शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

'मी कर्जबाजारी झालोय माझ्या पाच मुलींची लग्न लाऊन द्या', तरुणाने संपवलं जीवन  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2022 20:11 IST

मजुरी करणाऱ्या तरुणाला कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अवघड झाले होते

सांगवी (बारामती) :माझ्याकडे खूप जणांचे पैसे आहेत.त्यांचे फोन आल्यावर मला भीती वाटते मी कर्जबाजारी झालोय माझ्या पाच मुलींची लग्न लाऊन द्या अशी चिट्ठी लिहून ३५ वर्षीय विवाहित तरुणाने नैराश्यतून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना बारामती तालुक्यातून समोर आली आहे.

माळेगाव (ता.बारामती) येथे ही घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महम्मद हसन शेख, (वय ३५), रा. साठेनगर (पिरबाबा दर्गा शेजारी) माळेगाव बु.(ता. बारामती जि. पुणे) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत शाहरुख गुलाबफकिर इनामदार (वय २०),रा. साठेनगर (पिरबाबा दर्गा शेजारी )माळेगाव बु. (ता. बारामती जि.पुणे) यांनी माळेगाव पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.

शुक्रवारी (दि.२३)रोजी पहाटे साडे सहा वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार उघडकीस आला. आत्महत्येनंतर बारामती येथे शवविच्छेदनासाठी हलविण्यात आले होते.  माळेगाव पोलीस ठाण्यात याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महम्मद हसन शेख हे मोलमजुरी करत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांना पाचही मुली होत्या, त्यांच्यावर कर्ज झाल्याने त्यांनी नैराश्यतून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्येनंतर पोलिसांना मयत शेख यांच्याजवळ एक चिठ्ठी सापडली. त्यामध्ये माझ्यावर खूप कर्ज झाले आहे. मला खूप जणांचे पैसे मागण्यासाठी फोन येतात. यामुळे मला त्यांची भीती वाटते, माझ्या पाचही मुलींची लग्न लाऊन द्या असे आत्महत्या करते वेळी चिठ्ठीत हिंदी भाषेत लिहिल्याचे समोर आले आहे. याबाबत माळेगाव पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Puneपुणेmarriageलग्नPoliceपोलिसDeathमृत्यू