शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Pune MIDC fire: मृतांमध्ये महिलांची संख्या जास्त,अनेकांचा घरचा कमावणारा आधार गेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2021 22:14 IST

महिला करत होत्या पाणी शुध्दीकरण गोळ्यांच्या पॅॅकींगचे काम

ठळक मुद्देएसव्हीएस ॲक्वा या कंपनीत ज्वलनग्राही रसायनांचा वापरू असूनही नाही फायर सिस्टिम

पुण्यात उरवडे मध्ये लागलेल्या आगीत तब्बल १८ जणांचा हरपळून मृत्यू झाला आहे.यात बहुतांश मृत या महिला आहेत. या सगळ म महिला आजुबाजुच्या परिसरातून या कंपनीत कामाला येत होत्या.  उरवडे, पिरंगुट, भादस, बालगुडी, पौड येथील रहिवासी असणाऱ्या महिलांच्य  घरातली परिस्थीती गरीबीची आहे. कंपनीत पाणी शुध्दीकरण करणाऱ्या गोळ्यांच्या पॅॅकींगचे काम त्या करत होत्या. आजही हेच काम सुरू होते. त्यावेळी शॉॅर्टसर्कीट झाले. नेमकी याच विभागाला आग लागली. त्यामुळे तेथे काम करणाऱ्या महिलांचा मृत्यू झाला.

अर्चना कवडे, संगिता गोंदे, मंगल मोरगाळे, सुरेखा तुपे, सुमन ढेरे, सुनीता साठे, संगिता पोळेकर, माधूरी अंबोरे, मंदा कुलत,  त्रिशाला जाधव,  सीमा बोराडे, गीता दीवाडकर, शीतल खोपकर, सारिका कुडाळे, धनश्री शेलार अशी महिलांची नावे आहेत. 

एसव्हीएस ॲक्वा टेक्नॉलॉजीस ही कंपनी निंकुज शहा यांच्या मालकीची आहे. सुमारे दहा वर्षापूर्वी ही कंपनी सुरू झाली. पाणी शुध्द करण्यासाठीच्या गोळ्या बनविण्याचे काम येथे होते. मात्र, गेल्या दीड वर्षांपासून येथे सॅॅनीटायझर बनविले जात होते. पाणी शुध्द गोळ्या करण्यासाठी आरएम १ नावाचे रसायन वापरले जाते. ते अत्यंत ज्वालाग्रही आहे. त्याचे पॅकेजींग सुरू असताना शॉॅर्टसर्कीट झाल्याचा अंदाज आहे.

ज्वलनग्राही रसायनांचा वापरू असूनही नाही फायर सिस्टिम

एसव्हीएस ॲक्वा या कंपनीत ज्वलनग्राही रसायनांचा वापर होत होता. मात्र, तरीही या कंपनीत अग्निरोधक यंत्रणा (फायर सिस्टिम) नाही, असा आरोपही केला जात आहे.मृत्यूच्या आधी एकमेकांना कवटाळलेया कंपनीला लागेली आग इतकी भीषण होती की कंपनीच्या दरवाज्यातून प्रवेश करणे अवघड झाले होते. त्यामुळे कंपनीच्या पाठिमागील बाजूची असलेली भिंत जेसीबीच्या साहाय्यानं पाडून रस्ता करून आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला. तरी साधारणपणे दोन ते तीन तास अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र आग एवढी भीषण होती की ती नियंत्रणात येत नव्हती. संपूर्ण आग नियंत्रणात येताच या आगेमधून अठरा जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.

या मृतदेहांची अवस्था इतकी भयानक होते की हे मृतदेह स्त्रीयांचे आहेत की पुरूषांचे हे ओळखणेही कठीण झाले होते. हृदय हेलावून टाकणारी बाब म्हणजे चार मृतदेह एकमेकांना कवटाळलेल्या अवस्थेत आढळले. आगीत सापडल्यानंतर जीवाच्या आकांतने चौघांनी एकमेकांना मिठी मारली असावी, परंतु काळाने त्यांच्यावर घाला घातला. चौघांचेही मृतदेदह कवटाळालेल्या अवस्थेतच बाहेर काढण्यात आले. 

टॅग्स :PuneपुणेpirangutपिरंगुटfireआगFire Brigadeअग्निशमन दल