शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
4
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
5
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
6
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
7
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
8
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
9
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
10
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
11
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
12
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
13
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
14
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
15
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
16
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
17
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
18
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
19
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
20
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

अरेच्चा ! तुम्हांला वाटेल ‘येथे ’लॉकडाऊन नाही; पण आहे फक्त ' या 'नागरिकांना तो मान्य नाही....

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2020 14:46 IST

पुणे- सोलापूर महामार्गावर बेकायदेशीरपणे व्यापाऱ्यांनी विक्री सुरू ठेऊन नियम धाब्यावर बसवले आहेत.

ठळक मुद्देया गावांपासून पुणे शहर जवळ असल्याने शहरातील भाजीपाला व्यापारी याठिकाणी खरेदीसाठी येतात

- पंढरीनाथ नामुगडेपुणे : कोरोनाला सामोरे जाण्यासाठी सरकार, प्रशासन , आरोग्य विभाग आणि समाजसेवी संस्था अतोनात मेहनत करत आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळा असे वारंवार सातत्याने सांगण्यात येत आहे. आणि हाच एकमेव उपाय आहे ज्याद्वारे कोरोनाला वाढता प्रादुर्भाव रोखला जाऊ शकतो. पण सांगितलेले लगेच ऐकेल ती जनता कसली... हेच चित्र मंगळवारी सकाळी पुणे- सोलापूर महामार्गावर कदमवाकवस्ती (ता.हवेली) परिसरात पाहायला मिळाले. सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळा या आवाहनाला पायदळी तुडवत तिथे भरणाऱ्या बाजारात मोठ्या प्रमाणात नागरिक खरेदीसाठी एकत्र येतात. यावेळी मोठ्या संख्येने ट्रक, टेम्पो, रिक्षांची याठिकाणी गर्दी होत आहे.

पुणे- सोलापूर महामार्गावर बेकायदेशीरपणे व्यापाऱ्यांनी विक्री सुरू ठेऊन नियम धाब्यावर बसवले आहेत.या ठिकाणी असलेले विक्रेते मास्क, ग्लोज न लावता बिनधास्त परिसरात वावरत असल्याचे दिसून येते. पूर्व हवेलीतील कदमवाकवस्ती,लोणी काळभोर ह्या गावात भाजीपाला जास्त प्रमाणात पिकवला जातो.त्यामुळे येथील स्थानिक शेतकरी आपला माल याठिकाणी विकण्यास घेऊन येत आहेत. आणि या गावांपासून पुणे शहर जवळ असल्याने शहरातील भाजीपाला व्यापारी याठिकाणी खरेदीसाठी येत आहेत.मात्र सर्वत्र कोरोनाची प्रचंड दहशत असताना आणि सुरक्षित अंतर राखून खरेदी - विक्रीचे व्यवहार करण्याची काळजी घेतली जात असताना या भागात भाजी खरेदीसाठी लोकांची झुंबड उडाल्याने एकच चिंता व्यक्त होत आहे. सुदैवाने पूर्व हवेली परिसरात कोरोनाच्या रुग्ण आढळलेला नाही ही जमेची बाजू असताना सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे.परंतु व्यापाऱ्यांकडून जराही पालन होताना दिसत नसल्याचे चित्र दिसत आहे.कदमवाकवस्ती ग्रामपंचायतच्या वतीने (दि.४ ते ६एप्रिल) या तीन दिवसाकरिता संपूर्ण गाव लॉकडाऊन करण्यात आलेले होते.हा लॉक डाऊन सुरू करण्याअगोदर सर्व नागरिकांना जीवनावश्यक वस्तू घेऊन ठेवा असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले होते.लॉक डाऊनच्या दरम्यान कोणीही किराणा,मेडिकल व इतर जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठी सुद्धा बाहेर येऊ नये असे सांगण्यात आले होते.परंतु, आज ग्रामपंचायतीच्या वतीने केलेल्या तीन दिवसांचा लॉकडाऊन संपल्यावर शेतकरी व व्यापाऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंगला फाटा देत पुणे सोलापूर महामार्गावरील टोल नाक्याजवळ मोठ्या प्रमाणात गर्दी करत बाजार भरवल्याने तीन दिवसांच्या लॉकडाऊनवर पाणी फिरल्याची चर्चा होत आहे.  शेतातला माल विक्रीसाठी तयार असून तो विकला नाही तर शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान होत आहे.शासनाने आमच्यासाठी काही तरी नियमावली काढावी. जेणेकरून शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही.असे मत शेतकऱ्यांनी यावेळी मांडले.

टॅग्स :PuneपुणेLoni Kalbhorलोणी काळभोरFarmerशेतकरीbusinessव्यवसायCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhighwayमहामार्ग