शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

खुशखबर! मुले मराठी वाचताहेत, बालसाहित्याला ‘अच्छे दिन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 05:55 IST

मुले वाचत नाहीत; किंबहुना मुले मराठी पुस्तके वाचत नाहीत, ही चिंता कायमच पालकांना, लेखकांना सतावत असते. मराठीच्या तुलनेत मुलांचा इंग्रजी भाषेकडील वाढता कल हीसुद्धा डोकेदुखी ठरत आहे.

- प्रज्ञा केळकर-सिंगपुणे : मुले वाचत नाहीत; किंबहुना मुले मराठी पुस्तके वाचत नाहीत, ही चिंता कायमच पालकांना, लेखकांना सतावत असते. मराठीच्या तुलनेत मुलांचा इंग्रजी भाषेकडील वाढता कल हीसुद्धा डोकेदुखी ठरत आहे. मात्र, यंदाच्या उन्हाळी सुट्टीने मराठी बालसाहित्याला ‘अच्छे दिन’ दाखवले आहेत. चरित्रविषयक लिखाणासह अनुवादित साहित्याकडील मुलांचा कल मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मराठी बालसाहित्याची मागणी वर्षभराच्या तुलनेत उन्हाळ्याच्या सुट्टीत २०-२५ टक्क्यांनी वाढलीआहे.सध्याच्या काळात मुलांवर मनोरंजनाच्या नानाविध पर्यायांचा अक्षरश: भडिमार होत आहे. मॉल संस्कृती, मल्टिप्लेक्समधील झगमग, मोबाईल, टीव्हीकडील वाढता कल यामुळे मुले वाचनापासून दूर होत आहेत. कल्पनाशक्तीला, सर्जनशीलतेला वाव देणारे वाचनच काळाच्या ओघात मागे पडत चालले आहे. त्यातही इंग्रजी विरुद्ध मराठी ही लढाई चिंतेचा विषय बनली आहे. मुले एकतर कमी वाचतात आणि त्यातही इंग्रजीवर भर देतात, हे वास्तव सर्वत्र पाहायला मिळते. मात्र, यंदाची उन्हाळ्याची सुट्टी या डोकेदुखीला अपवाद ठरली आहे. मुलांनी मोठ्या प्रमाणात मराठी पुस्तकांना पसंती दिल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे मराठी पुस्तकांना ‘अच्छे दिन’ आल्याचे समाधान प्रकाशक, बालसाहित्यिकांकडून व्यक्त केले जात आहे.उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना वाचनासाठी प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीने मुलांसाठी ग्रंथालय व्यवस्था, वाचनाची शिबिरे, बालसाहित्यिकांशी संवाद, ओरिगामी, चित्रकला, गोष्टींचा तास अशा विविध उपक्रमांवर भर देण्यात आला. एप्रिल आणि मे अशा दोन महिन्यांमध्ये बालमहोत्सव आयोजित करण्यात आल्याने मुलांकडून भरघोस प्रतिसादमिळाला.मुलांना वाचायला आवडतेच; मात्र मुलांना पुस्तकांपर्यंत पोहोचवता आले किंवा पुस्तके मुलांपर्यंत पोहोचली तर वाचनाशी त्यांची नक्कीच गट्टी जमते, असा विश्वास बालसाहित्यिका डॉ. संगीता बर्वेयांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.डॉ. बर्वे म्हणाल्या, ‘‘पीयूची डायरी’ या पुस्तकाबाबत चिमुरड्यांकडून खूप चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या. शहरी मुलांप्रमाणेच ग्रामीण भागातील मुलांमध्येही वाचनाचे वेड पाहायला मिळते. मुले वाचत आहेत, प्रश्न विचारत आहेत, ही आशादायक बाब आहे. मुलांना वाचनाची आवड लावण्याची जबाबदारी पालक, शाळा, लेखक अशा सर्वांचीच आहे, हे विसरून चालणार नाही.’’त्यांच्यापर्यंत पुस्तके पोहोचण्याची गरजयंदाच्या उन्हाळी सुट्टीत मुलांनी आत्मचरित्र, शिवाजीमहाराज आणि संभाजीमहाराज यांचे चरित्र, जंगल बुक, माधुरी पुरंदरे यांचे ‘राधाचं घर’, राजीव तांबे यांचे ‘प्रेमळ भूत’, कोंबडू, मांजरु ही सिरीज, अशा पुस्तकांना विशेषत्वाने पसंती दिली. रुडयार्ड किपलिंग यांच्या ‘जंगल बुक’ या लीना कचोळे यांनी अनुवादित केलेल्या पुस्तकांच्या २००हून अधिक प्रतींची विक्री झाली. वर्षभराच्या तुलनेत बालसाहित्याच्या खरेदीत २०-२५ टक्क्यांनी वाढ झाली. मुले वाचत नाहीत, असे म्हणून चालणार नाही. त्यांच्यापर्यंत पुस्तके पोहोचण्याची गरज आहे. ही जबाबदारी पालकांनी पार पाडावी आणि काय निवडावे, वाचावे हे मुलांना ठरवू द्यावे.- रमेश राठिवडेकर,अक्षरधाराबालसाहित्याकडे वाढतोय कलगेल्या काही वर्षांत बालसाहित्याकडील कल मोठ्या प्रमाणात वाढला आहे. चि. विं. जोशी यांच्या साहित्याला आजही खूप पसंती दिली जाते. मुलांचा अनुवादित साहित्याकडील कलही वाढलेला दिसत आहे. मुले वाचत नाहीत, ही भीती अनाठायी आहे. विज्ञानमालांमधून मुलांना हसत-खेळत विज्ञान शिकण्याची संधी मिळत आहे.- देवयानी अभ्यंकर,कॉन्टिनेन्टल प्रकाशनएकूणच साहित्याला मागणी कमीजंगल बुक या अनुवादित पुस्तकाचा वाचकवर्ग यंदाच्या सुट्टीत वाढल्याचे पाहायला मिळाला. याशिवाय माधुरी पुरंदरे यांच्या सर्वच पुस्तकांना चांगली पसंती मिळत आहे. पण, वाचन कमी होत आहे या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. केवळ बालसाहित्याची नव्हे, तर एकूणच साहित्याची मागणी कमी झाली आहे.- मिलिंद परांजपे,ज्योत्स्ना प्रकाशन

टॅग्स :Studentविद्यार्थी