शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; धरण क्षेत्रात एका दिवसात सव्वा महिना पाणी पुरेल इतका पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2020 13:37 IST

अशीच पावसाची कृपादृष्टी राहिली तर पाणी कपातीचे संकट होऊ शकते दूर..!

ठळक मुद्देधरण साठ्यात २ टीएमसी वाढ, धरण क्षेत्रात पावसाला सुरुवात गेल्या वर्षीपेक्षा १६ टीएमसी पाणीसाठा कमी

पुणे : पुणे महानगरपालिका व जिल्ह्यातील दौंड, बारामती, इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागाला शेतीसाठी पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण प्रकल्पातील चारही धरणात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे एका दिवसात २ टीएमसी एवढा पाणीसाठा वाढला आहे .बुधवारी सकाळी खडकवासला धरण प्रकल्पात १२.०७ टीएमसी एवढा पाणीसाठा जमा झाला.मात्र, गेल्या वर्षाच्या तुलनेत धरणांत १६.२६ टीएमसी पाणीसाठा कमी आहे. धरण क्षेत्रात याच पद्धतीने पाऊस सुरू राहिला तर पुणेकरांवरील पाणीकपातीचे संकट दूर होऊ शकते.    खडकवासला धरण प्रकल्पातील खडकवासला , पानशेत, वरसगाव, टेमघर या चारही धरणांमध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा कमी पाणीसाठा उपलब्ध आहे. मागील वर्षी ५ ऑगस्ट रोजी धरणात २८.९६ टीएमसी एवढा पाणीसाठा उपलब्ध होता. परंतु, ५ ऑगस्ट २०२० रोजी या चारही धरणांमध्ये एकूण १२.०७ टीएमसी एवढा पाणीसाठा शिल्लक आहे.धरणात मुबलक पाणीसाठा शिल्लक नसल्यास जलसंपदा विभागाकडून १५ ऑगस्टनंतर पाणी कपातीचा निर्णय घेतला जातो. परंतु, पावसाने पाठ फिरवल्यामुळे यंदा ५ ऑगस्टनंतर  धरणातील पाण्याचे नियोजन केले जाईल,असे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. मंगळवारी खडकवासला धरण प्रकल्पातील चारही धरणांमध्ये एकूण ९.९६ टीएमसी एवढा पाणीसाठा शिल्लक होता. तर बुधवारी धरणात १२.०७ पाणीसाठा उपलब्ध झाला. त्यामुळे एका दिवसात खडकवासला धरण प्रकल्प दोन टीएमसी पाणी साठा वाढला.खडकवासला धरण प्रकल्पातील पानशेत व वरसगाव धरणात ५ टीएमसी , तर खडकवासला धरणात बुधवारी १ टीएमसी पाणी साठा उपलब्ध आहे. गेल्या २ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धरण साठ्यात काही प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.----------------------- खडकवासला धरण प्रकल्पातील पाणीसाठाधरणाचे नाव  ४ऑगस्ट           ५ऑगस्टखडकवासला ०.६९              १.००वरसगाव       ४.२७             ५.०५ पानशेत        ४.२४            ५.०९ टेमघर.          ०.७७           ०.९३

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसWaterपाणीDamधरण