शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मीच वगळलं नाईक निंबाळकरांच्या समर्थकांना, काय प्रॉब्लेम आहे ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2019 13:47 IST

भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केलेल्या आरोपांना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी उत्तर दिले असून मीच नाईक निंबाळकर यांच्या समर्थकांना कालवा समितीतून वगळले, त्यात काय प्रॉब्लेम आहे असा सवाल विचारला आहे. 

पुणे : भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केलेल्या आरोपांना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी उत्तर दिले असून मीच नाईक निंबाळकर यांच्या समर्थकांना कालवा समितीतून वगळले, त्यात काय प्रॉब्लेम आहे असा सवाल विचारला आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, आत्ता पुण्यात कालवा समितीची बैठक सुरु आहे. याबैठकीला अजित पवार यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थिती होते. या बैठकीआधी माढ्याचे खासदार असलेल्या नाईक निंबाळकर यांनी पाटील यांनी माझ्या समर्थकांना कालवा समितीतून वगळल्याचा आरोप केला होता. कालवा समितीतून एकूण चार  लोकांना वगळण्यात आले,असून त्यात आमदार जयमकुमार गोरे, श्रीकांत देशमुख,विश्वास भोसले, माजी सनदी अधिकारी ,उत्तमराव जानकर यांचा समावेश आहे. नीरा डाव्या कालव्याच्या निर्णयामुळे आम्हाला वगळण्यात आलंय, जयकुमार गोरे यांचा आरोप आहे. बारामतीशी इमान राखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यावर पाटील यांनी उत्तर देताना त्यामागचे कारणही स्पष्ट केले. 

raते म्हणाले की, 'त्यात प्रॉब्लेम आहे? त्यांची उपयोगिता दिसली नाही, मी त्या खात्याचा मंत्री आहे, माझ्या सांगण्यावरून वगळले'. दरम्यान याच निंबाळकर यांच्या आग्रहावरून बारामती मतदारसंघात जाणारे नीरा देवघर प्रकल्पाच चाळीस टक्के पाणी माढ्यात वळवण्यात आल्याचे मानले जाते.बारामतीकरांना यांना मोठी चपराक मानली जात होती.हे पाणी परत फलटण, माळशिरस, सांगोला, पंढरपूर भागाला मिळणार आहे. पाणी पळवल्यावरून निंबाळकर यांनी थेट बारामतीकरांना अनेकदा लक्ष केले होते. मात्र महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर निंबाळकर समर्थकांनाच कालवा समितीतून नारळ देण्यात आला आहे. 

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलRanjitshinh Naik-Nimbalkarरणजितसिंह नाईक-निंबाळकरmadha-acमाढाWaterपाणी