शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup 2024 IND vs PAK Live Match : भारताचा अविश्वसनीय विजय, पाकिस्तानच्या जबड्यातून सामना खेचून आणला; शेजाऱ्यांचे स्पर्धेतून पॅकअप?
2
Narendra Modi Oath Ceremony : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नवीन मंत्रिमंडळ तयार; पाहा संपूर्ण यादी, महाराष्ट्रातून कोणी घेतली शपथ?
3
स्कॉटलंडच्या विजयाने गतविजेता इंग्लंड स्पर्धेबाहेर होण्याच्या मार्गावर! ब गटाचे विचित्र समीकरण 
4
मोठी बातमी! वैष्णोदेवीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांवर दहशतवादी हल्ला; 10 ठार, 33 जखमी
5
लोकसभेत पराभव, तरीही मोदी सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ; भाजपाने काँग्रेसमधून आलेल्या रवनीतसिंग बट्टू यांना दिली संधी
6
T20 World Cup 2024 IND vs PAK Live Match : मॅच सुरू असताना अनोखळी विमान मैदानावर उडाले अन् त्यावरील मॅसेज होतोय Viral
7
वडिलांच्या निधनाने राजकारणात प्रवेश अन् ३ टर्म खासदार; मोदींच्या मंत्रिमंडळातील सर्वात तरुण मंत्री!
8
राज्यमंत्रिपदाची 'ऑफर' नाकारली, प्रफुल्ल पटेलांनी शपथविधीकडेही पाठ फिरवली!
9
PM Modi Oath-Taking Ceremony : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर अमित शहांनी नाही, 'या' बड्या नेत्याने घेतली शपथ
10
T20 World Cup 2024 IND vs PAK Live Match : विसराळू रोहित शर्मा! Toss दरम्यान घडला मजेशीर किस्सा अन् पुन्हा पावसाचा मारा, Video 
11
PM Modi Oath-Taking Ceremony Live: मोदी 3.0 मध्ये 30 कॅबिनेट मंत्री; केरळमध्ये भाजपचे खाते उघडणारे सुरेश गोपी यांना मंत्रिपदाची संधी
12
चारवेळा मुख्यमंत्री, सहाव्यांदा खासदार; केंद्रात पहिल्यांदाच मंत्री झाले शिवराज सिंह चौहान
13
NCP : राष्ट्रवादीला केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्रिपद का नाही? प्रफुल्ल पटेल यांनी सगळंच सांगितलं
14
T20 World Cup 2024 IND vs PAK Live Match : पाऊस थांबला, खेळपट्टीची पाहणी झाली! सामन्याची वेळ अन् किती षटकांची मॅच तेही ठरलं
15
एकाचे वय 36 तर दुसऱ्याकडे 5000 कोटींची संपत्ती; केंद्रात TDP च्या 'या' दोन खासदारांना संधी
16
व्हीके पांडियन यांची राजकारणातून निवृत्ती; नवीन पटनायक आणि BJD ची मागितली माफी...
17
30 हजार पॅलेस्टाईन समर्थकांचा व्हाईट हाऊसला घेराव, जो बायडन यांच्या विरोधात निदर्शने
18
HDFC बँक ग्राहकांसाठी खुशखबर! EMI चा बोजा कमी होणार; वाचा बँकेचं प्लॅनिंग
19
'मातोश्री'कडून आमदार भास्कर जाधवांवर सोपवली मोठी जबाबदारी
20
Srishti Jain : "कोणाला उचलून घेऊन आलात?"; अभिनेत्री ढसाढसा रडली, सर्वांसमोर झालेला अपमान

गाेरक्षणासारखे पवित्र काम करणारा हिंसा कशी काय करु शकताे ? अमाेल पालेकरांचा संतप्त सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2018 6:06 PM

डाॅ. नरेंद्र दाभाेलकर यांच्या पाचव्या स्मतिदिनानिमित्त अायाेजित चर्चासत्रामध्ये ज्येष्ठ दिग्दर्शक अमाेल पालेकर यांनी अनेक सवाल उपस्थित केले.

