शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

लॉकडाऊनने केली फजिती! पत्नी अडकली मलेशियात आणि पती भारतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2020 12:47 IST

सरकारला परदेशातील भारतीयांना मायदेशात आणण्याचे आवाहन

ठळक मुद्दे लॉकडाऊनमुळे बिकट परिस्थिती  जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाहेर पडावे लागते अशावेळी भाषेचा अडसर

युगंधर ताजणे पुणे : आईला भेटायला म्हणून भारतात आलो होतो. त्यापूर्वी साधारण दोन महिने अगोदर पत्नी माझ्याकडे मलेशियात आली होती. आईला भेटून निघण्याची तयारीत असताना लॉकडाऊन वाढला. विमानतळावर गेल्यावर तिथे सर्व उड्डाणे बंद करण्यात आली आहेत असे समजले. पुन्हा घरी आलो. आता मी भारतात तर पत्नी मलेशियात आहे. भारतातील लॉकडाऊन पुढे वाढण्याची भीती वाटत असल्याने पत्नीची काळजी वाटू लागली आहे. सरकारने परदेशात गेलेल्या भारतीयांना पुन्हा मायदेशी आणण्याचा विचार करावा. अशी मागणी पत्नीच्या सुटकेसाठी पतीने सरकारकडे केली आहे. लॉकडाऊननंतर 48 दिवस घरात पत्नीला एकटे राहावे लागले आहे. तेथील परिस्थिती अद्याप नियंत्रणात नसल्याने चिंता आणखी वाढली आहे. पुण्यातील वानवडी येथे राहणाऱ्या आणि गेल्या आठ महिन्यांपासून मलेशियातील एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करणाऱ्या वैभव (नाव बदलले आहे) यांची पत्नी सध्या मलेशियात आहे. ती 'डिपेंटड व्हिसावर त्यांच्याकडे गेली होती. त्या दरम्यान अनिल आईला भेटण्यासाठी भारतात आले होते. मात्र लॉकडाऊन झाल्यानंतर ते पुन्हा मलेशियात जायला निघाले असताना त्यांना लॉकडाऊन असल्याने जाता येणार नसल्याचे समजले. अशा परिस्थितीत मलेशियात असणाऱ्या आपल्या पत्नीची चिंता त्यांना सतावू लागली. याचे मुख्य कारण म्हणजे भाषेची अडचण. पत्नीला मराठी आणि हिंदी याशिवाय इतर कुठली भाषा येत नसल्याने त्यांना संवाद साधण्यास अडचण येत आहे. मलेशियात देखील लॉकडाऊनची स्थिती कायम आहे. परंतु जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाहेर पडावे लागते अशावेळी भाषेचा अडसर येत असल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पूर्ण जगभरात कोरोनाच्या संसर्गाने हाहाकार माजवला आहे. त्यात अनेकांचे मृत्यू झाले आहेत. कित्येकजण वेगवेगळ्या देशात अडकून पडले आहेत. काही देशांनी आपल्या नागरिकांना पुन्हा मायदेशी आणण्यासाठी स्वतंत्र विमाने पाठवण्यास सुरुवात केली आहे. भारतात देखील ऑस्ट्रेलियन नागरिकांना पुन्हा त्यांच्या मायदेशी नेल्याची माहिती मिळाली आहे. अशावेळी भारताने देखील आपल्या नागरिकांना पुन्हा आणण्यासाठी विशेष मोहीम राबवल्यास शेकडो परदेशी भारतीयांना दिलासा मिळेल. आपण सातत्याने पीएमओ आणि सीएमओ यांच्या अधिकृत ट्विटर हँडल वर देखील संपर्क साधला. मात्र त्याला काही प्रतिसाद मिळाला नाही. असेही अनिल यांनी यावेळी सांगितले. 

 शेजारच्यांना किती त्रास द्यायचा ? सोसायटीत शेजारी राहणाऱ्या व्यक्तींना फोन केला असता ते मदतीला धावून येतात. ते वेगवेगळ्या देशाचे रहिवासी आहेत. आवश्यक वस्तू आणून देणे, संपर्क करून देणे, कुठे बाहेर जायचे असल्यास वाहन बुक करणे, स्थानिक नागरिकांशी संवाद साधून प्रशासनाने ज्या सूचना दिल्या आहेत ते पोहचवणे. त्यांच्याशी फोनवर बोलणे सुरू असून त्यांनी दिलेली माहिती पत्नीला देतो. जेणेकरून तिला बाहेर काय परिस्थिती आहे याचा अंदाज येतो. दरवेळी शेजारच्या व्यक्तींना त्रास द्यायचा हे बरे वाटत नाही. असे वैभव यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत