शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

उच्चशिक्षित नवविवाहित दाम्पत्याने उचलले टोकाचे पाऊल; कालव्यात उडी मारून संपवले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 16:12 IST

वारुळवाडी हद्दीतून जाणाऱ्या डिंभे डाव्या कालवा परिसरात आपल्या दुचाकीवरून आले नई अचानक वाहत्या पाण्यात उडी मारली

जुन्नर : वारूळवाडी हद्दीतून जाणाऱ्या डिंभे डावा कालव्यात उच्चशिक्षित दाम्पत्याने उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि. १) सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. यापैकी चिराग शेळके याचा मृतदेह कालव्यातून काढण्यात बुधवारी यश आले, तर पल्लवी शेळके यांचा गुरुवारी (दि. २ ) मृतदेह मिळून आला. या दाम्पत्याने अंतर्गत वादातून आत्महत्या केल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली. या घटनेने नारायणगाव व वारुळवाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दाम्पत्याचा नुकताच विवाह झाल्याची माहिती समोर आली आहे. 

चिराग चंद्रशेखर शेळके (वय २८) व त्यांची पत्नी पल्लवी चिराग शेळके (२५, रा. वारुळवाडी अभंगवस्ती, ता. जुन्नर) हे सध्या पुण्यात वास्तव्यास होते. चिराग आणि पल्लवी यांचे १ एप्रिल २०२४ ला लग्न झाले होते. चिराग हा आयटी कंपनीत नोकरीला होता आणि पल्लवी एका नामवंत कॉलेजमध्ये शिक्षिका होत्या. सुटीमुळे ते गावी आले होते.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी चिराग शेळके व त्यांची पत्नी पल्लवी शेळके हे बुधवारी सायंकाळच्या सुमारास वारुळवाडी हद्दीतून जाणाऱ्या डिंभे डाव्या कालवा परिसरात आपल्या दुचाकीवरून आले. त्या दोघांनी गाडी कालव्याच्या बाजूला लावली. हे जोडपे चर्चा करत असताना अचानक कालव्याच्या वाहत्या पाण्यात त्यांनी उडी घेतली. त्यावेळी डिंभे कालव्याला पाण्याचा विसर्ग सोडला होता. त्यामुळे ते दोघे पाण्यात वाहून गेले. याची माहिती फिरण्यासाठी आलेल्या काही प्रत्यक्षदर्शींनी दिली. या घटनेची माहिती सरपंच राजेंद्र मेहेर यांनी पोलिसांना दिली. घटनास्थळी नारायणगाव पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक महादेव शेलार, संतोष कोकणे, हवालदार काळुराम साबळे, सुभाष थोरात, पोलिस पाटील भुजबळ आले. स्थानिक तरुणांच्या मदतीने शोध घेतला.

टॅग्स :PuneपुणेJunnarजुन्नरPoliceपोलिसDeathमृत्यूmarriageलग्नhusband and wifeपती- जोडीदार