शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

पवनेत आढळले शेकडो मृत मासे;‘लोकमत’मुळे नदी फेसाळल्याचे उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 11:20 IST

पर्यावरण विभागाच्या पथकाकडून पाहणी, पर्यावरणवादी संस्था संतप्त  

पिंपरी : पवना नदीत येणारा फेस हा साबणाच्या पाण्याचा, डिटर्जंटचा असावा? असा अंदाज महाराष्ट्रप्रदूषण नियंत्रण मंडळाने लावला आहे. नदी फेसाळल्याच्या दुसऱ्याच दिवशी गुरूवारी शेकडो मासे मृत आढळून आले. ‘साबणाच्या पाण्याने मासे मरतात का?’ असा प्रश्न पर्यावरणवादी संस्थांनी विचारला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणारी पवना नदी गेल्या काही महिन्यांपासून वारंवार फेसाळत आहे. नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यानंतर केजुदेवी बंधाऱ्यावरून पाणी पडल्यामुळे पाण्याला फेस येतो, हा फेस रसायनयुक्त पाण्याचा नसून साबण किंवा डिटर्जंटचा आहे, असे प्रदूषण नियंत्रण मंडळाने आजवर केलेल्या तपासण्यांमध्ये आढळून आले आहे. 

‘लोकमत’मुळे नदी फेसाळल्याचे उघड

दोन दिवसांपूर्वी थेरगाव केजुदेवी येथील बंधाऱ्यापासून चिंचवडपर्यंत नदी फेसाळली होती. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महापालिकेने तातडीने पाण्याचे नमुने घेत तपासणीसाठी पाठवले होते. त्याचा अहवाल येण्यास अजून तीन ते चार दिवस लागणार आहेत.

शहराबाहेरून दूषित पाणी

शहराच्या किवळे-रावेत इथपासून ते चिंचवडपर्यंतच्या पात्रामध्ये मृत मासे आढळले आहेत. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर महापालिकेच्या पर्यावरण विभागाने नदीची पाहणी केली. त्यामध्ये शहराबाहेरून पीएमआरडीए हद्दीतून आलेल्या दूषित पाण्यामुळे मासे मृत पावले आहेत, असा अंदाज व्यक्त केला आहे.

पवना नदीचे प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत आहे. पवना नदी ज्या भागातून वाहते, त्या भागातील ग्रामपंचायती, पीएमआरडीएच्या भागातून मोठ्या प्रक्रिया न केलेले सांडपाणी सोडले जाते. त्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नदीतील जैवविविधता धोक्यात आली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने साबणाच्या पाण्यामुळे फेस येत आहे, असे माध्यमांशी बोलताना सांगितले होते. साबणाच्या पाण्यामुळे मासे मरू शकतात का? असा प्रश्न पडला आहे. - नीलेश पिंगळे, थेरगाव सोशल फाउंडेशनपवना नदीत मृत मासे आढळले आहेत, अशी माहिती मिळाल्यानंतर पर्यावरण विभागाच्या पथकाने पाहणी केली. महापालिका हद्दीबाहेरील नदीपात्रातून पाणी वाढले. हद्दीबाहेरून दूषित पाणी आल्याने मासे मृत झाले असावेत. आपल्या हद्दीत कोठेही रसायनयुक्त पाणी नदीत सोडले जात नाही, याची खात्री केली आहे. - संजय कुलकर्णी, सहशहर अभियंता, पर्यावरण विभाग

 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडwater pollutionजल प्रदूषणWaterपाणीpollutionप्रदूषण