शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

घरातले अन्न, RO फिल्टरचे पाणी तरीही GBS ने गाठलं! मृताच्या कुटुंबियांकडून अनेक प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 16:41 IST

GBS Outbreak: औषध घेतल्यानंतर प्रकृती थोडी सुधारली आणि ११ जानेवारीला ते कुटुंबासह सोलापूरला रवाना झाले. 

पुणे -  पुणे - पुणे शहरात गुईलेन बॅरे सिंड्रोम या नव्या विषाणूचा शिरकाव झाल्याने नागरिकांमध्ये घबराट पसली आहे. या विषाणूचे आतापर्यंत १११ संशयित रुग्ण शहरात आढळले आहेत. या रुग्णांना गुईलेन बॅरे सिंड्रोमची बाधा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ०५ रुग्ण, पुणे महापालिका हद्दीत ८६, तर पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत १२ तसेच इतर जिल्ह्यातील ८ रुग्ण असे एकू्न १११ रुग्णांवर सध्या पुणे शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार सुरु आहेत. १११ रुग्णांमध्ये ७७ पुरुष रुग्ण तर ३४ महिला रुग्ण असून यापैकी १३ रुग्ण हे अतिदक्षता (व्हेंटीलेटर) विभागात आहेत, अशी माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली.दरम्यान, पुण्यातील धायरी परिसरातील 40 वर्षीय व्यक्तीला या आजाराची लागण झाली होती. त्यानंतर तो उपचारासाठी सोलापुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल झाला. मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. प्रवीण कल्लप्पा विभुते (वय ४०, रा. हत्तूर, ता. दक्षिण सोलापूर) असे मृताचे नाव आहे. ते पुण्यात चार्टर्ड अकाउंटंट म्हणून कार्यरत होते. त्यांच्या मृत्यूमुळे घरातील सर्वांचा धक्का बसला असून नेमका त्यांना हा आजार कसा झाला असा प्रश्न कुटूंबीयांकडून उपस्थित केला जात आहे.    एबीपी या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, प्रवीण यांच्या भावाने अनेक प्रश्न उपस्थित केले आहे. माध्यमांशी बोलतांना प्रशांत विभुते म्हणाले,'८ आणि ९ जानेवारी दरम्यान प्रविण यांना जुलाब आणि अशक्तपणा जाणवू लागला. औषध घेतल्यानंतर प्रकृती थोडी सुधारली आणि ११ जानेवारीला ते कुटुंबासह सोलापूरला रवाना झाले. त्यानंतर संक्रांतीचा सण व्यवस्थित पार पडला, पण १७ जानेवारीला प्रविण यांना अन्न गिळताना त्रास होऊ लागला. त्यांच्या पायांत जडपणा जाणवू लागल्याने त्यांच्या पत्नीने त्यांना तातडीने पुण्यातील एका हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र त्यांची प्रकृती झपाट्याने बिघडत गेली. काही दिवसांतच त्यांचे हात आणि पाय निकामी झाले. त्यानंतर त्यांना आयसीयूत दाखल करण्यात आले. तपासणीत त्यांना GBS असल्याचे निष्पन्न झाले. काही दिवसातच त्यांचा मृत्यू झाला.त्यांनी या दरम्यान घरीच बनवलेले अन्न खाल्ले असून घरातील स्वच्छ पाणी पिले होते. त्यांनी कधीच शिळे अन्न खाल्ले नव्हते. त्यांना हा आजार नेमका झाला कसा असा प्रश्न सध्या आमच्या मनात आहे.असेही प्रशांत विभुते यांनी सांगितले.या रुग्णाची जीबीएस आजारावर मातनिलेश अभंग या तरुणाने जीबीएस या आजारावर ४ महिन्यांनी मात केली. त्यानंतर लोकमतने अभंग यांच्या बरोबर संपर्क साधला असता त्यांनी या आजाराची कथा सांगितली. ते म्हणाले, हा काही आता नव्यानेच सुरू झालेला आजार नाही. मला तो १९ जानेवारी २०१९ मध्ये झाला होता. त्याच दिवशी पहाटे मला व्हेंटिलेटरवर ठेवावं लागलं. तिथून ३० मे २०१९ रोजी मी व्हेंटिलेटरवरून बाहेर आलो. तब्बल साडेचार महिने आयसीयूमध्ये काढले. मानेपासून पायाच्या तळव्यापर्यंत सगळं शरीर पॅरालाइज झालं होतं. फुप्फुसंही पूर्णपणे कमकुवत झाली होती, म्हणूनच व्हेंटिलेटरची गरज पडली. पण आता मी पूर्णपणे ठणठणीत झालो आहे. जे पॅरालाइज झालं होतं, ते फिजिओथेरपीमुळे पूर्वीसारखं झालं आहे. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWaterपाणीfoodअन्नHealthआरोग्यdoctorडॉक्टरDeathमृत्यू