शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

उच्चशिक्षित नवविवाहित दाम्पत्याने उचलले टोकाचे पाऊल; कालव्यात उडी मारून संपवले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 16:12 IST

वारुळवाडी हद्दीतून जाणाऱ्या डिंभे डाव्या कालवा परिसरात आपल्या दुचाकीवरून आले नई अचानक वाहत्या पाण्यात उडी मारली

जुन्नर : वारूळवाडी हद्दीतून जाणाऱ्या डिंभे डावा कालव्यात उच्चशिक्षित दाम्पत्याने उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि. १) सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. यापैकी चिराग शेळके याचा मृतदेह कालव्यातून काढण्यात बुधवारी यश आले, तर पल्लवी शेळके यांचा गुरुवारी (दि. २ ) मृतदेह मिळून आला. या दाम्पत्याने अंतर्गत वादातून आत्महत्या केल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली. या घटनेने नारायणगाव व वारुळवाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दाम्पत्याचा नुकताच विवाह झाल्याची माहिती समोर आली आहे. 

चिराग चंद्रशेखर शेळके (वय २८) व त्यांची पत्नी पल्लवी चिराग शेळके (२५, रा. वारुळवाडी अभंगवस्ती, ता. जुन्नर) हे सध्या पुण्यात वास्तव्यास होते. चिराग आणि पल्लवी यांचे १ एप्रिल २०२४ ला लग्न झाले होते. चिराग हा आयटी कंपनीत नोकरीला होता आणि पल्लवी एका नामवंत कॉलेजमध्ये शिक्षिका होत्या. सुटीमुळे ते गावी आले होते.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी चिराग शेळके व त्यांची पत्नी पल्लवी शेळके हे बुधवारी सायंकाळच्या सुमारास वारुळवाडी हद्दीतून जाणाऱ्या डिंभे डाव्या कालवा परिसरात आपल्या दुचाकीवरून आले. त्या दोघांनी गाडी कालव्याच्या बाजूला लावली. हे जोडपे चर्चा करत असताना अचानक कालव्याच्या वाहत्या पाण्यात त्यांनी उडी घेतली. त्यावेळी डिंभे कालव्याला पाण्याचा विसर्ग सोडला होता. त्यामुळे ते दोघे पाण्यात वाहून गेले. याची माहिती फिरण्यासाठी आलेल्या काही प्रत्यक्षदर्शींनी दिली. या घटनेची माहिती सरपंच राजेंद्र मेहेर यांनी पोलिसांना दिली. घटनास्थळी नारायणगाव पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक महादेव शेलार, संतोष कोकणे, हवालदार काळुराम साबळे, सुभाष थोरात, पोलिस पाटील भुजबळ आले. स्थानिक तरुणांच्या मदतीने शोध घेतला.

टॅग्स :PuneपुणेJunnarजुन्नरPoliceपोलिसDeathमृत्यूmarriageलग्नhusband and wifeपती- जोडीदार