शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

अरेच्चा ! तुम्हांला वाटेल ‘येथे ’लॉकडाऊन नाही; पण आहे फक्त ' या 'नागरिकांना तो मान्य नाही....

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2020 14:46 IST

पुणे- सोलापूर महामार्गावर बेकायदेशीरपणे व्यापाऱ्यांनी विक्री सुरू ठेऊन नियम धाब्यावर बसवले आहेत.

ठळक मुद्देया गावांपासून पुणे शहर जवळ असल्याने शहरातील भाजीपाला व्यापारी याठिकाणी खरेदीसाठी येतात

- पंढरीनाथ नामुगडेपुणे : कोरोनाला सामोरे जाण्यासाठी सरकार, प्रशासन , आरोग्य विभाग आणि समाजसेवी संस्था अतोनात मेहनत करत आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळा असे वारंवार सातत्याने सांगण्यात येत आहे. आणि हाच एकमेव उपाय आहे ज्याद्वारे कोरोनाला वाढता प्रादुर्भाव रोखला जाऊ शकतो. पण सांगितलेले लगेच ऐकेल ती जनता कसली... हेच चित्र मंगळवारी सकाळी पुणे- सोलापूर महामार्गावर कदमवाकवस्ती (ता.हवेली) परिसरात पाहायला मिळाले. सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळा या आवाहनाला पायदळी तुडवत तिथे भरणाऱ्या बाजारात मोठ्या प्रमाणात नागरिक खरेदीसाठी एकत्र येतात. यावेळी मोठ्या संख्येने ट्रक, टेम्पो, रिक्षांची याठिकाणी गर्दी होत आहे.

पुणे- सोलापूर महामार्गावर बेकायदेशीरपणे व्यापाऱ्यांनी विक्री सुरू ठेऊन नियम धाब्यावर बसवले आहेत.या ठिकाणी असलेले विक्रेते मास्क, ग्लोज न लावता बिनधास्त परिसरात वावरत असल्याचे दिसून येते. पूर्व हवेलीतील कदमवाकवस्ती,लोणी काळभोर ह्या गावात भाजीपाला जास्त प्रमाणात पिकवला जातो.त्यामुळे येथील स्थानिक शेतकरी आपला माल याठिकाणी विकण्यास घेऊन येत आहेत. आणि या गावांपासून पुणे शहर जवळ असल्याने शहरातील भाजीपाला व्यापारी याठिकाणी खरेदीसाठी येत आहेत.मात्र सर्वत्र कोरोनाची प्रचंड दहशत असताना आणि सुरक्षित अंतर राखून खरेदी - विक्रीचे व्यवहार करण्याची काळजी घेतली जात असताना या भागात भाजी खरेदीसाठी लोकांची झुंबड उडाल्याने एकच चिंता व्यक्त होत आहे. सुदैवाने पूर्व हवेली परिसरात कोरोनाच्या रुग्ण आढळलेला नाही ही जमेची बाजू असताना सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे.परंतु व्यापाऱ्यांकडून जराही पालन होताना दिसत नसल्याचे चित्र दिसत आहे.कदमवाकवस्ती ग्रामपंचायतच्या वतीने (दि.४ ते ६एप्रिल) या तीन दिवसाकरिता संपूर्ण गाव लॉकडाऊन करण्यात आलेले होते.हा लॉक डाऊन सुरू करण्याअगोदर सर्व नागरिकांना जीवनावश्यक वस्तू घेऊन ठेवा असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले होते.लॉक डाऊनच्या दरम्यान कोणीही किराणा,मेडिकल व इतर जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठी सुद्धा बाहेर येऊ नये असे सांगण्यात आले होते.परंतु, आज ग्रामपंचायतीच्या वतीने केलेल्या तीन दिवसांचा लॉकडाऊन संपल्यावर शेतकरी व व्यापाऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंगला फाटा देत पुणे सोलापूर महामार्गावरील टोल नाक्याजवळ मोठ्या प्रमाणात गर्दी करत बाजार भरवल्याने तीन दिवसांच्या लॉकडाऊनवर पाणी फिरल्याची चर्चा होत आहे.  शेतातला माल विक्रीसाठी तयार असून तो विकला नाही तर शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान होत आहे.शासनाने आमच्यासाठी काही तरी नियमावली काढावी. जेणेकरून शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही.असे मत शेतकऱ्यांनी यावेळी मांडले.

टॅग्स :PuneपुणेLoni Kalbhorलोणी काळभोरFarmerशेतकरीbusinessव्यवसायCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhighwayमहामार्ग