शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
3
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
4
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
5
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
6
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
7
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
8
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
9
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
10
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
11
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
12
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
13
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
14
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
15
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
16
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
17
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
18
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
19
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
20
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश

सरकार योजना जाहीर करते, मात्र त्या प्रत्यक्षात येण्यासाठी सिस्टीम असल्याने तिला वेळ लागतो - बैजयंत पांडा

By राजू इनामदार | Updated: March 3, 2025 18:26 IST

सरकारी योजनेचा मध्यमवर्गीय घटकांना लाभ मिळावा यासाठी सरकार प्रयत्नशील आहे

पुणे: सरकार योजना जाहीर करते. त्याचा थेट जनतेला लाभ मिळण्यासाठी काही पद्धत असते. ती सुरू होऊन नियमित होण्यासाठी काही वेळ लागतो असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, दिल्लीचे खासदार बैजयंत पांडा यांनी केले. भारत आता जगातील ५ वी अर्थसत्ता झाल्याचा दावा त्यांनी केला.केंद्रीय अर्थसंकल्पातील प्रमुख मुद्द्यांची माहिती देण्यासाठी म्हणून पांडा पुण्यात आले होते. पक्ष कार्यालयात त्यांनी पत्रकारांबरोबर संवाद साधला. 

पक्षाचे प्रवक्ते माधव भंडारी, शहराध्यक्ष धीरज घाटे तसेच पुनीत जोशी, अमोल कविटकर, करण मिसाळ, रविंद्र साळगावकर व अन्य पदाधिकारी त्यांच्यासमवेत होते. पांडा म्हणाले, "पंतप्रधान मोदी यांच्यामुळे देशाला नवे वळण मिळाले. आज जगात मोदी यांचे नाव आहे, सगळे राष्ट्रप्रमूख त्यांना मानतात. अर्थक्षेत्रात भारताने मोठी भरारी घेतली, याचे कारण अर्थसंकल्पात देशातील प्रत्येक समाजघटकाचा विचार करून योजना निश्चित केल्या आहेत. देशात वैद्यकीय शिक्षणांच्या १० हजार जागा वाढतील. शेती, उद्योग अशा अनेक क्षेत्रात नव्या योजना आणल्या आहेत. ५ प्रमुख मुद्दे निवडून त्यावर लक्ष केंद्रित केले आहे.

सार्वजनिक आरोग्य व शिक्षण या दोन गोष्टींकडे केंद्र सरकारचे दुर्लक्ष आहे, त्याचा त्रासदेशातील मध्यमवर्गीय घटकाला होत आहे, त्यावर काहीच ऊपाययोजना नाहीत याकडे लक्ष वेधले असता पांडा यांनी आकडेवारी देण्यास सुरूवात केली. ती थांबवून साध्या केजीला प्रवेश देताना लाख रूपये द्यावे लागतात असे सांगितले असता पांडा यांनी ही वस्तूस्थिती असल्याचे मान्य केले.

ते म्हणाले, "सरकार योजना जाहीर करते, मात्र त्या प्रत्यक्षात येण्यासाठी सिस्टीम असते. तिला वेळ लागतो. जीएसटी कर लागू केला त्यावेळी सरकारवर टीका झाली, मात्र आता ही करप्रणाली व्यवस्थित झाली आहे. आयुष्यमान योजना, कँशलेस या योजनांना वेळ लागतो आहे, मात्र त्या यशस्वी होतीलच. सरकारी योजना सक्षम होण्यास वेळ लागतो. खासगी व सरकारी यामध्ये ज्याला जे पसंत ते तो स्विकारतो. मध्यमवर्गीय घटकांना लाभ मिळावा यासाठी सरकार प्रयत्नशील आहे असे पांडा म्हणाले.

टॅग्स :Puneपुणेgovernment schemeसरकारी योजनाBJPभाजपाIndiaभारतSocialसामाजिकMONEYपैसा