शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

पुण्याला किती पाणी द्यायचे ते आज ठरणार, कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत होणार निर्णय

By नितीन चौधरी | Updated: February 23, 2024 15:19 IST

खडकवासला धरण प्रकल्पात सध्या १६.१९ टीएमसी अर्थात ५५.५५ टक्के पाणीसाठा शिल्लक

पुणे : अपुऱ्या पर्जन्यमानामुळे यंदा शहरासह ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण प्रकल्पात सध्या १६.१९ टीएमसी अर्थात ५५.५५ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यातच ग्रामीण भागातून शेतीच्या सिंचनासाठी उन्हाळी आवर्तानाची मागणी होत आहे. त्यासाठी किमान ५ टीएमसी पाणी द्यावे लागणार आहे. परिणामी शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करताना अतिरिक्त नियोजन करावे लागणार आहे. याबाबत शनिवारी (दि. २४) होणाऱ्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत नेमका काय निर्णय होतो, याकडे लक्ष लागून आहे.

पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी कालवा सल्लागार समितीची बैठक होत आहे. यात पाणीवाटपाबाबत निर्णय होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. खडकवासला धरण प्रकल्पातील खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर या चार धरणांमध्ये यंदाच्या वर्षी गेल्या वर्षाच्या तुलनेत कमी पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये पाणीसाठा कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ‘फेब्रुवारीमध्ये पाण्याची स्थिती पाहून निर्णय घेऊ. तोपर्यंत पाणी काटकसरीने वापरण्याच्या सूचना पवार यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानुसार जलसंपदा विभागासह महापालिका प्रशासनाने पाणी बचतीचे उपाय अंमलात आणण्याचे सांगितले होते.

खडकवासला प्रकल्पात सध्या १६.१९ टीएमसी इतका पाणीसाठा आहे. ग्रामीण भागाला रब्बी आवर्तन देताना ५ टीएमसी पाणी सोडण्यात आले होते. यात अर्धा टीएमसी पाण्याची बचत करण्यात आल्याचा दावा जलसंपदा विभागाने केला होता. तर उन्हाळी हंगामातील आवर्तनासाठी ५ टीएमसी पाणी द्यावे लागणार आहे. त्यामुळे शिल्लक पाणीसाठ्यातून शहराला पाणीपुरवठा करताना अचूक नियोजन करावे लागणार आहे. गेल्या वर्षी पुणे शहरालाला १ मार्च ते १५ जुलैअखेर सुमारे ७.८ टीएमसी पाणी दिले होते. पावसाळा उशिरा सुरू झाल्यास काही पाणीसाठा राखीव ठेवला जातो. याचा सारासार विचार करून जलसंपदा विभागाला नियोजनाची तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

त्यामुळे या बैठकीत पवार शहराच्या पाण्याबाबत काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागून राहिले आहे. पुणे जिल्ह्यात पुरंदर, बारामती, दौंड, इंदापूर आणि शिरूर या तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला होता. आता खेड, जुन्नर, आंबेगाव या तालुक्यांतील १६ गावांमध्ये दुष्काळग्रस्त असल्याचे जाहीर केले आहे. या गावांना पाणी देण्याचे आव्हान जलसपंदा विभागाला पेलावे लागणार आहे.

सद्यस्थितीत पाणीसाठा ५५.५५ टक्के असून काटकसर आणि योग्य नियोजनाची आवश्यकता आहे. शहरी आणि ग्रामीण भागात गळतीप्रतिबंधक उपाययोजना करणे आवश्यक आहे. कालवा सल्लागार समितीच्या मार्गदर्शनाखाली उन्हाळ्यातील पाणी वाटपाचे योग्य नियोजन करण्यात येईल.- श्वेता कुऱ्हाडे, कार्यकारी अभियंता, खडकवासला प्रकल्प

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसWaterपाणीkhadakwasala-acखडकवासलाDamधरणSocialसामाजिक