शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

जगायचं कसं? किराण्यासह गॅस, कडधान्ये यांचे भाव कडाडले, गरिबांची भाकरीही ताटातून गायब

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2022 14:40 IST

हाताला काम मिळेना अन् महागाई पाठ साेडेना !

पुणे : गेल्या चार महिन्यांपासून किराण्यासह गॅस, कडधान्ये यांचे भाव सातत्याने वाढतच आहेत. दुसरीकडे हाताला काम मिळत नाही. मिळालेच तर त्याबदल्यात मिळणारा माेबदलाही तुटपुंजा आहे. अशावेळी सामान्यांनी जगायचं कसं, असा प्रश्न अनेकजण उपस्थित करीत आहेत. आमचा आवाज सरकारपर्यंत जाईना, प्रश्न काेणी मांडेना अन् सरकार दखल घेईना, अशी अवस्था झाल्याचे अगदी नाेकरदारापासून शेतकरी, वेठबिगारीपर्यंत सर्वच मांडत आहेत.

गरिबाघरची भाकरीही ताटातून कधीचीच गायब झाली आहे. गहू, बाजरी, ज्वारी यांचे दर प्रतिकिलो ७ ते १५ रुपयांनी वाढले आहेत. तूर, मसूर, मूग, हरभरा या डाळींचे दरही ५ ते १० रुपयांनी वाढले आहेत. इतकेच काय तर तेलाच्या भावात १० ते १५ टक्के वाढ झाली आहे. पगार मात्र तेवढाच आहे.

अशी एकही खाण्याची किंवा वापरण्याची वस्तू नाही ज्यामध्ये वाढ हाेत नाही. मग आपाेआपच घर खर्चाचे बजेट वाढत चालले आहे. या महागाईचा फटका जास्त प्रमाणात गृहिणींना बसला आहे. यात मिरची पावडर, मसाले यांच्याही भावात वाढ झाली आहे. लाल तिखट मिरची प्रतिकिलो ३५० ते ५०० रुपयांपर्यंत गेली आहे. यात रोजच्या वापरायच्या वस्तूंच्या दरवाढीने उच्चांक गाठला आहे.

ज्वारी ५० ते ६० रुपयांवर

पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. पेरणी उशिरा सुरू झाली आहे. त्यामुळे नवीन पीक येण्यास वेळ लागणार आहे. ज्वारी, गहू, बाजरी महाग झाली आहे. सध्या ज्वारीचा भाव ४५ वरून ६० रुपयांवर गेली आहे. गहू ३५ ते ५५ रुपयांपर्यंत आहे. बाजरी ३५ ते ४० रुपये प्रतिकिलो झाली आहे.

घरगुती गॅस सिलिंडर १०५५ रुपयांवर

घरगुती गॅस सिलिंडर १०५५ रूपयांवर पोहोचला आहे. त्यामध्ये दर काही कमी झाले नाहीत. त्यात अनुदानही जमा होत नसल्याने सामान्यांचे महागाईने कंबरडे मोडत आहे.

कांदा ५०, तर बटाटा ४० रुपयांवर

परतीच्या पावसामुळे कांदा खराब झाला आहे. त्यामुळे कांदा कमी प्रमाणात येत आहे. ताे घाऊकमध्ये ३० रुपये, तर किरकोळ बाजारात ४० ते ५० रुपये विक्री सुरू आहे. घाऊक बाजारात बटाटा २५ ते ३० रुपये, तर किरकोळमध्ये ४० रुपये इतका आहे.

...तरीही परवडेना

गेल्या चार महिन्यांपासून पालेभाज्यांचे दर वाढतच आहेत. सध्या भाज्यांची आवक वाढली असल्याने सध्या भाव थोडेफार घसरले आहेत. ग्राहकांना थोडासा दिलासा मिळाला असला तरी वाढत्या महागाईने परवडत नाही.

''अवेळी पडणाऱ्या पावसामुळे यंदा पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकरी पीक डोळ्यासमोर ठेवूनच लागवड करीत असतो. तोपर्यंत शिल्लक साठा बाजारात पाठवत नाही. यामुळे गेल्या वीस दिवसांतच ज्वारी, गहू, बाजरीत १५ ते २० रुपयांनी वाढ झाली आहे. नवीन माल डिसेंबरमध्ये आल्यानंतर भाव कमी होण्याची शक्यता आहे. - अभय संचेती, व्यापारी''

टॅग्स :PuneपुणेSocialसामाजिकInflationमहागाईGovernmentसरकारMONEYपैसा