शहरं
Join us  
Trending Stories
1
पनवेलमध्ये 'मविआ'ला झटका! नितीन पाटील बिनविरोध, मतदानाआधीच भाजपाने तीन ठिकाणी उधळला गुलाल
2
वाजत-गाजत आघाडी केली, आता काँग्रेसला डोक्यावर हात मारायची वेळ आली; ‘वंचित’मुळे मोठा धक्का!
3
Video: मराठी तरुणाला २ तास डांबल्याचा आरोप, भाईंदर रेल्वेस्टेशनवरील प्रकार, नेमकं काय घडलं?
4
मुंबईत मतदानापूर्वीच दोन प्रभागातून महायुती बाद, प्रभाग क्र. २११ आणि २१२ मध्ये काय घडलं?
5
'मुस्लीम मुंबई' करण्याचं षडयंत्र हिंदू हाणून पाडेल; किरीट सोमय्यांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल
6
सावधान! ChatGPT वर तुमची माहिती गुप्तपणे सेव्ह होते; टाळायचे असेल तर या ५ स्टेप्स फॉलो करा
7
अर्ज दाखल करताच अजित पवारांच्या उमेदवाराचा मृत्यू, ३ जणांना रात्री प्रवेश, सकाळी तिकीट; काँग्रेसचे २६ उमेदवार गेले कुठे...?
8
VHT 2025 : महाराष्ट्र संघासाठी 'संकटमोचक' ठरला ऋतुराज! शतकी खेळीसह टीम इंडियातील जागेवरही टाकला रुमाल
9
झटपट, पटापट! स्मार्टफोन, इंटरनेट नसेल तरी नो टेन्शन; 'हा' नंबर डायल, काही सेकंदात UPI पेमेंट
10
“राज ठाकरेंच्या जास्त जागा जिंकून याव्यात ही आमची इच्छा, आम्ही बहुमत मिळवू”: संजय राऊत
11
छ. संभाजीनगर भाजपमध्ये कार्यकर्त्यांचा उद्रेक थांबेना! मंत्र्यांच्या गाड्यांना काळं फासलं, घोषणाबाजी
12
नववर्षाच्या आदल्या दिवशीच गुड न्यूज; सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, पटापट चेक करा १८, २२, २४ कॅरेटचे दर
13
Nashik Municipal Corporation Election : आयारामांची चांदी! भाजपचे २२, शिंदेसेनेचे १९; निष्ठावंतांच्या नशिबी सतरंज्या उचलण्याचीच वेळ
14
'ताज'चे नाव आता 'जीव्हीके' हॉटेल्सवरून हटणार; टाटा समुहाने संपूर्ण हिस्सा विकला, कोण आहे खरेदीदार?
15
बाबा वेंगा किंवा नास्त्रेदेमस नाही... मायक्रोसॉफ्टची भविष्यवाणी! २०२६ मध्ये या ४० क्षेत्रांतील लोकांच्या नोकऱ्या जाणार...
16
जिभेचे चोचले की निसर्गाचा चमत्कार? जगातला असा एकमेव बेट, जिथे चक्क माती खातात लोक!
17
"आमदार मेहतांच्या घमेंडीमुळे मीरा भाईंदरमध्ये महायुती तुटली"; मंत्री प्रताप सरनाईकांचा घणाघात
18
एबी फॉर्म दिला, जल्लोष झाला अन् तासाभरात उमेदवारी रद्द
19
संप सुरू होण्यापूर्वी Swiggy, Zomato बॅकफुटवर; डिलिव्हरी बॉईजसाठी आली चांगली बातमी
20
पैशांची चणचण, कर्जाचा डोंगर... यूट्यूबवरुन शिकले अन् पती-पत्नीने घरातच छापल्या नकली नोटा
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनने केली फजिती! पत्नी अडकली मलेशियात आणि पती भारतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2020 12:47 IST

सरकारला परदेशातील भारतीयांना मायदेशात आणण्याचे आवाहन

ठळक मुद्दे लॉकडाऊनमुळे बिकट परिस्थिती  जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाहेर पडावे लागते अशावेळी भाषेचा अडसर

