शहरं
Join us  
Trending Stories
1
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
2
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
3
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
4
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
6
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
7
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
8
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
9
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
10
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
11
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
12
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
13
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण
14
₹450 कोटींचा बंगला अन् ₹639 कोटींचा डुप्लेक्स..; धनकुबेरांना आकर्षित करतेय वरळी 'सी फेस'
15
फक्त १० वर्षांत १ कोटीचा फंड कसा तयार करायचा? SIP मध्ये दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल?
16
कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; गेल्या महिन्यातच बाजारात उतरली, दिला बंपर परतावा
17
"मी सर्वात पहिले पलायन करणाऱ्या बॅचमधील...!"; मैथिली ठाकूरच्या निवडणूक लढण्यासंदर्भात वडिलांची पहिली प्रतिक्रिया, तुम्हीही भावूक व्हाल
18
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
19
माझी पत्नी रात्रीच्या वेळी बनते नागीण आणि..., भयभीत पतीने थेट DM यांनां केली अशी विनंती, प्रकरण काय  
20
"सगळेच लोक अत्यंत...!"; विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर मैथिली ठाकुरचं मोठं विधान, स्पष्टच बोलली

महामानवांच्या जयंतीदिनी गरजू विद्यार्थ्यांना माेफत मेस ; स्टुडंट हेल्पिंग हॅण्डचा उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2019 16:28 IST

स्टुडंट हेल्पिंग हॅण्ड या संस्थेतर्फे महात्मा ज्याेतिबा फुले आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 300 विद्यार्थ्यांना माेफत मेसची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

पुणे : विद्यार्थ्यांनीच दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी सुरु केलेल्या स्टुडंट हेल्पिंग हॅण्ड या संस्थेतर्फे महात्मा ज्याेतिबा फुले आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 300 विद्यार्थ्यांना माेफत मेसची सुविधा उपलब्ध करुन दिली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पुम्बा सभागृहात आयाेजित कार्यक्रमात या मदतीची घाेषणा करण्यात आली. मुंबईच्या कॅरिंग फ्रेंड्स ग्रुप तर्फे ही मदत करण्यात आली आहे. या कार्यक्रमात कॅरिंग फ्रेंड्स ग्रुपचे निमेश सुमती, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे, विद्यापीठाच्या सुरक्षा विभागाचे प्रमुख सुरेश भाेसले, स्टुडंट हेल्पिंग हॅण्डचे अध्यक्ष कुलदीप आंबेकर, सचिव संध्या साेनवणे आदी उपस्थित हाेते. 

दुष्काळग्रस्त भागातील जे विद्यार्थी पुण्यात शिक्षणासाठी आले आहेत. ज्यांना त्यांच्या मेसचा खर्च करणे शक्य नाही अशा गरजु विद्यार्थ्यांना स्टुडंट हेल्पिंग हॅण्ड या संस्थेतर्फे मदत करण्यात येते. या संस्थेतर्फे समाजातील दानशूर व्यक्तींकडून मदत मिळविण्यात येत असून ती मदत या विद्यार्थ्यांना देण्यात येते. स्टुडंट हेल्पिंग हॅण्ड ही विद्यार्थी आणि दानशूर लाेक यांच्यात एक दुवा म्हणून काम करते. आत्तापर्यंत शेकडाे विद्यार्थ्यांना या संस्थेतर्फे माेफत मेस उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या संस्थेचे काम पाहून मुंबईतील कॅरिंग फ्रेंड्स ग्रुपने मदत करण्याचे ठरवले. मदत देण्यापूर्वी सुमती यांनी विद्यार्थ्यांकडून श्रमदान करण्याची, व्यसन कधीही न करण्याची, तसेच एखाद्या गरजु व्यक्तिला मदत करण्याची शपथ घेतली. सुमती यांनी 300 विद्यार्थ्यांच्या मेसचा खर्च उचलला आहे. 

सुमती विद्यार्थ्यांना म्हणाले, की ही मदत देत असताना मी काही गाेष्टींची अपेक्षा तुमच्या कडून करणार आहे. तुम्ही कधीही व्यसन करणार नाही, तुम्ही श्रमदान कराल आणि एखाद्या गरजूला मदत कराल या गाेष्टींची अपेक्षा मला तुमच्याकडून आहे. वारे म्हणाले, मला येथील मुलांमध्ये एक सकारात्मक वातावरण दिसत आहे. मुलांची माेठी स्वप्ने आहेत. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले हाेते की संघार्षातून पुढे आलेल्या लाेकांनी नेहमी मागे राहिलेल्यांना मदत करायला हवी. संघर्ष हा जर निवनिर्माणासाठी असेल तर ताे संवादाकडे जाऊ शकताे. सध्या निवडणुकीचं वातारवण असलं आहे. दुष्काळ, राेजगार या विषयांवर चर्चा हाेताना दिसत नाही. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण जाधव यांनी केले तर आभार संध्या साेनवणे यांनी मानले.

टॅग्स :Puneपुणेdroughtदुष्काळStudentविद्यार्थी