शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

सरकारी नोकरीची नियुक्तीपत्रे राजकारण्यांच्या हातून; पुण्यातून काँग्रेसची टीका

By राजू इनामदार | Updated: May 17, 2023 16:31 IST

राजकीय पोळी भाजण्याचा हा प्रकार बंद करावा व सर्व पदे योग्य त्या यंत्रणांमार्फत रितसर पद्धतीने भरावीत असे काँग्रेसचे म्हणणे

पुणे: सरकारी नोकरी सरळ सेवा भरतीने करण्याचे टाळून तात्पुरत्या स्वरूपात नोकरी द्यायची, व त्याचीही नियुक्ती पत्रे सरकारमध्ये काम करणाऱ्या मंत्र्यांकडून द्यायची या प्रकारावर काँग्रेसने टीका केली आहे. राजकीय पोळी भाजण्याचा हा प्रकार बंद करावा व सर्व पदे योग्य त्या यंत्रणांमार्फत रितसर पद्धतीने भरावीत असे काँग्रेसने म्हटले आहे.

केंद्र व राज्य सरकारकडून मंत्री अथवा अन्य लोकप्रतिनिधींच्या हस्ते अशा प्रकारच्या तात्पुरत्या सरकारी नोकरीची नियुक्ती पत्रे मेळावे आयोजित करून दिली जात आहेत. काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी म्हणाले, अशा प्रकारे सरकारी नोकरी देण्याचा प्रकार आधीच्या कोणत्याही सरकारमध्ये झालेला नाही. सर्व पदे ही सरळ सेवा भरतीने रितसर परिक्षा, मुलाखत दिल्यानंतर गुणवत्तेच्या आधारावर व तीसुद्धा लोकसेवा किंवा राज्य सेवा आयोगाच्या माध्यमातून जमा केली जात असत.

सध्या सरकारी नोकर भरती जवळपास बंदच करण्यात आली आहे. त्याऐवजी तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त्या दिल्या जातात. या नियुक्त्या करण्याआधी निवड कोणत्या पद्धतीने केली जाते, त्यात पारदर्शकता नाही. शिवाय ज्यांची नियुक्ती केली जाते, त्यांना नियुक्ती पत्रे राजकीय नेत्यांच्या हस्ते, मेळावा वगैरे आयोजित करून दिली जातात. हा सर्वच प्रकार निषेधार्ह असल्याचे तिवारी यांनी म्हटले आहे.

यातून संबधित सरकारी नोकरदाराला उपकृत केल्याची भावना निर्माण होते. सरकारी नोकरदापाकडून जनसामान्यांना न्याय मिळण्याच्या दृष्टिनेे ही गोष्ट गैर आहे. त्यामुळे सरकारनेच ही नवी, अन्यायकारक पद्धत त्वरीत थांबवावी, अन्यथा न्यायालयाने स्वत: याची दखल घ्यावी व सरकारला समज द्यावी अशी मागणी तिवारी यांनी केली आहे.

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसPoliticsराजकारणSocialसामाजिकjobनोकरी