शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

महामार्ग पुणे-सातारा...प्रवासाचे मात्र तीन तेरा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 06:30 IST

महामार्गावर पडलेले मोठमोठे खड्डे, जागोजागी दुभाजक तुटलेले, मोºयांना कठडे नाहीत, नवीन पुलांचे व भुयारी मार्गाचे सर्व्हिस रोडचे रेंगाळलेले काम, दिशादर्शक सूचनाफलक नाहीत यामुळे सततची वाहतूककोंडी आणि वारंवार अपघात होता.

सूर्यकांत किंद्रे भोर : महामार्गावर पडलेले मोठमोठे खड्डे, जागोजागी दुभाजक तुटलेले, मोºयांना कठडे नाहीत, नवीन पुलांचे व भुयारी मार्गाचे सर्व्हिस रोडचे रेंगाळलेले काम, दिशादर्शक सूचनाफलक नाहीत यामुळे सततची वाहतूककोंडी आणि वारंवार अपघात होता. मागील एका वर्षात सुमारे ८८ अपघात झाले आहेत. त्यांत सुमारे ४७ जणांचा मृत्यू झाला. यामुळे पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरून शिंदेवाडी ते सारोळ्यादरम्यान प्रवास करणे म्हणजे जीव मुठीत धरून अडथळ्यांची शर्यत पार करण्यासारखी अवस्था आहे.पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गाचे काम २००४मध्ये, तर सहापदरीकरणाचे काम २०१०मध्ये सुरू झाले. मात्र, मागील ७ वर्षांपासून शिंदेवाडी ते सारोळ्यादरम्याची रस्ते, सर्व्हिस मार्ग, पुलांची व भुयारी मार्गाची कामे अपूर्ण आहेत. या मार्गावर अपघातांची मालकी सतत सुरू असते. मागील ७ वर्षांत ६६८ अपघातांमध्ये ३४५ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अनेकांना कायमचे अपंगत्व आले असून, अनेक जण जखमी झाले आहेत. मात्र, तरीही महामार्ग प्राधिकरणाला जाग आली नाही.महामार्गावर रस्त्यालगत असलेल्या अनेक गावांना जाण्या-येण्यासाठी अनेक ठिकाणी उड्डाणपुलांची कामे सुरू असून ती अर्धवट आहेत. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक अनेक ठिकाणी सेवा रस्त्यावरून वळवली आहे. याबाबतचे सूचनाफलक नाहीत. झेब्रा कॉसिंग नाहीत. रस्त्याला मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. त्यांत पाणी साचल्याने रस्त्याचा अंदाज येत नसल्याने वारंवार अपघात घडत आहेत. पुणे-सातारा महामार्गाच्या देहूरोड ते साताºयादरम्यानच्या १४० किमीच्या चौपदरीकरणासाठी १९९९ मध्ये ६० मीटरचे भूसंपादन केले. प्रत्यक्षात कामाला सुरुवात २००४मध्ये झाली.काम पूर्ण झाल्यावर २०१०मध्ये सहापदरीकरणाचे काम सुरू झाले. डीबीएफओटी तत्त्वावर केंद्र सरकारने रिलायन्स इन्फ्र ा कंपनीला १७२४ कोटी रुपयांना ठेका दिला. त्याबदल्यात खेड-शिवापूर येथील व आणेवाडी येथील टोलवर २०३४ पर्यंत टोलवसुली करण्याची परवानगी देण्यात आली. या टोलमधून दर वर्षी महामार्ग प्राधिकरणाला ९० कोटी रुपये प्रिमियम मिळणार आहे. यात दर वर्षी ५ टक्के वाढ होणार.सदर रोडचे काम २०१३पर्यंत पूर्ण करण्याची अट होती; मात्र २०१७ संपायला आले तरीही अद्याप काम अपूर्णच आहे आणि काम पूर्ण होण्याआधीच ४० टक्के टोलवाढ करण्यात आली आहे. मात्र, ना रस्ता चांगला, ना सुखकर प्रवास आणि तरीही टोलवाढीचा भुर्दंड वाहनचालकांना सोसावा लागत आहे. महामार्गावर अत्यंत रेंगाळलेल्या अवस्थेत कामे असल्याने वाहतुकीला अडथळा तर होत आहेच; शिवाय रात्रीअपरात्री लहानमोठे अपघातही होत आहेत.