणी मिळाले. महाराष्ट्रात हे का घडू शकले नाही, याचे उत्तर मागील महाविकास आघाडी सरकारने द्यावे, असा टोला देखील पटेल यांनी लगावला.

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारSupriya Suleसुप्रिया सुळे