शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
4
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
5
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
6
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
7
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
8
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
9
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
10
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
11
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
12
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
13
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
14
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
15
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
16
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
17
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
18
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
19
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
20
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा

संसार न करणाऱ्याला महागाईची झळ बसायचा प्रश्नच नाही; अजित पवारांचा माेदींना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2018 19:31 IST

जाे संसार करत नाही, त्याला घरी गेल्यावर काही काम नसते असे म्हणत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नरेंद्र माेदी यांच्यावर नाव न घेता टीका केली.

पुणे : जाे संसार करत नाही, त्याला घरी गेल्यावर काही काम नसते अाम्ही संसारी अाहाेत गॅसचे दर वाढले , पेट्राेलचे दर वाढले, महिन्याचे पैसे वीस दिवसात संपले हे सर्व अाम्हाला एेकून ध्यावे लागले. त्यामुळे त्यांना महागाई काय समजणार अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्यावर नाव न घेता टीका केली. 

    इंदापूर येथील डाळज क्रमांक दाेन ते कुंभारगाव या रस्त्याचे भूमिपूजन व ग्रामपंचायत कार्यालयाच्या नूतन इमारतीच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार दत्तात्रय भरणे होते. पवार पुढे म्हणाले, मोदींचे तसे नाही. ते एकटा जीव सदाशिव आहेत. त्यांना घरी कोणी सांगायलाच नाही. त्यामुळे घरी गेले की निवांत झोपायचे. अशा गोष्टींची चर्चा होत नसल्यामुळे याची झळ बसायचा प्रश्नच नाही. आमची अवस्था मात्र पांडू हवालदार, सोंगाड्यासारखी झाली अाहे. आमच्या  आघाडी सरकारने वीस वर्षाच्या काळात अनेक कामे केली. तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिले. मात्र आताचे हे सरकार फसवे आहे. केवळ घोषणांचा पाऊस मात्र त्याची अंमलबजावणी नाही असा एककलमी कार्यक्रम भाजपाचा सुरू आहे. एव्हढेच नव्हे आमच्या सरकारच्या वीस वर्षाच्या काळात अडीच लाख कोटी कर्ज होते. मात्र या भाजप सरकारने चार वर्षाच्या काळात पाच लाख कोटी कर्जाचा ढोंगर उभा करून ठेवला आहे असेही ते अापल्या भाषणात म्हणाले. 

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी