शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

शासनाने दारूची दुकाने सुरू करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा : महिला संघटनांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 18:25 IST

शासनाचा हा निर्णय हा अत्यंत चुकीचा असून, या निर्णयाला आमचा विरोध आहे.

ठळक मुद्देदारूची दुकाने सुरू करायला परवानगी दिल्यामुळे अनेक अडचणी उद्भवणार 

पुणे : दारू पिण्याचं प्रमाण वाढलं की हिंसाही आपोआपच वाढते. दारूची दुकाने सुरू करण्याच्या या सरकारच्या निर्णयामुळे महिला अत्याचारांमध्ये वाढचं होणार आहे. त्यामुळे शासनाचा हा निर्णय हा अत्यंत चुकीचा असून, या निर्णयाला आमचा विरोध आहे. शासनाने या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी मागणी महिला संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे.

लॉकडाऊनच्या काळात कुटुंबियांसमवेत वेळ घालविण्याची चांगली संधी मिळाली असली तरी महिलांसाठी हा काळ म्हणजे वरदान नव्हे तर शाप चं ठरला आहे. या काळात घरगुती हिंसाचाराच्या तक्रारीत वाढ झाली असून, राष्ट्रीय महिला आयोगाकडे 26 एप्रिलपर्यंत देशभरातून 587 तक्रारी आल्या आहेत. ही अत्यंत चिंतेची बाब आहे. आता शासनाच्या दारूची दुकाने सुरू ठेवण्याच्या निर्णयामुळे महिलांवरील अत्याचारांमध्ये अधिकच भर पडण्याची भीती महिला संघटनांकडून ''लोकमत'' शी बोलताना व्यक्त करण्यात आली.-------------------------------------------------------दारूची दुकाने सुरू करायला परवानगी दिल्यामुळे अनेक अडचणी उद्भवणार आहेत. व्यसनमुक्ती केंद्रात आम्ही नवे रूग्ण घेत नाही. त्यामुळे आता या निर्णयामुळे दारू पिऊन ही लोक कुटुंबातील महिलांसह इतर सदस्यांना त्रास देणार आणि मग त्यांना केंद्रात ठेवण्याची सदस्यांकडूनच मागणी केली जाणार. कारण दारूडया व्यक्तीचे स्वत:वर नियंत्रण नसते. दारूमुळे त्यांची प्रतिकारशक्ती मंदावते. यातच घरगुती हिंसाचारामध्येही वाढ होणार हे देखील खरं आहे. यातच  ह्यड्रंकन ड्राईव्हह्ण मुळे अपघात झाल्यास रूग्णालयांमध्ये रूग्णाला ठेवण्यासाठीही जागा नाही अशी परिस्थिती आहे. यामुळे  हा निर्णय चुकीचा असून, सरकारने या निर्णयाचा पुनर्विचार करावा- डॉ. मुक्ता पुणतांबेकर, संचालिका मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र-------------------------------------------------------दारू हा नेहमीच महिलांवरील हिंसेचा गंभीर विषय राहिला आहे. दारूसाठी पैशाचा तगादा लावणे आणि पत्नीने न दिल्यास तिला मारहाण करणे हे घडतच आले आहे. आम्ही एक सर्व्हे करीत आहोत. त्यामध्ये लॉक डाऊनच्या काळात व्यसनांचे काय करता? असा प्रश्न विचारण़्यात आला आहे. त्याचे उत्तर काय येते बघूयात. लॉक डाऊनच्या काळात सर्वच व्यवहार ठप्प आहेत. आर्थिक चणचणी प्रत्येकाला भेडसावत आहे.त्यामुळे याकाळात महिलांना दोन्ही बाजूने सहनकरावे लागणार आहे. दारूडा व्यक्ती फिजिकल डिस्टन्सिंग कसे पाळू शकणार?दारू मिळविण्यासाठी मारामा-या सुरू होतील. दारू विक्रीमधून सरकारने महसूलमिळविण्याचा घेतलेल्या निर्णयातून अनेक प्रश्न निर्माण होतील. या निर्णयाला आमचा विरोध आहे. समाजस्वास्थ चांगलं राहण्याच्या दृष्टीने पावले उचलली जायला हवीत- साधना दधिच, नारी समता मंच------------------------------------------------------दारू वाढली की हिंसा वाढते. आमच्याकडे महिला अत्याचाराच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. पण कोरोना काळात महिलांच्या प्रश्नांकडे कितपत लक्ष दिले जाणार? हा मुददा आहे. पोलिसांवरच कोरोनाचा इतका ताण आहे. त्यामुळे  दादतरी कुणाकडे मागायची? अशा चक्रात आम्ही अडकलो आहोत. न्यायव्यवस्थेकडूनमहिलांच्या प्रश्नांना प्राधान्य मिळणार का? कारण सध्या न्यायालये बंद आहेत. सरकारचा निर्णय चुकीचा आहे यात दुमत नाहीच. पण केंद्र सरकार राज्याला कोरोना काळात मदत करीत नाहीये. त्यामुळे राज्याला महसूल वाढविण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागला आहे. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही- किरण मोघे, सामाजिक कार्यकर्त्या-------------------------------------------------

टॅग्स :Puneपुणेliquor banदारूबंदीWomenमहिलाState Governmentराज्य सरकारCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस