शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

Pune MIDC fire: मृतांमध्ये महिलांची संख्या जास्त,अनेकांचा घरचा कमावणारा आधार गेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2021 22:14 IST

महिला करत होत्या पाणी शुध्दीकरण गोळ्यांच्या पॅॅकींगचे काम

ठळक मुद्देएसव्हीएस ॲक्वा या कंपनीत ज्वलनग्राही रसायनांचा वापरू असूनही नाही फायर सिस्टिम

पुण्यात उरवडे मध्ये लागलेल्या आगीत तब्बल १८ जणांचा हरपळून मृत्यू झाला आहे.यात बहुतांश मृत या महिला आहेत. या सगळ म महिला आजुबाजुच्या परिसरातून या कंपनीत कामाला येत होत्या.  उरवडे, पिरंगुट, भादस, बालगुडी, पौड येथील रहिवासी असणाऱ्या महिलांच्य  घरातली परिस्थीती गरीबीची आहे. कंपनीत पाणी शुध्दीकरण करणाऱ्या गोळ्यांच्या पॅॅकींगचे काम त्या करत होत्या. आजही हेच काम सुरू होते. त्यावेळी शॉॅर्टसर्कीट झाले. नेमकी याच विभागाला आग लागली. त्यामुळे तेथे काम करणाऱ्या महिलांचा मृत्यू झाला.

अर्चना कवडे, संगिता गोंदे, मंगल मोरगाळे, सुरेखा तुपे, सुमन ढेरे, सुनीता साठे, संगिता पोळेकर, माधूरी अंबोरे, मंदा कुलत,  त्रिशाला जाधव,  सीमा बोराडे, गीता दीवाडकर, शीतल खोपकर, सारिका कुडाळे, धनश्री शेलार अशी महिलांची नावे आहेत. 

एसव्हीएस ॲक्वा टेक्नॉलॉजीस ही कंपनी निंकुज शहा यांच्या मालकीची आहे. सुमारे दहा वर्षापूर्वी ही कंपनी सुरू झाली. पाणी शुध्द करण्यासाठीच्या गोळ्या बनविण्याचे काम येथे होते. मात्र, गेल्या दीड वर्षांपासून येथे सॅॅनीटायझर बनविले जात होते. पाणी शुध्द गोळ्या करण्यासाठी आरएम १ नावाचे रसायन वापरले जाते. ते अत्यंत ज्वालाग्रही आहे. त्याचे पॅकेजींग सुरू असताना शॉॅर्टसर्कीट झाल्याचा अंदाज आहे.

ज्वलनग्राही रसायनांचा वापरू असूनही नाही फायर सिस्टिम

एसव्हीएस ॲक्वा या कंपनीत ज्वलनग्राही रसायनांचा वापर होत होता. मात्र, तरीही या कंपनीत अग्निरोधक यंत्रणा (फायर सिस्टिम) नाही, असा आरोपही केला जात आहे.मृत्यूच्या आधी एकमेकांना कवटाळलेया कंपनीला लागेली आग इतकी भीषण होती की कंपनीच्या दरवाज्यातून प्रवेश करणे अवघड झाले होते. त्यामुळे कंपनीच्या पाठिमागील बाजूची असलेली भिंत जेसीबीच्या साहाय्यानं पाडून रस्ता करून आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला. तरी साधारणपणे दोन ते तीन तास अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र आग एवढी भीषण होती की ती नियंत्रणात येत नव्हती. संपूर्ण आग नियंत्रणात येताच या आगेमधून अठरा जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.

या मृतदेहांची अवस्था इतकी भयानक होते की हे मृतदेह स्त्रीयांचे आहेत की पुरूषांचे हे ओळखणेही कठीण झाले होते. हृदय हेलावून टाकणारी बाब म्हणजे चार मृतदेह एकमेकांना कवटाळलेल्या अवस्थेत आढळले. आगीत सापडल्यानंतर जीवाच्या आकांतने चौघांनी एकमेकांना मिठी मारली असावी, परंतु काळाने त्यांच्यावर घाला घातला. चौघांचेही मृतदेदह कवटाळालेल्या अवस्थेतच बाहेर काढण्यात आले. 

टॅग्स :PuneपुणेpirangutपिरंगुटfireआगFire Brigadeअग्निशमन दल