शहरं
Join us  
Trending Stories
1
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
2
जम्मू-काश्मीर पोलिसांनी मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
3
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
4
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
5
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
6
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
7
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
8
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
9
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
10
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
11
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
12
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
13
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
14
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
15
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
16
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
17
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
18
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
19
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
20
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!

जगायचं कसं? किराण्यासह गॅस, कडधान्ये यांचे भाव कडाडले, गरिबांची भाकरीही ताटातून गायब

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2022 14:40 IST

हाताला काम मिळेना अन् महागाई पाठ साेडेना !

पुणे : गेल्या चार महिन्यांपासून किराण्यासह गॅस, कडधान्ये यांचे भाव सातत्याने वाढतच आहेत. दुसरीकडे हाताला काम मिळत नाही. मिळालेच तर त्याबदल्यात मिळणारा माेबदलाही तुटपुंजा आहे. अशावेळी सामान्यांनी जगायचं कसं, असा प्रश्न अनेकजण उपस्थित करीत आहेत. आमचा आवाज सरकारपर्यंत जाईना, प्रश्न काेणी मांडेना अन् सरकार दखल घेईना, अशी अवस्था झाल्याचे अगदी नाेकरदारापासून शेतकरी, वेठबिगारीपर्यंत सर्वच मांडत आहेत.

गरिबाघरची भाकरीही ताटातून कधीचीच गायब झाली आहे. गहू, बाजरी, ज्वारी यांचे दर प्रतिकिलो ७ ते १५ रुपयांनी वाढले आहेत. तूर, मसूर, मूग, हरभरा या डाळींचे दरही ५ ते १० रुपयांनी वाढले आहेत. इतकेच काय तर तेलाच्या भावात १० ते १५ टक्के वाढ झाली आहे. पगार मात्र तेवढाच आहे.

अशी एकही खाण्याची किंवा वापरण्याची वस्तू नाही ज्यामध्ये वाढ हाेत नाही. मग आपाेआपच घर खर्चाचे बजेट वाढत चालले आहे. या महागाईचा फटका जास्त प्रमाणात गृहिणींना बसला आहे. यात मिरची पावडर, मसाले यांच्याही भावात वाढ झाली आहे. लाल तिखट मिरची प्रतिकिलो ३५० ते ५०० रुपयांपर्यंत गेली आहे. यात रोजच्या वापरायच्या वस्तूंच्या दरवाढीने उच्चांक गाठला आहे.

ज्वारी ५० ते ६० रुपयांवर

पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. पेरणी उशिरा सुरू झाली आहे. त्यामुळे नवीन पीक येण्यास वेळ लागणार आहे. ज्वारी, गहू, बाजरी महाग झाली आहे. सध्या ज्वारीचा भाव ४५ वरून ६० रुपयांवर गेली आहे. गहू ३५ ते ५५ रुपयांपर्यंत आहे. बाजरी ३५ ते ४० रुपये प्रतिकिलो झाली आहे.

घरगुती गॅस सिलिंडर १०५५ रुपयांवर

घरगुती गॅस सिलिंडर १०५५ रूपयांवर पोहोचला आहे. त्यामध्ये दर काही कमी झाले नाहीत. त्यात अनुदानही जमा होत नसल्याने सामान्यांचे महागाईने कंबरडे मोडत आहे.

कांदा ५०, तर बटाटा ४० रुपयांवर

परतीच्या पावसामुळे कांदा खराब झाला आहे. त्यामुळे कांदा कमी प्रमाणात येत आहे. ताे घाऊकमध्ये ३० रुपये, तर किरकोळ बाजारात ४० ते ५० रुपये विक्री सुरू आहे. घाऊक बाजारात बटाटा २५ ते ३० रुपये, तर किरकोळमध्ये ४० रुपये इतका आहे.

...तरीही परवडेना

गेल्या चार महिन्यांपासून पालेभाज्यांचे दर वाढतच आहेत. सध्या भाज्यांची आवक वाढली असल्याने सध्या भाव थोडेफार घसरले आहेत. ग्राहकांना थोडासा दिलासा मिळाला असला तरी वाढत्या महागाईने परवडत नाही.

''अवेळी पडणाऱ्या पावसामुळे यंदा पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकरी पीक डोळ्यासमोर ठेवूनच लागवड करीत असतो. तोपर्यंत शिल्लक साठा बाजारात पाठवत नाही. यामुळे गेल्या वीस दिवसांतच ज्वारी, गहू, बाजरीत १५ ते २० रुपयांनी वाढ झाली आहे. नवीन माल डिसेंबरमध्ये आल्यानंतर भाव कमी होण्याची शक्यता आहे. - अभय संचेती, व्यापारी''

टॅग्स :PuneपुणेSocialसामाजिकInflationमहागाईGovernmentसरकारMONEYपैसा