शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
13
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
14
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
15
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
16
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
17
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
18
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
20
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"

राज्याचे गृहमंत्री म्हणाले, "समीर वानखेडे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे"

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2022 5:17 PM

‘एनसीबी’चे तत्कालीन मुंबई प्रमुख समीर वानखेडे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे...

पिंपरी : अमली पदार्थ बाळगल्याच्या, त्याचे सेवन केल्याच्या प्रकरणी न्यायालयाने आर्यन खान याला क्लिनचीट दिली आहे. त्यामुळे आरोपपत्रातून (चार्जशीट) आर्यन खानचे नाव वगळण्यात आले आहे. अशा चुकीच्या पद्धतीने एखाद्या निष्पाप व्यक्तीला अडकविण्याचा प्रयत्न कोणी केला तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. याप्रकरणी ‘एनसीबी’चे तत्कालीन मुंबई प्रमुख समीर वानखेडे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली.

गृहमंत्री वळसे पाटील हे शनिवारी (दि. २८) चिंचवड येथे एका खासगी कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याने अमली पदार्थ बाळगून त्याचे सेवन केल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, सबळ पुराव्याअभावी त्याला न्यायालयाने निर्दोष सोडले. 

गृहमंत्री वळसे पाटील याबाबत म्हणाले, आर्यन खान याच्यावर जे आरोप केले गेले होते त्याच्यामध्ये काही तथ्य आढळले नाही. त्यामुळे चार्जशीटमधून आर्यन खानचे नाव वगळले. मला अस वाटतं की केंद्राने सुद्धा याची दखल घेतलेली आहे आणि संबंधिताविरुद्ध कारवाईची सूचना दिलेली आहे. अशा चुकीच्या पद्धतीने एखाद्या निष्पाप व्यक्तीला अडकविण्याचा प्रयत्न जर कोणी केला तर त्याला शिक्षा झाली पाहिजे. ती भूमिका आमचीसुद्धा राहील. मला असे वाटते की, वानखेडे यांच्यावर कारवाई होईल. त्यांनी ज्या पद्धतीने हे प्रकरण हाताळले आहे त्याबाबत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. 

राणा दाम्पत्याचा प्रश्न आंतरराष्ट्रीय नाही-खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांनी हनुमान चालीसा पठण करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोमणा मारला आहे. याबाबत विचारले असता गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, राणा दाम्पत्याचा आंतरराष्ट्रीय प्रश्न नाही. त्यामुळे त्याला एवढे महत्व द्यायची गरज नाही.

टॅग्स :PuneपुणेSameer Wankhedeसमीर वानखेडेDilip Walse Patilदिलीप वळसे पाटीलAryan Khanआर्यन खान