शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
2
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
3
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
4
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
5
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
6
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
7
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
8
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
9
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
10
Share Market: US Fed च्या निर्णयानंतर देशांतर्गत शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स ३०० अंकांनी वधारला; 'या' शेअर्समध्ये तेजी
11
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
12
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
13
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
14
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
15
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
16
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
17
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
18
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
19
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
20
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक

आरक्षणासाठी होत असलेल्या आंदोलकांच्या आत्महत्येला शासन जबाबदार; मनोज जरांगे पाटलांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2023 15:16 IST

शांततेचे आंदोलन मोडण्याची ताकद राज्यातील व केंद्रातील कोणत्याही शक्तीत नाही, जारांगे पाटलांचा इशारा

जुन्नर : आरक्षण मिळविण्यासाठी मराठा समाजाच्या तरुणांचे मुडदे पडायला लागले, त्यांच्या आत्महत्या व्हायला लागले ,याला शासन जबाबदार आहे असा आरोप करतानाच आरक्षण देण्यासाठी सुरू झालेले हे शांततेचे आंदोलन मोडण्याची ताकद राज्यातील व केंद्रातील कोणत्याही शक्तीत नाही असा इशारा मराठा समाज आरक्षनासाठी लढा उभारणारे मनोज जरांगे पाटील यांनी दिला. 

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या मराठा समाज गाठीभेटी या दौऱ्याअंतर्गत किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी आले असताना जुन्नर येथे झालेल्या सभेत ते बोलत होते. 

जरांगे पाटील म्हणाले, शासनाने मराठा समाजाला समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे. 24 तारखे नंतर शांततेत आंदोलन होणार आहे. परंतु हे शांततेचे आंदोलन शासनाला पेलनारे नाही हे मी शिवनेरी गडावरून जाहीर करतो. शासनाने आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही. आमचे आजोबा ,पनजोबा ,खापर पनजोबा ,पूर्वज कुणबी होते .त्यांचे आम्ही रक्ताचे वंशज आहोत .शेतीला ते कुणबी असे म्हणायचे आता सुधारित शब्द शेती असा आला आहे. त्यावेळी त्यावेळी शेती करणाऱ्याला कुणबी असे म्हणत आम्ही सर्व कुणबीच आहोत. आम्हाला दोन प्रकारचे अंग आहे. आम्ही क्षत्रिय लढणारे मराठा आहोत, दुसरे शेतीतच पाय ठेवतो,शेतीत असतो,देशाला अन्नधान्य पुरवतो. 

मराठा समाजाचे प्रेरणा केंद्र किल्ले शिवनेरी आहे. जिजाऊंनी अन्यायाविरुद्ध लढण्यास शिकवले तसेच शिवरायांनी स्वराज्य निर्माण केले. समाजाने शांततेत आंदोलन करावे ,आत्महत्या करू नका, यापुढे समाजात जाऊन आरक्षण कशासाठी पाहिजे याची माहिती द्या असे आवाहन मनोज जरंगे पाटील यांनी केले.

जरांगे यांचे दिनांक 19 रोजी रात्री उशिरा जुन्नर येथे आगमन झाले त्यावेळी झालेल्या पत्रकार परिषद केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या 96 शहाण्णव कुळी मराठ्यांना आरक्षण देवू नये या वकतव्यावर बोलताना जरांगे पाटील यांनी गोरगरीब समाजाचे कल्याण होणार आहे,आरक्षण ज्याला घ्यायचे तो घेईल कोणाला जोरजबरदस्ती नाही. शरद पवारांच्या बालेकिल्ला असलेल्या पुणे जिल्ह्यात तुमची सभा होत आहे. यासंदर्भात प्रश्न विचारला असता कोणत्या पक्षाचा बालेकिल्ला नाही,मराठ्यांचा बालेकिल्ला आहे, मराठ्यांचा जिल्हा आहे आहे अशी टिप्पणी जरांगे पाटील यांनी केले.

टॅग्स :PuneपुणेManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणagitationआंदोलनSocialसामाजिक