शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

जगायचं कसं? किराण्यासह गॅस, कडधान्ये यांचे भाव कडाडले, गरिबांची भाकरीही ताटातून गायब

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2022 14:40 IST

हाताला काम मिळेना अन् महागाई पाठ साेडेना !

पुणे : गेल्या चार महिन्यांपासून किराण्यासह गॅस, कडधान्ये यांचे भाव सातत्याने वाढतच आहेत. दुसरीकडे हाताला काम मिळत नाही. मिळालेच तर त्याबदल्यात मिळणारा माेबदलाही तुटपुंजा आहे. अशावेळी सामान्यांनी जगायचं कसं, असा प्रश्न अनेकजण उपस्थित करीत आहेत. आमचा आवाज सरकारपर्यंत जाईना, प्रश्न काेणी मांडेना अन् सरकार दखल घेईना, अशी अवस्था झाल्याचे अगदी नाेकरदारापासून शेतकरी, वेठबिगारीपर्यंत सर्वच मांडत आहेत.

गरिबाघरची भाकरीही ताटातून कधीचीच गायब झाली आहे. गहू, बाजरी, ज्वारी यांचे दर प्रतिकिलो ७ ते १५ रुपयांनी वाढले आहेत. तूर, मसूर, मूग, हरभरा या डाळींचे दरही ५ ते १० रुपयांनी वाढले आहेत. इतकेच काय तर तेलाच्या भावात १० ते १५ टक्के वाढ झाली आहे. पगार मात्र तेवढाच आहे.

अशी एकही खाण्याची किंवा वापरण्याची वस्तू नाही ज्यामध्ये वाढ हाेत नाही. मग आपाेआपच घर खर्चाचे बजेट वाढत चालले आहे. या महागाईचा फटका जास्त प्रमाणात गृहिणींना बसला आहे. यात मिरची पावडर, मसाले यांच्याही भावात वाढ झाली आहे. लाल तिखट मिरची प्रतिकिलो ३५० ते ५०० रुपयांपर्यंत गेली आहे. यात रोजच्या वापरायच्या वस्तूंच्या दरवाढीने उच्चांक गाठला आहे.

ज्वारी ५० ते ६० रुपयांवर

पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. पेरणी उशिरा सुरू झाली आहे. त्यामुळे नवीन पीक येण्यास वेळ लागणार आहे. ज्वारी, गहू, बाजरी महाग झाली आहे. सध्या ज्वारीचा भाव ४५ वरून ६० रुपयांवर गेली आहे. गहू ३५ ते ५५ रुपयांपर्यंत आहे. बाजरी ३५ ते ४० रुपये प्रतिकिलो झाली आहे.

घरगुती गॅस सिलिंडर १०५५ रुपयांवर

घरगुती गॅस सिलिंडर १०५५ रूपयांवर पोहोचला आहे. त्यामध्ये दर काही कमी झाले नाहीत. त्यात अनुदानही जमा होत नसल्याने सामान्यांचे महागाईने कंबरडे मोडत आहे.

कांदा ५०, तर बटाटा ४० रुपयांवर

परतीच्या पावसामुळे कांदा खराब झाला आहे. त्यामुळे कांदा कमी प्रमाणात येत आहे. ताे घाऊकमध्ये ३० रुपये, तर किरकोळ बाजारात ४० ते ५० रुपये विक्री सुरू आहे. घाऊक बाजारात बटाटा २५ ते ३० रुपये, तर किरकोळमध्ये ४० रुपये इतका आहे.

...तरीही परवडेना

गेल्या चार महिन्यांपासून पालेभाज्यांचे दर वाढतच आहेत. सध्या भाज्यांची आवक वाढली असल्याने सध्या भाव थोडेफार घसरले आहेत. ग्राहकांना थोडासा दिलासा मिळाला असला तरी वाढत्या महागाईने परवडत नाही.

''अवेळी पडणाऱ्या पावसामुळे यंदा पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकरी पीक डोळ्यासमोर ठेवूनच लागवड करीत असतो. तोपर्यंत शिल्लक साठा बाजारात पाठवत नाही. यामुळे गेल्या वीस दिवसांतच ज्वारी, गहू, बाजरीत १५ ते २० रुपयांनी वाढ झाली आहे. नवीन माल डिसेंबरमध्ये आल्यानंतर भाव कमी होण्याची शक्यता आहे. - अभय संचेती, व्यापारी''

टॅग्स :PuneपुणेSocialसामाजिकInflationमहागाईGovernmentसरकारMONEYपैसा