सूर्यकांत किंद्रे ।लोकमत न्यूज नेटवर्कभोर : महामार्गावर पडलेले मोठमोठे खड्डे, जागोजागी दुभाजक तुटलेले, मोºयांना कठडे नाहीत, नवीन पुलांचे व भुयारी मार्गाचे सर्व्हिस रोडचे रेंगाळलेले काम, दिशादर्शक सूचनाफलक नाहीत यामुळे सततची वाहतूककोंडी आणि वारंवार अपघात होता. मागील एका वर्षात सुमारे ८८ अपघात झाले आहेत. त्यांत सुमारे ४७ जणांचा मृत्यू झाला. यामुळे पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरून शिंदेवाडी ते सारोळ्यादरम्यान प्रवास करणे म्हणजे जीव मुठीत धरून अडथळ्यांची शर्यत पार करण्यासारखी अवस्था आहे.पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गाचे काम २००४मध्ये, तर सहापदरीकरणाचे काम २०१०मध्ये सुरू झाले. मात्र, मागील ७ वर्षांपासून शिंदेवाडी ते सारोळ्यादरम्याची रस्ते, सर्व्हिस मार्ग, पुलांची व भुयारी मार्गाची कामे अपूर्ण आहेत. या मार्गावर अपघातांची मालकी सतत सुरू असते. मागील ७ वर्षांत ६६८ अपघातांमध्ये ३४५ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अनेकांना कायमचे अपंगत्व आले असून, अनेक जण जखमी झाले आहेत. मात्र, तरीही महामार्ग प्राधिकरणाला जाग आली नाही.महामार्गावर रस्त्यालगत असलेल्या अनेक गावांना जाण्या-येण्यासाठी अनेक ठिकाणी उड्डाणपुलांची कामे सुरू असून ती अर्धवट आहेत. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक अनेक ठिकाणी सेवा रस्त्यावरून वळवली आहे. याबाबतचे सूचनाफलक नाहीत. झेब्रा कॉसिंग नाहीत. रस्त्याला मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. त्यांत पाणी साचल्याने रस्त्याचा अंदाज येत नसल्याने वारंवार अपघात घडत आहेत. पुणे-सातारा महामार्गाच्या देहूरोड ते साताºयादरम्यानच्या १४० किमीच्या चौपदरीकरणासाठी १९९९ मध्ये ६० मीटरचे भूसंपादन केले. प्रत्यक्षात कामाला सुरुवात २००४मध्ये झाली.काम पूर्ण झाल्यावर २०१०मध्ये सहापदरीकरणाचे काम सुरू झाले. डीबीएफओटी तत्त्वावर केंद्र सरकारने रिलायन्स इन्फ्र ा कंपनीला १७२४ कोटी रुपयांना ठेका दिला. त्याबदल्यात खेड-शिवापूर येथील व आणेवाडी येथील टोलवर २०३४ पर्यंत टोलवसुली करण्याची परवानगी देण्यात आली. या टोलमधून दर वर्षी महामार्ग प्राधिकरणाला ९० कोटी रुपये प्रिमियम मिळणार आहे. यात दर वर्षी ५ टक्के वाढ होणार.सदर रोडचे काम २०१३पर्यंत पूर्ण करण्याची अट होती; मात्र २०१७ संपायला आले तरीही अद्याप काम अपूर्णच आहे आणि काम पूर्ण होण्याआधीच ४० टक्के टोलवाढ करण्यात आली आहे. मात्र, ना रस्ता चांगला, ना सुखकर प्रवास आणि तरीही टोलवाढीचा भुर्दंड वाहनचालकांना सोसावा लागत आहे. महामार्गावर अत्यंत रेंगाळलेल्या अवस्थेत कामे असल्याने वाहतुकीला अडथळा तर होत आहेच; शिवाय रात्रीअपरात्री लहानमोठे अपघातही होत आहेत.