शहरं
Join us  
Trending Stories
1
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
2
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
3
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
4
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
5
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राम्होस क्षेपणास्त्र डागणार...
6
'मी शाहरुख...', MET GALA मध्ये परदेशी मीडियाने बॉलिवूडच्या बादशहाला ओळखलंच नाही?
7
Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर
8
संपूर्ण दिवस बेशुद्ध अन् ICU मध्ये उपचार, 'इंडियन आयडॉल' फेम पवनदीपची हेल्थ अपडेट समोर
9
"हा माझ्या होणाऱ्या मुलाचा बाप..."; साखरपुड्यात गर्लफ्रेंडची एन्ट्री, उघड केली नवरदेवाची गुपितं
10
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? भारताच्या धाकाने मोठमोठ्या विमान कंपन्यांनी मार्ग बदलले
11
बलात्काराचा गुन्हा दाखल होताच एजाज खान फरार! पोलिसांकडून अभिनेत्याचा शोध सुरू
12
इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांसाठी मोठा झटका! सरकारने चार्जिंगचे नियम बदलले
13
बेस्ट बसची दुप्पट दरवाढ 'या' तारखेपासून लागू; आता प्रवाशांना मोजावे लागणार इतके पैसे
14
भारत- पाकिस्तान युद्धाबाबत बाबा वेंगांची भाकीत काय सांगतात? वाचा सविस्तर
15
Video: पाक समर्थकांना एकटाच भिडला परदेशी नागरिक; हाती तिरंगा घेत 'जय महाराष्ट्र'ची घोषणा
16
हसतं घर उद्ध्वस्त! हळदीच्या दिवशी नाचताना नवरी बेशुद्ध अन्...; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
17
दिलजीत दोसांझने 'पॉप क्वीन' शकिरालाही हसवलं, Met Gala साठी दोघं एकाच व्हॅनिटीतून पोहोचले
18
पीएम किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना होणार फायदा
19
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
20
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची

उद्धव-राज एकत्र आले तर आगामी निवडणुकीत दोन्ही पक्षांना मोठा फायदा; कार्यकर्त्यांची भावना

By राजू इनामदार | Updated: May 6, 2025 13:15 IST

सर्वांना राजकीय धडा शिकवायलाच हवा, तो उद्धवसेनेबरोबर युती केल्याने नक्की बसेल, असे मनसेच्या पदाधिकाऱ्यांना वाटत आहे

राजू इनामदार

पुणे : भाजपच्या राज्यात उधळलेल्या राजकीय वारूला लगाम घालायचा असेल तर उद्धवसेना-मनसे, पर्यायाने उद्धव ठाकरे-राज ठाकरे अशी युती लवकर अस्तित्वात यायला हवी, अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना व उद्धवसेना या दोन्ही पक्षांतील पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची भावना आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत शून्यात गेलेल्या दोन्ही पक्षांना मोठा फायदा होईल, अशी त्यांच्यात भावना आहे.

परदेशात गेलेल्या राज ठाकरेंनी मी परत येऊन काही बोलल्याशिवाय युतीबाबत कोणीही बोलू नये, असा आदेश पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला आहे. त्यामुळे उघड कोणी बोलत नसले तरी खासगीत बहुसंख्य नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मत हे ‘मराठी’चा अजेंडा टिकवायचा असेल युती व्हावी, अशी त्यांची भावना आहे.

उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेदेखील परदेशात होते. त्यांनीही याविषयी माझ्याशिवाय कोणीही बोलणार नाही, असे बजावल्यामुळे खासदार संजय राऊत यांच्यासह सर्वांनीच मौन बाळगले आहे. राज-उद्धव हेच यावर चर्चा करून निर्णय घेतील, असे सांगण्यात येत आहे. दोन्ही नेते परदेशातून परतल्यावर यावर चर्चा होईल, असा राजकीय वर्तुळाचा अंदाज आहे.

दोन्ही पक्षांकडे याबाबत कानोसा घेतला असता पदाधिकाऱ्यांसह बहुतेकांचे मत युती व्हावी, असे दिसते. मनसेचे बहुसंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी एकटे लढून व सातत्याने अपयशाची चव चाखून त्रस्त झाले आहेत. त्यात भाजपने फसवणूक केली, शिंदेसेनेनेही धोका दिला, लोकसभेला प्रचार सभा घेतल्यानंतरही महायुतीने विधानसभेला किमान काही जागांची मदत करायला हवी ती केली नाही, त्यामुळे या सर्वांना राजकीय धडा शिकवायलाच हवा, तो उद्धवसेनेबरोबर युती केल्याने नक्की बसेल, असे मनसेच्या पदाधिकाऱ्यांना वाटते. एकटे लढून उपयोग होत नाही तर, आघाडी, युती काहीतरी करावे लागणारच, मग इतर कोणाशी करण्याऐवजी राजकीय व रक्ताचेही नाते असलेल्यांबरोबर केले तर काय बिघडेल, असे पक्षातील जाणकार करतात.

उद्धवसेनेतही हाच सूर आहे. राज यांच्या सभांना गर्दी होते, हे वास्तव आहे. दोघांचा ‘मराठी’चा मुद्दा सारखाच आहे. हिंदुत्वाच्या मुद्दाही त्यांनी उचलला आहे. शिवसेनेतून राज बाहेर पडले असले तरी शिवसेनेच्या विचारांशिवाय वेगळे काही बोलत नाहीत. त्यामुळे युती करण्यात गैर काय, असे शिवसैनिकांना वाटते. भाजपने केलेली फसवणूक शिवसैनिकांच्या जिव्हारी लागली आहे. शिंदेसेनेने चिन्हासह पक्ष पळवला. त्यांना रोखठोक राजच उत्तर देऊ शकतील. विधानसभा निवडणुकीपासून शिवसैनिकांचा राजकीय आत्मविश्वास खचल्यासारखा झाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, विशेषत: मुंबई महापालिकेच्या निवडणुकीला असे खचलेल्या मनाने सामोरे जाणे योग्य नाही. राज ठाकरे बरोबर आले तर नवे वारे तयार होईल, ते मतदारांच्या मनात नक्की विश्वास निर्माण करेल, असे शिवसैनिक बोलून दाखवतात.

दोन्ही पक्ष एका चालकानुवर्ती आहेत. त्यामुळे ते ठरवतील तेच धोरण व ते बांधतील तेच तोरण, अशी दोन्ही पक्षांची अवस्था आहे. बरोबर येण्याचा किंवा न येण्याचा अंतिम निर्णयही तेच दोघे घेणार आहेत. फक्त त्यांनी तो ऐनवेळी न घेता पुरेसा कालावधी देऊन घ्यावा, असे दोन्ही पक्षातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :PuneपुणेRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारणMahayutiमहायुती