शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
3
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
4
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
5
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
6
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
7
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
8
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
9
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
10
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
11
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
12
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
13
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
14
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
15
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
16
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
17
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
18
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
19
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
20
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत

Pune MIDC fire: मृतांमध्ये महिलांची संख्या जास्त,अनेकांचा घरचा कमावणारा आधार गेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2021 22:14 IST

महिला करत होत्या पाणी शुध्दीकरण गोळ्यांच्या पॅॅकींगचे काम

ठळक मुद्देएसव्हीएस ॲक्वा या कंपनीत ज्वलनग्राही रसायनांचा वापरू असूनही नाही फायर सिस्टिम

पुण्यात उरवडे मध्ये लागलेल्या आगीत तब्बल १८ जणांचा हरपळून मृत्यू झाला आहे.यात बहुतांश मृत या महिला आहेत. या सगळ म महिला आजुबाजुच्या परिसरातून या कंपनीत कामाला येत होत्या.  उरवडे, पिरंगुट, भादस, बालगुडी, पौड येथील रहिवासी असणाऱ्या महिलांच्य  घरातली परिस्थीती गरीबीची आहे. कंपनीत पाणी शुध्दीकरण करणाऱ्या गोळ्यांच्या पॅॅकींगचे काम त्या करत होत्या. आजही हेच काम सुरू होते. त्यावेळी शॉॅर्टसर्कीट झाले. नेमकी याच विभागाला आग लागली. त्यामुळे तेथे काम करणाऱ्या महिलांचा मृत्यू झाला.

अर्चना कवडे, संगिता गोंदे, मंगल मोरगाळे, सुरेखा तुपे, सुमन ढेरे, सुनीता साठे, संगिता पोळेकर, माधूरी अंबोरे, मंदा कुलत,  त्रिशाला जाधव,  सीमा बोराडे, गीता दीवाडकर, शीतल खोपकर, सारिका कुडाळे, धनश्री शेलार अशी महिलांची नावे आहेत. 

एसव्हीएस ॲक्वा टेक्नॉलॉजीस ही कंपनी निंकुज शहा यांच्या मालकीची आहे. सुमारे दहा वर्षापूर्वी ही कंपनी सुरू झाली. पाणी शुध्द करण्यासाठीच्या गोळ्या बनविण्याचे काम येथे होते. मात्र, गेल्या दीड वर्षांपासून येथे सॅॅनीटायझर बनविले जात होते. पाणी शुध्द गोळ्या करण्यासाठी आरएम १ नावाचे रसायन वापरले जाते. ते अत्यंत ज्वालाग्रही आहे. त्याचे पॅकेजींग सुरू असताना शॉॅर्टसर्कीट झाल्याचा अंदाज आहे.

ज्वलनग्राही रसायनांचा वापरू असूनही नाही फायर सिस्टिम

एसव्हीएस ॲक्वा या कंपनीत ज्वलनग्राही रसायनांचा वापर होत होता. मात्र, तरीही या कंपनीत अग्निरोधक यंत्रणा (फायर सिस्टिम) नाही, असा आरोपही केला जात आहे.मृत्यूच्या आधी एकमेकांना कवटाळलेया कंपनीला लागेली आग इतकी भीषण होती की कंपनीच्या दरवाज्यातून प्रवेश करणे अवघड झाले होते. त्यामुळे कंपनीच्या पाठिमागील बाजूची असलेली भिंत जेसीबीच्या साहाय्यानं पाडून रस्ता करून आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला. तरी साधारणपणे दोन ते तीन तास अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र आग एवढी भीषण होती की ती नियंत्रणात येत नव्हती. संपूर्ण आग नियंत्रणात येताच या आगेमधून अठरा जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.

या मृतदेहांची अवस्था इतकी भयानक होते की हे मृतदेह स्त्रीयांचे आहेत की पुरूषांचे हे ओळखणेही कठीण झाले होते. हृदय हेलावून टाकणारी बाब म्हणजे चार मृतदेह एकमेकांना कवटाळलेल्या अवस्थेत आढळले. आगीत सापडल्यानंतर जीवाच्या आकांतने चौघांनी एकमेकांना मिठी मारली असावी, परंतु काळाने त्यांच्यावर घाला घातला. चौघांचेही मृतदेदह कवटाळालेल्या अवस्थेतच बाहेर काढण्यात आले. 

टॅग्स :PuneपुणेpirangutपिरंगुटfireआगFire Brigadeअग्निशमन दल