पुणे : गोरक्षणासारखे पवित्र काम करणारा व्यक्ती एका माणसाची हिंसा कसा काय करू शकतो? आणि त्याच्या समर्थनासाठी 5 ते 6 हजार लोक कसे उभे राहू शकतात? असा संतप्त सवाल ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी उपस्थित केला. कुठलाही प्रश्न समोरच्या माणसाला विचारला तर तुम्ही गप्प बसा किंवा तुम्ही हा प्रश्न विचारताय म्हणजे तुम्ही सरकार विरोधी आणि देशद्रोही आहात असे एक चित्र उभे केले जात आहे. जोपर्यंत प्रश्न उपस्थित करीत नाही आणि  हे बरोबर नाही किंवा मग ते का बरोबर नाही असे पटवून द्या असा सरकारी व्यवस्थेला जाब विचारत नाही तोपर्यंत त्याला लोकशाही मानता येणार नाही, अशा शब्दातं त्यांनी सरकारवर टिकास्त्र सोडले.     ज्येष्ठ विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने सानेगुरूजी स्मारक येथे ’जबाब दो’ हा आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्यात आला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. 

    ते म्हणाले, डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर तपासात  काय प्रगती झाली? खूनी शोधण्यापासून कोण लोक यामागे आहेत? त्यांचे काय विचार आहेत?  हे सर्व कळायला पाच वर्षे उलटली, असा  विचार सर्वसामान्यांच्या मनात येतो. डॉ. दाभोळकर यांच्या हत्याप्रकरणातील दुस-या आरोपीला अटक झाल्यानंतर देशात असे वातावरण निर्माण झाले आहे की सगळे आता  छान झालय आणि संपल्यात जमा आहे.  पण माझ्या मते आता ख-या अर्थाने तपासाला सुरूवात झाली आहे. पाच वर्षामध्ये जर फक्त दोन जणांना अटक होऊ शकते. मग अशाच गतीने हा तपास चालणार आहे का?अजून  किती वर्ष चालणार? न्यायसंस्थेने तपासावर आणलेल्या प्रश्नचिन्हांमुळे आपण इथवर आलो आहोत. यामागे असलेली राजकीय प्रणाली, इच्छाशक्ती आणि दडपण याचा सामान्य माणूस म्हणून दुरस्थ विचार करायला पाहिजे. राजकीय पक्षाच्या पलीकडे जाऊन विचारप्रणालीवर होणारे हल्ले आपल्याला कसे थांबवता येतील याचा विचार केला पाहिजे. 

    विचारस्वातंत्र्याबददल जर प्रश्न विचारले तर त्याची मुस्कटदाबी होणार आहे का? विचारस्वातंत्र्य मागण्यासाठी जर चळवळी उभ्या राहिल्या, प्रश्न विचारले  तर त्याकडे देशद्रोह म्हणून पाहिले जाणार आहे का? असे काही प्रश्नही यावेळी पालेकर यांनी उपस्थित केले.  हे सर्व मुददे एका माणसाचे, कलावंताचे किंवा गटाचे असू शकत नाहीत तर ते सर्वांचे आहेत. फक्त ही कलावंत म्हणून माझी नव्हे तर सामान्य माणसाची मागणी आहे. प्रत्येक विचार त्याच्यापर्यंत जाताना दडपला न जाणे किंवा त्याच्यावर हल्ले न होणे यासाठी सामान्य माणसालाही विचारस्वातंत्र्य महत्वाचे आहे असे वाटत नाही तोपर्यंत हा लढा चालूच राहायला हवा. ही दडपशाही गांधींच्या खूनानंतर दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्यापर्यंत येऊन पोहोचली आहे. तरीही आता गप्प बसायचे का? ही लढाई आता युवापिढीला पुढे न्यायची आहे.  लोकशाहीमध्ये प्रश्न उपस्थित करणे आवश्यक आहे. एक सामान्य नागरिक,  विचार करणारा माणूस म्हणून हे करत राहायला हवे. ज्या आक्रमक पद्धतीने हे करू नका असे सांगितले जाते तितक्याच ठामपणे तरूणांनी प्रश्न विचारले पाहिजेत आणि ख-या उत्तरांची अपेक्षा केली पाहिजे . देशात  भीतीचे वातावरण का आहे? प्रश्न विचारण्यावर रोख का लावली जात आहे या प्रश्नाच्या मुळाशी जायला हवे असल्याचे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेNarendra Dabholkarनरेंद्र दाभोलकरAmol Palekarअमोल पालेकरnewsबातम्या