शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महामार्ग पुणे-सातारा...प्रवासाचे मात्र तीन तेरा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 06:30 IST

महामार्गावर पडलेले मोठमोठे खड्डे, जागोजागी दुभाजक तुटलेले, मोºयांना कठडे नाहीत, नवीन पुलांचे व भुयारी मार्गाचे सर्व्हिस रोडचे रेंगाळलेले काम, दिशादर्शक सूचनाफलक नाहीत यामुळे सततची वाहतूककोंडी आणि वारंवार अपघात होता.

सूर्यकांत किंद्रे भोर : महामार्गावर पडलेले मोठमोठे खड्डे, जागोजागी दुभाजक तुटलेले, मोºयांना कठडे नाहीत, नवीन पुलांचे व भुयारी मार्गाचे सर्व्हिस रोडचे रेंगाळलेले काम, दिशादर्शक सूचनाफलक नाहीत यामुळे सततची वाहतूककोंडी आणि वारंवार अपघात होता. मागील एका वर्षात सुमारे ८८ अपघात झाले आहेत. त्यांत सुमारे ४७ जणांचा मृत्यू झाला. यामुळे पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरून शिंदेवाडी ते सारोळ्यादरम्यान प्रवास करणे म्हणजे जीव मुठीत धरून अडथळ्यांची शर्यत पार करण्यासारखी अवस्था आहे.पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गाचे काम २००४मध्ये, तर सहापदरीकरणाचे काम २०१०मध्ये सुरू झाले. मात्र, मागील ७ वर्षांपासून शिंदेवाडी ते सारोळ्यादरम्याची रस्ते, सर्व्हिस मार्ग, पुलांची व भुयारी मार्गाची कामे अपूर्ण आहेत. या मार्गावर अपघातांची मालकी सतत सुरू असते. मागील ७ वर्षांत ६६८ अपघातांमध्ये ३४५ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अनेकांना कायमचे अपंगत्व आले असून, अनेक जण जखमी झाले आहेत. मात्र, तरीही महामार्ग प्राधिकरणाला जाग आली नाही.महामार्गावर रस्त्यालगत असलेल्या अनेक गावांना जाण्या-येण्यासाठी अनेक ठिकाणी उड्डाणपुलांची कामे सुरू असून ती अर्धवट आहेत. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक अनेक ठिकाणी सेवा रस्त्यावरून वळवली आहे. याबाबतचे सूचनाफलक नाहीत. झेब्रा कॉसिंग नाहीत. रस्त्याला मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. त्यांत पाणी साचल्याने रस्त्याचा अंदाज येत नसल्याने वारंवार अपघात घडत आहेत. पुणे-सातारा महामार्गाच्या देहूरोड ते साताºयादरम्यानच्या १४० किमीच्या चौपदरीकरणासाठी १९९९ मध्ये ६० मीटरचे भूसंपादन केले. प्रत्यक्षात कामाला सुरुवात २००४मध्ये झाली.काम पूर्ण झाल्यावर २०१०मध्ये सहापदरीकरणाचे काम सुरू झाले. डीबीएफओटी तत्त्वावर केंद्र सरकारने रिलायन्स इन्फ्र ा कंपनीला १७२४ कोटी रुपयांना ठेका दिला. त्याबदल्यात खेड-शिवापूर येथील व आणेवाडी येथील टोलवर २०३४ पर्यंत टोलवसुली करण्याची परवानगी देण्यात आली. या टोलमधून दर वर्षी महामार्ग प्राधिकरणाला ९० कोटी रुपये प्रिमियम मिळणार आहे. यात दर वर्षी ५ टक्के वाढ होणार.सदर रोडचे काम २०१३पर्यंत पूर्ण करण्याची अट होती; मात्र २०१७ संपायला आले तरीही अद्याप काम अपूर्णच आहे आणि काम पूर्ण होण्याआधीच ४० टक्के टोलवाढ करण्यात आली आहे. मात्र, ना रस्ता चांगला, ना सुखकर प्रवास आणि तरीही टोलवाढीचा भुर्दंड वाहनचालकांना सोसावा लागत आहे. महामार्गावर अत्यंत रेंगाळलेल्या अवस्थेत कामे असल्याने वाहतुकीला अडथळा तर होत आहेच; शिवाय रात्रीअपरात्री लहानमोठे अपघातही होत आहेत.