शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

आगळ्यावेगळ्या प्रयोगाने पवित्र इंद्रायणी जलपर्णीमुक्त!

By admin | Updated: June 6, 2016 00:37 IST

नद्यांमधील जलपर्णीचा विळखा हा सगळीकडेच डोकेदुखीचा विषय ठरत असताना अलंकापुरीतील पवित्र इंद्रायणीला मात्र आगळ्या-वेगळ्या यशस्वी प्रयोगाद्वारे जलपर्णीमुक्त करण्यात यश आले

भानुदास पऱ्हाड,  शेलपिंपळगाव नद्यांमधील जलपर्णीचा विळखा हा सगळीकडेच डोकेदुखीचा विषय ठरत असताना अलंकापुरीतील पवित्र इंद्रायणीला मात्र आगळ्या-वेगळ्या यशस्वी प्रयोगाद्वारे जलपर्णीमुक्त करण्यात यश आले आहे. हे स्वच्छतेचे मॉडेल याच पद्धतीने राज्यातही राबवल्यास नद्या जलपर्णीतून मुक्त होऊन मोकळा श्वास घेऊ शकतील. पुणे जिल्ह्यातील बहुतांशी सर्वच नद्यांच्या पात्रातील पाण्याला जलपर्णीचा विळखा आहे. जलपर्णीचे दुष्परिणाम लक्षात घेऊन प्रशासनाने ती हटविण्यासाठी प्रयत्नही केले. परंतु जलपर्णीचा गुंतत चाललेला विळखा कायमस्वरूपी सोडविण्यात प्रशासनाला अपयश येत आहे. मात्र याला अपवाद ठरला तो आळंदी नगरपरिषदेचे पाणीपुरवठा विभाग प्रमुख दत्तात्रय भगवानराव सोनटक्के यांनी केलेल्या प्रयोगाचा. इंद्रायणीच्या पाणीपात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी पसरलेली होती. सोनटक्के यांनी एक अनोखी शक्कल लढविली आणि ते त्यात यशस्वीही झाले. इंद्रायणीच्या संपूर्ण पात्राला पुरेल इतके सुमारे १२५ प्लास्टीकचे रिकामे ड्रम आणले. त्यांना सळइने भोके पाडण्यात आली. एक इंचाचा वायररोप नदीच्या एका बाजूला घट्ट करून पाणी साठवण बंधाऱ्याच्या सुमारे ६०० मीटर अंतर दूर त्याला नदीच्या दुसऱ्या तीरावर पसरविण्यात आले. त्यानंतर एका पाठोपाठ एक ड्रम रोपमध्ये ओवून ती बाजू क्रेनच्या साह्याने उंचावून ड्रमचा हार बनविण्यात आला. नदीच्या पाण्यावर या हाराला पसरविण्यात आले. मधोमध होल केल्याने ते अर्धे पाण्यात तरंगत राहिल्याने जलपर्णीला ड्रमच्या हाराचा आपोआप अडथळा निर्माण झाला. त्यानंतर पाणीसाठवण बंधाऱ्याचे काही दरवाजे खुले करून उरलेल्या ६०० मीटर अंतरातील जलपर्णी सलग चार - पाच दिवस आदिवासी मजुरांनी मोठ्या मेहनतीने बांबू, लोखंडी हुक, लोखंडी आकडे आदी अवजारांच्या साह्याने पाण्यापासून दूर करून पात्र जलपर्णीमुक्त केले. सध्या इंद्रायणी नदीचे पात्र जलपर्णी विरहित असून, पात्रात स्वच्छ पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे चालू वर्षी पंढरपूर आषाढी पायीवारीसाठी आलेल्या माऊलीभक्तांना दुगंर्धीमुक्त पाण्यात पवित्र स्नान करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. इतरांनीही राबवावा असा प्रयोगवारंवार प्रयत्न करूनही जलपर्णीचा तिढा सुटत नव्हता. परिणामी शहरातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. पाणीपुरवठा विस्कळीत होत होता. अखेर खूप विचार करून हा प्रयोग निश्चित करून अमलात आणायचे ठरवले. सर्वांच्या सहकार्याने हा प्रयोग यशस्वी झाला आहे. इतरांनी हा प्रयोग राबवून नद्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे.- दत्तात्रय सोनटक्के, पाणीपुरवठा विभागप्रमुख, आळंदी नगर परिषद