शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

बारामतीत ‘ते’ स्वत:च भयभीत झालेत; राज्यमंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांचा राष्ट्रवादीला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2022 15:55 IST

ठळक मुद्दे- - २०२४ ला बारामतीत भाजपचा खासदार - कधीही पक्ष पाहून विकासकामे करत नाही

बारामती (पुणे) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात काम करण्याची पद्धत बदलली आहे. बारामतीत ज्यांच्या भितीची चर्चा होते, ते स्वत: भयभीत झाले आहेत. आमच्यासोबत राहिला नाहीत तर विकास होऊ न देण्याची भीती दाखवली जात आहे. ताकदीचा काहींना गर्व होता, विकासकामांत भेदभाव केला जात होता. चेहरा पाहून कामे करण्याची वेळ आता गेली आहे, असा टोला केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग आणि जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव न घेता लगावला.

बारामती लोकसभा मतदारसंघात लवकरच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा दुसरा दौरा होणार आहे. या दौऱ्याच्या पूर्वतयारीच्या पार्श्वभुमीवर पटेल यांचा लोकसभा मतदारसंघात दोन दिवसीय दौरा पार पडला. यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार राम शिंदे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, बाळासाहेब गावडे, पृथ्वीराज जाचक, रंजन तावरे, दिलीप खैरे, अविनाश मोटे, पांडूरंग कचरे, सतीश फाळके ,शिवाजी निंबाळकर, अभिराज देवकाते आदी उपस्थित होते.

२०२४ ला बारामतीत भाजपचा खासदार-

येथील भाजप कार्यलयात भाजप कार्यकर्ता मेळाव्यात पटेल बोलत होते. पटेल पुढे म्हणाले, अत्यंत कठीण परिस्थितीतून भाजप हा पक्ष पुढे आला आहे. आज देशभर पक्षाचा विजय रथ दौडतो आहे. देशातील अनेक राज्यात भाजप किंवा भाजप सहयोगी पक्षाचे सरकार आहे. २०२४ ला बारामतीतून कोणत्याही परिस्थितीत भाजपचा खासदार निवडून जाईल. भयमुक्त बारामती बनविण्याचा संकल्प याचवेळी पूर्णत्वाला जाईल. त्या खासदाराला जिल्हाधिकारी जेव्हा विजयी झाल्याचे प्रमाणपत्र देतील ते प्रमाणपत्र येथील जनतेच्या भयमुक्तीचे प्रमाणपत्र असेल. भयमुक्त तर तुम्ही त्यापूर्वीच झालेला असाल. परंतु प्रमाणपत्रामुळे त्यावर शिक्कामोर्तब झालेले असेल, असे पटेल म्हणाले.

कधीही पक्ष पाहून विकासकामे करत नाही-

भाजपमध्ये केंद्रीय अध्यक्षपासून ते शहराध्यक्षापर्यंतच्या कोणत्याही पदावर सामान्य व्यक्तीला संधी मिळू शकते. इतर पक्षांमध्ये अशी नेतृत्व बदलाची ताकद नाही. आम्ही कधीही पक्ष पाहून विकासकामे करत नाही. कोणत्या जाती-धर्माचे सरकार आहे हे बघत नाही. जी योजना आणतो ती समाजातील प्रत्येक गरजूला मिळाली पाहिजे, याचा विचार भाजपकडून केला जातो.

'मविआने उत्तर दिले पाहिजे'-

महाराष्ट्रात ३८ टक्के जनेतला नळाद्वारे पाणी मिळत होते. २०१९ ला जलजीवन मिशनची सुरुवात करण्यात आली. त्यावेळी २०२२ ला ही आकडेवारी ७१ टक्क्यांवर गेली. दुसरीकडे शेजारील गोवा राज्यात भाजपचे सरकार होते. तेथे १०० टक्के नागरिकांना नळाद्वारे पाणी मिळाले. महाराष्ट्रात हे का घडू शकले नाही, याचे उत्तर मागील महाविकास आघाडी सरकारने द्यावे, असा टोला देखील पटेल यांनी लगावला.

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारSupriya Suleसुप्रिया सुळे