शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
4
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
5
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
6
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
7
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
8
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
9
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
10
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
11
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
12
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
13
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
14
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
15
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
16
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
17
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
18
भारतात फुलटाइम स्टॉक ट्रेडर बनण्यासाठी जवळ किती पैसे असायला पाहिजे?
19
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
20
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला

लपविलेले तिसरे अपत्य उघडच; वर्ष लोटले तरी कारवाई नाहीच, मुळशी तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 10:45 IST

महिला १०० मतांनी निवडून आल्यानंतर बाकी उमेदवारांनी ३ अपत्ये असल्याचा आरोप केला होता

पुणे: दोनपेक्षा जास्त अपत्ये असल्यास त्या व्यक्तीला शासनाच्या कोणत्याही योजनांचा लाभ घेता येत नाही; शिवाय निवडणूक लढविण्याचा अधिकारसुद्धा नसल्याचा कायदा करण्यात आला आहे. मात्र, तिसऱ्या अपत्याची माहिती न देता निवडणूक लढवून सरपंच बनलेल्या व्यक्तीबाबतचे पुरावे उघड झाल्यानंतरही गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्यावर ना कारवाई होत आहे ना चौकशी अहवालावर निकाल दिला जात आहे.

ही घटना आहे मुळशी तालुक्यातील साठेसाई या गावातील. मुळशी तालुक्यातील साठेसाई ग्रामपंचायतीत ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यासाठी पोटच्या पोराला जगापासून लपविण्याचा प्रयत्न झाला केला. ही बाब गटविकास अधिकाऱ्यांच्या तपासणी अहवालात उघड झाली आहे. याबाबतचा अहवाल गटविकास अधिकाऱ्यांकडून जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडे पाठविण्यात आला असून, तेथून तो जिल्हाधिकारी कार्यालयाकडेही गेला. मात्र, त्याच्यावर पुढे काहीच कार्यवाही झाली नसल्याची माहिती गटविकास अधिकारी एस. पी. भागवत यांनी दिली.

सुमन ऊर्फ दीपाली प्रवीण साठे (सरपंच, साठेसाई ग्रामपंचायत) असे ठपका ठेवण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, साठेसाई ग्रामपंचायतीची निवडणूक जानेवारी २०२१ मध्ये झाली होती. त्यामध्ये सुमन ऊर्फ दीपाली प्रवीण साठे यांनी मोनिका सहादू खिलारे यांचा सुमारे शंभर मतांनी पराभव केला. त्यानंतर सरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीतही त्या निवडून आल्या. त्यानंतर मोनिका खिलारे आणि सुमित्रा यादव यांनी सुमन ऊर्फ दीपाली यांना २००१ नंतर तीन अपत्ये असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर त्यांनी माहितीच्या अधिकाराखाली दीपाली साठे यांच्या अपत्यांचे पुरावे जमा करण्यास सुरुवात केली. चार वर्षांनंतर सुमन ऊर्फ दीपाली यांच्या तीन मुलांच्या जन्मदाखल्यांचा पुरावा माहिती अधिकाराखाली रुग्णालयांनी सादर केला. त्यानुसार २३ जानेवारी रोजी मोनिका खिलारे यांनी पहिली तक्रार जिल्हाधिकारी कार्यालयात केली.

तक्रारीनुसार या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले. मुळशी पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली. त्यानुसार त्यांनी दोन्ही पक्षांचे जबाब घेतले; मात्र, प्रत्येक जबाबावेळी सुमन ऊर्फ दीपाली साठे या गैरहजर राहिल्या. त्यांनी वेळोवेळी पुढची तारीख मागून घेतली. मात्र, वारंवार त्या सुनावणीवेळी साठे अनुपस्थितीत होत्या. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध असलेले पुरावे लक्षात घेऊन व कुटुंबीयांची चौकशी करून विस्तार अधिकारी यांनी त्यांचा अहवाल गटविकास अधिकारी यांना दिला. त्यानंतर गटविकास अधिकारी यांनीही याबाबत सुनावणी घेऊन व पुरावे तपासून दीपाली साठे यांना २००१ नंतर तीन अपत्ये असल्याचे दिसून येत असल्याचा तब्बल ११६ पानांचा अहवाल दिला.

भिवंडी दवाखान्यात मिळाले जन्मदाखले

सुमन ऊर्फ दीपाली साठे यांना हर्ष, साई आणि अनुष्का अशी अपत्ये असून, या तिघांचा जन्मदाखला पुरावा म्हणून सादर करण्यात आला आहे. या तिन्ही अपत्यांचा जन्म भिवंडी निजामपूर येथील दवाखान्यात झाला असून, यातील अनुष्काचा जन्म २००७ साली, साईचा जन्म २००८ साली तर हर्षचा जन्म २०१० साली झाला आहे. त्याचे जन्म प्रमाणपत्रही या अहवालात जोडण्यात आले आहे.

टॅग्स :Puneपुणेgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक 2024WomenमहिलाFamilyपरिवारSocialसामाजिक