शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

प्राण गेला तरी बेहत्तर, पण एक इंचही जमीन विमानतळासाठी देणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2019 12:37 IST

पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, पारगाव, खानवडी, मुंजवडी, एखतपूर, कुंभारवळण या सात गावांमधील २ हजार ८३२ हेक्टर जागेवर शासनाने विमानतळ प्रकल्प उभारण्याची घोषणा केली आहे.

ठळक मुद्देपुरंदर विमानतळ बाधित शेतकऱ्यांचा एल्गार सासवड तहसीलवर मोर्चा : विमानतळ नकाशाच्या जाळल्या प्रती भविष्यात विमानतळाच्या विरोधात शेतकरी आक्रमक होण्याची शक्यता

सासवड : ‘जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, ईडापीडा टळू दे विमानतळ जळू दे,’ अशा घोषणा देत प्राण गेला तरी बेहत्तर, पण एक इंचही जमीन विमानतळासाठी देणार नाही. जर शासनाला आमची जमीन जबरदस्तीने घ्यायची असेल, तर येथील जमिनीवर आमचे रक्त सांडेल; पण आम्ही जमिनी देणार नाही, असा इशारा पुरंदर तालुक्यातील विमानतळ बाधित शेतकऱ्यांनी सोमवारी दिला.संतप्त शेतकऱ्यांनी प्रस्तावित विमानतळाचा नकाशा जाळून निषेध व्यक्त केला. यामुळे भविष्यात विमानतळाच्या विरोधात शेतकरी आक्रमक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, पारगाव, खानवडी, मुंजवडी, एखतपूर, कुंभारवळण या सात गावांमधील २ हजार ८३२ हेक्टर जागेवर शासनाने विमानतळ प्रकल्प उभारण्याची घोषणा केली आहे. यासाठी शासनाने बहुतेक सर्वच परवानग्या मिळविल्या आहेत. मागील आठवड्यात प्रत्येक गावांमधील कोणकोणत्या दिशेचे क्षेत्र जाणार आहे त्याचा नकाशा प्रसिद्ध करण्यात आला  आहे. शासनाने शेतकऱ्यांशी चर्चा न करता हा गट नंबर व नकाशा प्रसिद्ध केलाच कसा? असा प्रश्न उपस्थित करून याचा विरोध करण्यासाठी सोमवारी बाधित ग्रामस्थांनी तहसीलदार कचेरीवर मोर्चा काढून तहसीलदार अतुल म्हेत्रे यांना निवेदन देऊन शासनाचा  निषेध केला. 

छत्रपती संभाजीराजे आंतराष्ट्रीय विमानतळ हा पुरंदर येथे करणार असल्याचे तीन वर्षांपासून शासनाकडून सांगितले जात आहे. मात्र, वृत्तपत्रामधून वृत्त येते याव्यतिरिक्त प्रत्यक्षरीत्या या संभाव्य जागेत येणाºया गावांमध्ये बाधितांबरोबर कुठलीही चर्चा शासनाकडून केली जात नाही. प्रशासनाच्या या दुटप्पी भूमिकेचा विरोध करण्यासाठी बाधित शेतकऱ्यांनी विमानतळविरोधासाठी वेळोवेळी आंदोलने केली आहेत. २४  मे रोजी शासनाच्या वतीने विमानतळाबाबत नोटीस प्रसिद्ध केली होती. त्यामध्ये शेतकºयांना विमानतळाबाबत हरकत घ्यायची असल्यास नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून पुढील ६० दिवस कालावधी देण्यात आला आहे. तसेच, विमानतळ बाधित क्षेत्राचा नकाशा हा शासकीय कार्यालयामधे उपलब्ध असेल, असे त्यामध्ये नमूद केले होते. मात्र, नोटीस प्रसिद्ध होऊन १७  दिवस उलटले तरी अद्याप नकाशा मात्र शेतकऱ्यांना पाहायला पुरंदर तहसील कार्यालयात उपलब्ध झालेला नाही.   ......शासनाच्या  धोरणाचा निषेध करुन तो चढला बोहल्यावर आधी लगीन कोंढाण्याचं व मगच रायबाचं’ असे म्हणत कुंभारवळण येथील बाधित शेतकरी कुंटुबातील युवक अनिकेत कामठे याने विमानतळाला विरोध दर्शवीत शासनाच्या मूलभूत सुविधा मिळत नसतील तर विमानतळ काय कामाचा, असा सवाल केला. तसेच, नकाशा पाहण्यासाठी पुरंदर तहसील कार्यालयात गेलो असता आम्हालाच अजून नकाशा मिळाला नसल्याचे तहसील कार्यालयातून सांगण्यात आले. त्यामुळे शासन आमची सर्व पातळ्यांवरून फसवणूक करत आहे. आमचा विमानतळाला विरोध आहे. आम्ही तशी हरकत प्रशासकीय पातळीवर दिलेल्या मुदतीत नोंदवणार आहोत, असे सांगून या मोर्चात सहभागी होऊन मगच लग्नकार्यासाठी मार्गस्थ झाला. ...............शेतकºयांना जाहीर नोटिशीद्वारे हरकत घेण्यासाठी ६० दिवसांचा कालावधी दिला. मात्र, याबाबत शेतकºयांना कल्पना नाही. प्रशासकीय पातळीवरदेखील नकाशा शेतकºयांना पाहण्यासाठी उपलब्ध करून दिला नाही.  शासन जाणूनबुजून शेतकºयांना वेठीस धरत आहे. सर्व विमानतळ बाधित शेतकरी या ६० दिवसांच्या कालावधीत विमानतळाला विरोध म्हणून प्रशासकीय पातळीवर हरकती नोंदवणार आहेत. तसेच, कालावधी वाढवावा, हरकती घेण्यासाठी सासवडलाच व्यवस्था करावी अशा मागण्यादेखील करण्यात आल्या. - दत्तात्रय झुरंगे (अध्यक्ष विमानतळविरोधी जन संघर्ष समिती)...................प्रस्तावित विमानतळाच्या नकाशाचे केले दहनविमानतळाचा नकाशा शासनाने प्रसिद्ध केला आहे. मात्र, तो अद्याप तहसील कार्यालयात उपलब्ध करण्यात आलेला नाही. शेतकऱ्यांनी तो मिळवून शासनाचा निषेध करण्यासाठी तहसील कार्यालयासमोर नकाशाच्या प्रती जाळून विमानतळाला बाधितांनी विरोध दर्शविला...........विमानतळाला आमचा विरोध कायम राहणार आहे. शासनही आमच्याबाबत उदासीन आहे. विमानतळ पुरंदरला व हरकती नोंदविण्यास मुंबईला, असे चित्र असल्याने प्रशासनाच्या या कृतीचा निषेध करून हरकतीदेखील पुरंदर तहसील कार्यालयात घेण्याची परवानगी शासनाने द्यावी आणि विमानतळाचा नकाशाही या ठिकाणी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी विमानतळविरोधी कृती समितीच्या वतीने करण्यात आली. 

टॅग्स :PurandarपुरंदरFarmerशेतकरीAirportविमानतळ