सूर्यकांत किंद्रे ।लोकमत न्यूज नेटवर्कभोर : महामार्गावर पडलेले मोठमोठे खड्डे, जागोजागी दुभाजक तुटलेले, मोºयांना कठडे नाहीत, नवीन पुलांचे व भुयारी मार्गाचे सर्व्हिस रोडचे रेंगाळलेले काम, दिशादर्शक सूचनाफलक नाहीत यामुळे सततची वाहतूककोंडी आणि वारंवार अपघात होता. मागील एका वर्षात सुमारे ८८ अपघात झाले आहेत. त्यांत सुमारे ४७ जणांचा मृत्यू झाला. यामुळे पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरून शिंदेवाडी ते सारोळ्यादरम्यान प्रवास करणे म्हणजे जीव मुठीत धरून अडथळ्यांची शर्यत पार करण्यासारखी अवस्था आहे.पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गाचे काम २००४मध्ये, तर सहापदरीकरणाचे काम २०१०मध्ये सुरू झाले. मात्र, मागील ७ वर्षांपासून शिंदेवाडी ते सारोळ्यादरम्याची रस्ते, सर्व्हिस मार्ग, पुलांची व भुयारी मार्गाची कामे अपूर्ण आहेत. या मार्गावर अपघातांची मालकी सतत सुरू असते. मागील ७ वर्षांत ६६८ अपघातांमध्ये ३४५ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अनेकांना कायमचे अपंगत्व आले असून, अनेक जण जखमी झाले आहेत. मात्र, तरीही महामार्ग प्राधिकरणाला जाग आली नाही.महामार्गावर रस्त्यालगत असलेल्या अनेक गावांना जाण्या-येण्यासाठी अनेक ठिकाणी उड्डाणपुलांची कामे सुरू असून ती अर्धवट आहेत. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक अनेक ठिकाणी सेवा रस्त्यावरून वळवली आहे. याबाबतचे सूचनाफलक नाहीत. झेब्रा कॉसिंग नाहीत. रस्त्याला मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. त्यांत पाणी साचल्याने रस्त्याचा अंदाज येत नसल्याने वारंवार अपघात घडत आहेत. पुणे-सातारा महामार्गाच्या देहूरोड ते साताºयादरम्यानच्या १४० किमीच्या चौपदरीकरणासाठी १९९९ मध्ये ६० मीटरचे भूसंपादन केले. प्रत्यक्षात कामाला सुरुवात २००४मध्ये झाली.काम पूर्ण झाल्यावर २०१०मध्ये सहापदरीकरणाचे काम सुरू झाले. डीबीएफओटी तत्त्वावर केंद्र सरकारने रिलायन्स इन्फ्र ा कंपनीला १७२४ कोटी रुपयांना ठेका दिला. त्याबदल्यात खेड-शिवापूर येथील व आणेवाडी येथील टोलवर २०३४ पर्यंत टोलवसुली करण्याची परवानगी देण्यात आली. या टोलमधून दर वर्षी महामार्ग प्राधिकरणाला ९० कोटी रुपये प्रिमियम मिळणार आहे. यात दर वर्षी ५ टक्के वाढ होणार.सदर रोडचे काम २०१३पर्यंत पूर्ण करण्याची अट होती; मात्र २०१७ संपायला आले तरीही अद्याप काम अपूर्णच आहे आणि काम पूर्ण होण्याआधीच ४० टक्के टोलवाढ करण्यात आली आहे. मात्र, ना रस्ता चांगला, ना सुखकर प्रवास आणि तरीही टोलवाढीचा भुर्दंड वाहनचालकांना सोसावा लागत आहे. महामार्गावर अत्यंत रेंगाळलेल्या अवस्थेत कामे असल्याने वाहतुकीला अडथळा तर होत आहेच; शिवाय रात्रीअपरात्री लहानमोठे अपघातही होत आहेत.