शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

'मी कर्जबाजारी झालोय माझ्या पाच मुलींची लग्न लाऊन द्या', तरुणाने संपवलं जीवन  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2022 20:11 IST

मजुरी करणाऱ्या तरुणाला कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अवघड झाले होते

सांगवी (बारामती) :माझ्याकडे खूप जणांचे पैसे आहेत.त्यांचे फोन आल्यावर मला भीती वाटते मी कर्जबाजारी झालोय माझ्या पाच मुलींची लग्न लाऊन द्या अशी चिट्ठी लिहून ३५ वर्षीय विवाहित तरुणाने नैराश्यतून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना बारामती तालुक्यातून समोर आली आहे.

माळेगाव (ता.बारामती) येथे ही घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महम्मद हसन शेख, (वय ३५), रा. साठेनगर (पिरबाबा दर्गा शेजारी) माळेगाव बु.(ता. बारामती जि. पुणे) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत शाहरुख गुलाबफकिर इनामदार (वय २०),रा. साठेनगर (पिरबाबा दर्गा शेजारी )माळेगाव बु. (ता. बारामती जि.पुणे) यांनी माळेगाव पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.

शुक्रवारी (दि.२३)रोजी पहाटे साडे सहा वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार उघडकीस आला. आत्महत्येनंतर बारामती येथे शवविच्छेदनासाठी हलविण्यात आले होते.  माळेगाव पोलीस ठाण्यात याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महम्मद हसन शेख हे मोलमजुरी करत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांना पाचही मुली होत्या, त्यांच्यावर कर्ज झाल्याने त्यांनी नैराश्यतून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्येनंतर पोलिसांना मयत शेख यांच्याजवळ एक चिठ्ठी सापडली. त्यामध्ये माझ्यावर खूप कर्ज झाले आहे. मला खूप जणांचे पैसे मागण्यासाठी फोन येतात. यामुळे मला त्यांची भीती वाटते, माझ्या पाचही मुलींची लग्न लाऊन द्या असे आत्महत्या करते वेळी चिठ्ठीत हिंदी भाषेत लिहिल्याचे समोर आले आहे. याबाबत माळेगाव पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Puneपुणेmarriageलग्नPoliceपोलिसDeathमृत्यू