युगंधर ताजणे पुणे : आईला भेटायला म्हणून भारतात आलो होतो. त्यापूर्वी साधारण दोन महिने अगोदर पत्नी माझ्याकडे मलेशियात आली होती. आईला भेटून निघण्याची तयारीत असताना लॉकडाऊन वाढला. विमानतळावर गेल्यावर तिथे सर्व उड्डाणे बंद करण्यात आली आहेत असे समजले. पुन्हा घरी आलो. आता मी भारतात तर पत्नी मलेशियात आहे. भारतातील लॉकडाऊन पुढे वाढण्याची भीती वाटत असल्याने पत्नीची काळजी वाटू लागली आहे. सरकारने परदेशात गेलेल्या भारतीयांना पुन्हा मायदेशी आणण्याचा विचार करावा. अशी मागणी पत्नीच्या सुटकेसाठी पतीने सरकारकडे केली आहे. लॉकडाऊननंतर 48 दिवस घरात पत्नीला एकटे राहावे लागले आहे. तेथील परिस्थिती अद्याप नियंत्रणात नसल्याने चिंता आणखी वाढली आहे. पुण्यातील वानवडी येथे राहणाऱ्या आणि गेल्या आठ महिन्यांपासून मलेशियातील एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करणाऱ्या वैभव (नाव बदलले आहे) यांची पत्नी सध्या मलेशियात आहे. ती 'डिपेंटड व्हिसावर त्यांच्याकडे गेली होती. त्या दरम्यान अनिल आईला भेटण्यासाठी भारतात आले होते. मात्र लॉकडाऊन झाल्यानंतर ते पुन्हा मलेशियात जायला निघाले असताना त्यांना लॉकडाऊन असल्याने जाता येणार नसल्याचे समजले. अशा परिस्थितीत मलेशियात असणाऱ्या आपल्या पत्नीची चिंता त्यांना सतावू लागली. याचे मुख्य कारण म्हणजे भाषेची अडचण. पत्नीला मराठी आणि हिंदी याशिवाय इतर कुठली भाषा येत नसल्याने त्यांना संवाद साधण्यास अडचण येत आहे. मलेशियात देखील लॉकडाऊनची स्थिती कायम आहे. परंतु जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाहेर पडावे लागते अशावेळी भाषेचा अडसर येत असल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पूर्ण जगभरात कोरोनाच्या संसर्गाने हाहाकार माजवला आहे. त्यात अनेकांचे मृत्यू झाले आहेत. कित्येकजण वेगवेगळ्या देशात अडकून पडले आहेत. काही देशांनी आपल्या नागरिकांना पुन्हा मायदेशी आणण्यासाठी स्वतंत्र विमाने पाठवण्यास सुरुवात केली आहे. भारतात देखील ऑस्ट्रेलियन नागरिकांना पुन्हा त्यांच्या मायदेशी नेल्याची माहिती मिळाली आहे. अशावेळी भारताने देखील आपल्या नागरिकांना पुन्हा आणण्यासाठी विशेष मोहीम राबवल्यास शेकडो परदेशी भारतीयांना दिलासा मिळेल. आपण सातत्याने पीएमओ आणि सीएमओ यांच्या अधिकृत ट्विटर हँडल वर देखील संपर्क साधला. मात्र त्याला काही प्रतिसाद मिळाला नाही. असेही अनिल यांनी यावेळी सांगितले. 

 शेजारच्यांना किती त्रास द्यायचा ? सोसायटीत शेजारी राहणाऱ्या व्यक्तींना फोन केला असता ते मदतीला धावून येतात. ते वेगवेगळ्या देशाचे रहिवासी आहेत. आवश्यक वस्तू आणून देणे, संपर्क करून देणे, कुठे बाहेर जायचे असल्यास वाहन बुक करणे, स्थानिक नागरिकांशी संवाद साधून प्रशासनाने ज्या सूचना दिल्या आहेत ते पोहचवणे. त्यांच्याशी फोनवर बोलणे सुरू असून त्यांनी दिलेली माहिती पत्नीला देतो. जेणेकरून तिला बाहेर काय परिस्थिती आहे याचा अंदाज येतो. दरवेळी शेजारच्या व्यक्तींना त्रास द्यायचा हे बरे वाटत नाही. असे वैभव यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत