शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

बारामतीत ‘ते’ स्वत:च भयभीत झालेत; राज्यमंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांचा राष्ट्रवादीला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2022 15:55 IST

ठळक मुद्दे- - २०२४ ला बारामतीत भाजपचा खासदार - कधीही पक्ष पाहून विकासकामे करत नाही

बारामती (पुणे) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात काम करण्याची पद्धत बदलली आहे. बारामतीत ज्यांच्या भितीची चर्चा होते, ते स्वत: भयभीत झाले आहेत. आमच्यासोबत राहिला नाहीत तर विकास होऊ न देण्याची भीती दाखवली जात आहे. ताकदीचा काहींना गर्व होता, विकासकामांत भेदभाव केला जात होता. चेहरा पाहून कामे करण्याची वेळ आता गेली आहे, असा टोला केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग आणि जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव न घेता लगावला.

बारामती लोकसभा मतदारसंघात लवकरच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा दुसरा दौरा होणार आहे. या दौऱ्याच्या पूर्वतयारीच्या पार्श्वभुमीवर पटेल यांचा लोकसभा मतदारसंघात दोन दिवसीय दौरा पार पडला. यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार राम शिंदे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, बाळासाहेब गावडे, पृथ्वीराज जाचक, रंजन तावरे, दिलीप खैरे, अविनाश मोटे, पांडूरंग कचरे, सतीश फाळके ,शिवाजी निंबाळकर, अभिराज देवकाते आदी उपस्थित होते.

२०२४ ला बारामतीत भाजपचा खासदार-

येथील भाजप कार्यलयात भाजप कार्यकर्ता मेळाव्यात पटेल बोलत होते. पटेल पुढे म्हणाले, अत्यंत कठीण परिस्थितीतून भाजप हा पक्ष पुढे आला आहे. आज देशभर पक्षाचा विजय रथ दौडतो आहे. देशातील अनेक राज्यात भाजप किंवा भाजप सहयोगी पक्षाचे सरकार आहे. २०२४ ला बारामतीतून कोणत्याही परिस्थितीत भाजपचा खासदार निवडून जाईल. भयमुक्त बारामती बनविण्याचा संकल्प याचवेळी पूर्णत्वाला जाईल. त्या खासदाराला जिल्हाधिकारी जेव्हा विजयी झाल्याचे प्रमाणपत्र देतील ते प्रमाणपत्र येथील जनतेच्या भयमुक्तीचे प्रमाणपत्र असेल. भयमुक्त तर तुम्ही त्यापूर्वीच झालेला असाल. परंतु प्रमाणपत्रामुळे त्यावर शिक्कामोर्तब झालेले असेल, असे पटेल म्हणाले.

कधीही पक्ष पाहून विकासकामे करत नाही-

भाजपमध्ये केंद्रीय अध्यक्षपासून ते शहराध्यक्षापर्यंतच्या कोणत्याही पदावर सामान्य व्यक्तीला संधी मिळू शकते. इतर पक्षांमध्ये अशी नेतृत्व बदलाची ताकद नाही. आम्ही कधीही पक्ष पाहून विकासकामे करत नाही. कोणत्या जाती-धर्माचे सरकार आहे हे बघत नाही. जी योजना आणतो ती समाजातील प्रत्येक गरजूला मिळाली पाहिजे, याचा विचार भाजपकडून केला जातो.

'मविआने उत्तर दिले पाहिजे'-

महाराष्ट्रात ३८ टक्के जनेतला नळाद्वारे पाणी मिळत होते. २०१९ ला जलजीवन मिशनची सुरुवात करण्यात आली. त्यावेळी २०२२ ला ही आकडेवारी ७१ टक्क्यांवर गेली. दुसरीकडे शेजारील गोवा राज्यात भाजपचे सरकार होते. तेथे १०० टक्के नागरिकांना नळाद्वारे पाणी मिळाले. महाराष्ट्रात हे का घडू शकले नाही, याचे उत्तर मागील महाविकास आघाडी सरकारने द्यावे, असा टोला देखील पटेल यांनी लगावला.

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारSupriya Suleसुप्रिया सुळे