शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

"सरकारने मराठा समाजातील तरुणांची जबाबदारी घ्यावी नाहीतर ते नक्षलवादाकडे झुकतील"

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2020 16:26 IST

विद्यार्थ्यांची जबाबदारी सरकारने घ्यावी ; संभाजी ब्रिगेडची मागणी

पुणे : राज्य सरकारने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि नोकरीतील नुकसान होणार नाही, याची जबाबदारी घ्यावी. अन्यथा मराठा समाजातील तरुण नक्षलवादाकडे झुकतील. त्यासाठी सरकारने सर्वोच्च्य न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी. तसेच विधिमंडळात मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढण्यात यावा. अशी मागणी संभाजी बिग्रेडचे केंद्रीय निरीक्षक विकास पासलकर यांनी पत्रकार परिषदेत केली.  पुण्यात संभाजी बिग्रेडच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. पासलकर म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी जनतेसमोर येऊन भूमिका स्पष्ट करावी. स्थगिती उठविण्यासाठी प्रयत्न करावेत. आरक्षणावर आलेली स्थगिती म्हणजे मराठा समाजातील तरुणांवर झालेला मोठा आघात आहे. केंद्र आणि राज्य सरकारने यामध्ये लक्ष घालावे. हा प्रश्न राजकीय नसून सामाजिक आहे. त्यामुळे यामध्ये राजकारण झाल्याने मराठा समाज राजकारणाचा बळी ठरला आहे. सरकाने तसेच विरोधी पक्षांनी एकत्र येऊन या प्रकरणात प्रकर्षाने लक्ष घालावे. तसेच मराठा समाजाचा उद्रेकाचा भडका कधीही उडू शकतो. हे लक्षात ठेवावे. यावेळी संतोष शिंदे, विराज तावरे, प्रशांत धुमाळ आधी उपस्थित होते.

मागास आयोगाने घरोघरी जाऊन सर्व्हे करून समाजाचे मागासलेपण सिद्ध करून तसा अहवाल राज्यशानाला सादर केला. त्यावर शिक्षण आणि नोकरी मध्ये आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र सर्वोच्च्य न्यायालयाने या निर्णयाला अंतरिम स्थगिती देण्याचा अनाकलनीय निर्णय घेतला. यापूर्वी तामिळनाडू आंध्रप्रदेशमध्ये आरक्षण किंवा आर्थिक दुर्बल घटकाच्या आरक्षणाचा विषय घटनापीठाकडे वर्ग करताना त्यालास्थगिती देण्यात आली नव्हती. असे असताना मराठा समाजाच्या आरक्षण बाबत वेगळा निर्णय कशासाठी घेण्यात आला असा प्रश्न उपस्थित होत आहे. यामध्ये राजकारण नकरता सरकारने तात्काळ निर्णय घ्यावा. तसेच मराठा समाजाने कुठल्याही प्रकरची हिंसा आत्महत्या करू नयेत. असे आवाहन त्यांनी यावेळी केले. कायदेशीर मार्गाने लढाई जिंकू असा विश्वास पासलकर यांनी व्यक्त केला. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये आरक्षण लागू होणार ही की नाही याची माहिती सरकारने तसेच एमपीएससीने द्यावी. हा निर्णय येण्याआधी विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरला आहेत. त्यामुळे या निर्णयाचा फटका त्यांना बसू नये. अकरावी प्रवेश प्रक्रियेला स्थगिती देण्यात यावी. अशी प्रमुख मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.

टॅग्स :Puneपुणेsambhaji brigadeसंभाजी ब्रिगेडState Governmentराज्य सरकारMaratha Reservationमराठा आरक्षणStudentविद्यार्थी