शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

महामानवांच्या जयंतीदिनी गरजू विद्यार्थ्यांना माेफत मेस ; स्टुडंट हेल्पिंग हॅण्डचा उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2019 16:28 IST

स्टुडंट हेल्पिंग हॅण्ड या संस्थेतर्फे महात्मा ज्याेतिबा फुले आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 300 विद्यार्थ्यांना माेफत मेसची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

पुणे : विद्यार्थ्यांनीच दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी सुरु केलेल्या स्टुडंट हेल्पिंग हॅण्ड या संस्थेतर्फे महात्मा ज्याेतिबा फुले आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 300 विद्यार्थ्यांना माेफत मेसची सुविधा उपलब्ध करुन दिली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पुम्बा सभागृहात आयाेजित कार्यक्रमात या मदतीची घाेषणा करण्यात आली. मुंबईच्या कॅरिंग फ्रेंड्स ग्रुप तर्फे ही मदत करण्यात आली आहे. या कार्यक्रमात कॅरिंग फ्रेंड्स ग्रुपचे निमेश सुमती, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे, विद्यापीठाच्या सुरक्षा विभागाचे प्रमुख सुरेश भाेसले, स्टुडंट हेल्पिंग हॅण्डचे अध्यक्ष कुलदीप आंबेकर, सचिव संध्या साेनवणे आदी उपस्थित हाेते. 

दुष्काळग्रस्त भागातील जे विद्यार्थी पुण्यात शिक्षणासाठी आले आहेत. ज्यांना त्यांच्या मेसचा खर्च करणे शक्य नाही अशा गरजु विद्यार्थ्यांना स्टुडंट हेल्पिंग हॅण्ड या संस्थेतर्फे मदत करण्यात येते. या संस्थेतर्फे समाजातील दानशूर व्यक्तींकडून मदत मिळविण्यात येत असून ती मदत या विद्यार्थ्यांना देण्यात येते. स्टुडंट हेल्पिंग हॅण्ड ही विद्यार्थी आणि दानशूर लाेक यांच्यात एक दुवा म्हणून काम करते. आत्तापर्यंत शेकडाे विद्यार्थ्यांना या संस्थेतर्फे माेफत मेस उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या संस्थेचे काम पाहून मुंबईतील कॅरिंग फ्रेंड्स ग्रुपने मदत करण्याचे ठरवले. मदत देण्यापूर्वी सुमती यांनी विद्यार्थ्यांकडून श्रमदान करण्याची, व्यसन कधीही न करण्याची, तसेच एखाद्या गरजु व्यक्तिला मदत करण्याची शपथ घेतली. सुमती यांनी 300 विद्यार्थ्यांच्या मेसचा खर्च उचलला आहे. 

सुमती विद्यार्थ्यांना म्हणाले, की ही मदत देत असताना मी काही गाेष्टींची अपेक्षा तुमच्या कडून करणार आहे. तुम्ही कधीही व्यसन करणार नाही, तुम्ही श्रमदान कराल आणि एखाद्या गरजूला मदत कराल या गाेष्टींची अपेक्षा मला तुमच्याकडून आहे. वारे म्हणाले, मला येथील मुलांमध्ये एक सकारात्मक वातावरण दिसत आहे. मुलांची माेठी स्वप्ने आहेत. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले हाेते की संघार्षातून पुढे आलेल्या लाेकांनी नेहमी मागे राहिलेल्यांना मदत करायला हवी. संघर्ष हा जर निवनिर्माणासाठी असेल तर ताे संवादाकडे जाऊ शकताे. सध्या निवडणुकीचं वातारवण असलं आहे. दुष्काळ, राेजगार या विषयांवर चर्चा हाेताना दिसत नाही. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण जाधव यांनी केले तर आभार संध्या साेनवणे यांनी मानले.

टॅग्स :Puneपुणेdroughtदुष्काळStudentविद्यार्थी