शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

विदर्भ, मराठवाड्यात २ दिवस उष्णतेची लाट, राज्यात गुढीपाडव्याला पावसाची शक्यता

By नितीन चौधरी | Updated: April 5, 2024 16:40 IST

रविवारनंतर पुढील ४ दिवस ढगाळ वातावरण राहून विदर्भ मराठवाडा व मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीटीची शक्यता

पुणे : उत्तर भारतातून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे विदर्भ व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये दोन दिवस उष्णतेची लाट येणार आहे तर किमान तापमानातही मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. तर सात तारखेनंतर पुढील चार दिवस ढगाळ वातावरण राहून विदर्भ मराठवाडा व मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्यात सध्या सूर्यदेव तळपायला सुरुवात झाली आहे. वातावरणातील खालच्या स्तरातील द्रोणिकारेषा मध्य महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भातून थेट गोंदियापर्यंत पसरली आहे. यामुळे शनिवार व रविवार विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. त्यामुळे विदर्भातील चंद्रपूर, यवतमाळ व अमरावती तर मराठवाड्यातील नांदेड हिंगोली व परभणी या जिल्ह्यांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे किमान तापमानातही मोठी वाढ होऊन उकाड्यात वाढ होण्याचा अंदाज आहे.

याबाबत हवामानतज्ज्ञ डॉ. अनुपम काश्यपी म्हणाले, “त्यानंतर मध्य महाराष्ट्र व विदर्भात रविवारनंतर (दि. ७) उत्तरेकडून येणाऱ्या आर्द्रतेमुळे ढगाळ वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. तसेच नांदेड हिंगोली जिल्ह्यात गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात वाशिम, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा या पाच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी गारपीट होईल. या काळात अति हलका ते हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर सोमवारी व मंगळवारी राज्यात हलक्या पावसाची शक्यता जास्त आहे. त्यामुळे तापमानात घट होण्याची शक्यता आहे.”

गुढीपाडव्याला पावसाचा अंदाज

पुणे व परिसरात कमाल तापमान सरासरी ३९ अंशांपर्यंत राहण्याची शक्यता आहे. तर रविवारनंतर ढगाळ वातावरण तयार होऊन मंगळवार सायंकाळनंतर गडगडाटासह सोसाट्याचा वार वाहण्याची शक्यता आहे. तर त्यानंतर दोन दिवस काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. तर गुढीपाडव्याला अर्थात ९ एप्रिल रोजी हलक्या पावसाची शक्यता जास्त असल्याचे काश्यपी यांनी सांगितले. तसेत शनिवारी व रविवारी पहाटे धुके पडण्याचा अंदाज आहे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेTemperatureतापमानRainपाऊसSocialसामाजिकHealthआरोग्यenvironmentपर्यावरण