शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
5
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
6
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
7
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
8
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
9
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
10
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
11
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
12
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
13
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
14
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
15
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
16
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
17
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
18
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
19
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
20
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

शासनाने दारूची दुकाने सुरू करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा : महिला संघटनांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 18:25 IST

शासनाचा हा निर्णय हा अत्यंत चुकीचा असून, या निर्णयाला आमचा विरोध आहे.

ठळक मुद्देदारूची दुकाने सुरू करायला परवानगी दिल्यामुळे अनेक अडचणी उद्भवणार 

पुणे : दारू पिण्याचं प्रमाण वाढलं की हिंसाही आपोआपच वाढते. दारूची दुकाने सुरू करण्याच्या या सरकारच्या निर्णयामुळे महिला अत्याचारांमध्ये वाढचं होणार आहे. त्यामुळे शासनाचा हा निर्णय हा अत्यंत चुकीचा असून, या निर्णयाला आमचा विरोध आहे. शासनाने या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी मागणी महिला संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे.

लॉकडाऊनच्या काळात कुटुंबियांसमवेत वेळ घालविण्याची चांगली संधी मिळाली असली तरी महिलांसाठी हा काळ म्हणजे वरदान नव्हे तर शाप चं ठरला आहे. या काळात घरगुती हिंसाचाराच्या तक्रारीत वाढ झाली असून, राष्ट्रीय महिला आयोगाकडे 26 एप्रिलपर्यंत देशभरातून 587 तक्रारी आल्या आहेत. ही अत्यंत चिंतेची बाब आहे. आता शासनाच्या दारूची दुकाने सुरू ठेवण्याच्या निर्णयामुळे महिलांवरील अत्याचारांमध्ये अधिकच भर पडण्याची भीती महिला संघटनांकडून ''लोकमत'' शी बोलताना व्यक्त करण्यात आली.-------------------------------------------------------दारूची दुकाने सुरू करायला परवानगी दिल्यामुळे अनेक अडचणी उद्भवणार आहेत. व्यसनमुक्ती केंद्रात आम्ही नवे रूग्ण घेत नाही. त्यामुळे आता या निर्णयामुळे दारू पिऊन ही लोक कुटुंबातील महिलांसह इतर सदस्यांना त्रास देणार आणि मग त्यांना केंद्रात ठेवण्याची सदस्यांकडूनच मागणी केली जाणार. कारण दारूडया व्यक्तीचे स्वत:वर नियंत्रण नसते. दारूमुळे त्यांची प्रतिकारशक्ती मंदावते. यातच घरगुती हिंसाचारामध्येही वाढ होणार हे देखील खरं आहे. यातच  ह्यड्रंकन ड्राईव्हह्ण मुळे अपघात झाल्यास रूग्णालयांमध्ये रूग्णाला ठेवण्यासाठीही जागा नाही अशी परिस्थिती आहे. यामुळे  हा निर्णय चुकीचा असून, सरकारने या निर्णयाचा पुनर्विचार करावा- डॉ. मुक्ता पुणतांबेकर, संचालिका मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र-------------------------------------------------------दारू हा नेहमीच महिलांवरील हिंसेचा गंभीर विषय राहिला आहे. दारूसाठी पैशाचा तगादा लावणे आणि पत्नीने न दिल्यास तिला मारहाण करणे हे घडतच आले आहे. आम्ही एक सर्व्हे करीत आहोत. त्यामध्ये लॉक डाऊनच्या काळात व्यसनांचे काय करता? असा प्रश्न विचारण़्यात आला आहे. त्याचे उत्तर काय येते बघूयात. लॉक डाऊनच्या काळात सर्वच व्यवहार ठप्प आहेत. आर्थिक चणचणी प्रत्येकाला भेडसावत आहे.त्यामुळे याकाळात महिलांना दोन्ही बाजूने सहनकरावे लागणार आहे. दारूडा व्यक्ती फिजिकल डिस्टन्सिंग कसे पाळू शकणार?दारू मिळविण्यासाठी मारामा-या सुरू होतील. दारू विक्रीमधून सरकारने महसूलमिळविण्याचा घेतलेल्या निर्णयातून अनेक प्रश्न निर्माण होतील. या निर्णयाला आमचा विरोध आहे. समाजस्वास्थ चांगलं राहण्याच्या दृष्टीने पावले उचलली जायला हवीत- साधना दधिच, नारी समता मंच------------------------------------------------------दारू वाढली की हिंसा वाढते. आमच्याकडे महिला अत्याचाराच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. पण कोरोना काळात महिलांच्या प्रश्नांकडे कितपत लक्ष दिले जाणार? हा मुददा आहे. पोलिसांवरच कोरोनाचा इतका ताण आहे. त्यामुळे  दादतरी कुणाकडे मागायची? अशा चक्रात आम्ही अडकलो आहोत. न्यायव्यवस्थेकडूनमहिलांच्या प्रश्नांना प्राधान्य मिळणार का? कारण सध्या न्यायालये बंद आहेत. सरकारचा निर्णय चुकीचा आहे यात दुमत नाहीच. पण केंद्र सरकार राज्याला कोरोना काळात मदत करीत नाहीये. त्यामुळे राज्याला महसूल वाढविण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागला आहे. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही- किरण मोघे, सामाजिक कार्यकर्त्या-------------------------------------------------

टॅग्स :Puneपुणेliquor banदारूबंदीWomenमहिलाState Governmentराज्य सरकारCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस