शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

खडकवासला बोगद्याचे भूमिपूजन महिनाभरात होणार

By नितीन चौधरी | Updated: February 6, 2025 18:14 IST

बोगदा पूर्ण होण्यासाठी चार वर्षांचा कालावधी लागणार आहे.

पुणे : खडकवासला ते फुरसुंगीदरम्यान केल्या जाणाऱ्या बोगद्याचे भूमिपूजन येत्या महिनाभरात होणार आहे. कंत्राटदाराकडून प्राथमिक कामाला सुरुवात करण्यात आली असून, बोगद्यातील राडारोडा काढण्यासाठी ५ ठराविक ठिकाणी बाह्यमार्ग करण्यात येणार आहे. त्यासाठी भूसंपादनाची गरज भासणार असून, ते लवकरच पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. बोगदा पूर्ण होण्यासाठी चार वर्षांचा कालावधी लागणार आहे.

बोगद्याच्या कामासाठी सुमारे २२०० कोटी रुपयांचा प्रकल्प आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याला राज्य सरकारने तीन महिन्यांपूर्वी मान्यता दिली. जलसंपदा विभागाने आचारंसहितेपूर्वीच १६०० कोटी रुपयांच्या कामांसाठीची निविदा काढली होती. त्यानुसार या बोगद्याचे काम ‘मेघा इंजिनिअर्स’ या कंपनीला देण्यात आले आहे. येत्या महिनाभरात बोगद्याचे प्रत्यक्षात काम सुरू होईल. बोगद्यातील राडारोडा जमिनीवर आणण्यासाठी बोगद्याच्या संपूर्ण २८ किलोमीटरच्या लांबीत किमान ४ ते ५ ठिकाणी स्वतंत्र जागा तयार केली जाणार आहे. ही जागा मोठ्या प्रमाणावर लागणार असल्याने त्यासाठी अतिरिक्त भूसंपादनाची गरज भासणार आहे. त्यामुळे या जागेचे संपादन सध्या करण्यात येत आहे. येत्या पंधरवड्यात हे भूसंपादन पूर्ण होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. कंत्राटदाराला कार्यादेश मिळाले असल्याने त्याने प्राथमिक तयारी म्हणून कामगारांसाठी खडकवासला धरणाजवळ मजुरांचा तळ सुरू केला आहे. राज्य सरकार आणि जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समन्वयातून येत्या महिनाभरात बोगद्याच्या कामाचे भूमिपूजन केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.

हा बोगदा खडकवासला धरण ते फुरसुंगीदरम्यान असलेल्या कालव्याच्या ३४ किलोमीटर लांबीपैकी २८ किलोमीटर लांबीचा असून, जमिनीच्या ८० मीटर ते २४० मीटर खालून जाणार आहे. बोगद्याचे काम ड्रील आणि ब्लास्टिंग पद्धतीने केले जाणार असून, अंतर्गत व्यास ६.३ मीटर असणार आहे. बोगद्याच्या आतून सिमेंट काँक्रीटीकरण केले जाणार आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळला जाईल. या बोगद्यामुळे सुमारे तीन टीएमसी पाणी वाचणार आहे. याती निम्मे पाणी पुण्याला पिण्यासाठी देता येईल. उर्वरित पाणी ग्रामीण भागातील शेतीसाठी देण्याचे नियोजन आहे. परिणामी ३ हजार ४७१ हेक्टर सिंचन क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. बोगद्यामुळे पाणी दीड हजार क्युसेक वेगाने वाहू शकणार आहे. बोगदा पूर्ण होण्यासाठी चार वर्षांचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत सध्याचा कालवा सुरूच राहणार आहे.

 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWaterपाणीpollutionप्रदूषणDamधरणMuncipal Corporationनगर पालिकाroad transportरस्ते वाहतूक