शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
7
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
8
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
9
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
10
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
11
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
12
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
13
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
14
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
15
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
16
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
17
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
18
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
19
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
20
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी

त्यांनी केला हिंसेच्या प्रदेशात शांततेचा जागतिक विक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2019 16:47 IST

गडचिराेली हा तसा नक्षली भाग म्हणून ओळखला जाताे. नक्षली कारवायांमुळे हा परिसर बदनाम झालेला असताना एक शांततेचं अंकुर फुलविण्याचं काम पुण्यातल्या आदर्श मित्र मंडळाच्या उदय जगताप यांनी केलं आहे.

पुणे : गडचिराेली हा तसा नक्षली भाग म्हणून ओळखला जाताे. नक्षली कारवायांमुळे हा परिसर बदनाम झालेला असताना एक शांततेचं अंकुर फुलविण्याचं काम पुण्यातल्या आदर्श मित्र मंडळाच्या उदय जगताप यांनी केलं आहे. नक्षली भागात जगताप यांनी सर्व धर्मातील शांततेचा संदेश एकत्र करत त्याचे पुस्तक तयार करुन त्याच्या सामुहिक पठणाचा कार्यक्रम घेत जागतिक विक्रम केला आहे. या कार्यक्रमाला आत्मसमर्पित नक्षली, शहीद पाेलिसांचे कुटुंब, नक्षल पिडीत लाेक, पाेलीस, विद्यार्थी असे तब्बल 7 हजार लाेक उपस्थित हाेते. 3 मार्च 2018 ला हा कार्यक्रम घेण्यात आला हाेता. याची दखल गिनिज बुक्स ऑफ वल्ड रेकाॅर्ड यांनी घेतली आहे.  उदय जगताप यांनी आदर्श मित्र मंडळाच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. पदवी पर्यंतचे शिक्षण झालेल्या जगताप यांचा सामाजिक क्षेत्राकडे ओढा वाढू लागला. पुण्यातून फिरत असताना गुन्हेगारांच्या फ्लेक्सवर तरुणांचे फाेटाे पाहिल्यानंतर या तरुणांना गुन्हेगारी प्रवृत्तीपासून लांब ठेवण्याचा विचार त्यांच्या मनात आला. गुन्हेगाराचा मुलगा हा गुन्हेगार हाेऊ नये यासाठी त्यांनी गुन्हेगारांच्या मुलांना गुन्हेगारी वातावरणापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न पाेलिसांच्या मदतीने सुरु केला. त्यांनी 2007 साली गुन्हेगार दत्तक याेजना सुरु केली. या याेजनेअंतर्गत त्यांनी 2500 गुन्हेगारांशी संवाद साधून त्यांच्या पुनर्वसनाचे काम हाती घेतले. त्याचवेळी नक्षलवाद्यांच्या हल्लयात पाेलीस शहीद हाेत असल्याच्या बातम्या कानावर पडत हाेत्या. अशातच पुण्यातही काही नक्षलवादी सापडले. त्यावेळी नक्षलवाद ही भारतापुढील माेठी समस्या असल्याने यावर काम करणे आवश्यक त्यांना वाटू लागले. त्यांनी गडचिराेलीत जाऊन तेथे काम करण्याचा निर्णय घेतला. 

नक्षलीभाग संवेेदनशील असल्याने माेठ्या टीमसाेबत काम करणे शक्य नव्हते. तेथे जाऊन तेथील लाेकांच्या समस्या जगताप यांनी समजून घेतल्या. नक्षलवाद्यांच्या हातातून शस्त्र टाकून त्यांच्या हातात पुस्तक देण्याचा चंग त्यांनी मनाशी बांधला हाेता. त्यासाठी त्यांनी गडचिराेलीत तत्कालिन पाेलीस अधिक्षक संदीप पाटील, सध्याचे अधिक्षक डाॅ. अभिनव देशमुख आणि सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास सुंचुवार यांची मदत मिळाली. सुरुवातीला त्यांनी नक्षलपिडीत 110 कुटुंबियांना सायकलींचे वाटप केले. त्याचबराेबर आत्मशरण आलेल्या नक्षलींसाठी अग्निपंख ही याेजना त्यांनी हाती घेतली. या दुर्गम भागात लाईट नव्हती. त्यांनी 1035 घरांमध्ये वीज आणली. तेथील 50 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्या दिल्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तेथील पाेलीस स्टेशनमध्ये त्यांनी पुस्तकांचे ग्रंथालय सुरु केले. 

नक्षली भागात हिंसेचे विचार जाऊन गांधी विचार रुजावेत यासाठी त्यांनी गांधी विचार परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. जे नक्षलवादी शरण आले आहेत, त्यांच्याशी संवाद साधून त्यांचे विचार बदलण्याचे काम जगताप यांनी केेले. या नक्षलींसाठी विविध लाेकांचे लेक्चर्स ठेवून त्यांना गांधींच्या अहिंसेच्या विचारांकडे वळविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. गडचिराेलीतील 56 माओवाद्यांनी गांधी विचार परीक्षा दिली. ज्या जिल्ह्याने कायम हिंसा पाहिली तेथे अहिंसेचे बीज राेवण्याचे काम त्यांनी केले. या पुढे जात विविध धर्मअभ्यासकांना बाेलावून शांतीचा संदेश या भागात दिला. याचीच परिणीती म्हणजे सर्व धर्मातील शांतीचे संदेश एकत्र करत त्याचे पुस्तक तयार करुन त्याचे सामुहिक पठण करण्यात आले. या उपक्रमात आत्मसमर्पित नक्षली, शहीद पाेलीसांची कुटुंबे, नक्षल पिडीत लाेक, पाेलीस, विद्यार्थी असे एकूण 7 हजार लाेक सहभागी झाले. याची दखल गिनिज बुकच्या जागतिक विक्रमांमध्ये घेण्यात आली. 

नक्षली भागात आराेग्य, शिक्षण, रस्ते यावर काम केल्यास तेथील नक्षलवाद संपून जाईल असा विश्वास जगताप यांना वाटताे. नक्षलवाद्यांशी संंवाद साधून त्यांच्यात विश्वास निर्माण करणे महत्त्वाचे असल्याचे जगताप सांगतात. नक्षलवादावर काम करणे ही काळाजी गरज असल्याचेही ते सांगतात. एका गणेश मंडळापासून सुरु झालेला प्रवास त्यांना जागतिक विक्रमापर्यंत घेऊन गेला. जगताप यांची कहाणी सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोलीnaxaliteनक्षलवादीPuneपुणेsocial workerसमाजसेवक