शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

ग्लोबलायझेशनमुळे वाढतोय नात्यातला दुरावा; तीन वर्षांत पुण्यात आढळले ३१३ बेवारस रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2019 02:28 IST

वायसीएम रुग्णालयातील स्थिती आई वडिल होतायेत निराधार

प्रकाश गायकर पिंपरी : माणसाचे आयुष्य ग्लोबल होत आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनात कुणालाच कुणासाठी वेळ नाही. सोशल मीडियाच्या माध्यामातून जग जवळ येत आहे. मात्र येथे आई-बापाला मुलासाठी वेळ नाही, मुलाला आई-बापासाठी वेळ नाही. त्यामुळे नात्यांमध्ये दुरावा वाढत चालला आहे. माणूस स्वत:च्या जगामध्ये इतका हरवला आहे की, ज्या आई-बापाने हे जग दाखवले त्याच आई-वडिलांना रस्त्याच्या बाजूला सोडले जात आहे. ज्या बहिणीने हातावर राखी बांधून संरक्षणाचे वचन घेतले. त्या बहिणीला रुग्णालयात मरण्यासाठी सोडून भाऊ घरची वाट धरत आहे.

पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयामध्ये रोज अशा बेवारस रुग्णांना दाखल केले जाते. ज्यांना आई, भाऊ, बहीण, मुलगा, मुलगी आहे. मात्र त्या रुग्णाला सांभाळण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही. काहींची तर आर्थिक परिस्थिती नाही. गेल्या तीन वर्षांमध्ये वायसीएममध्ये तब्बल ३१३ बेवारस रुग्णांंची नोंद आहे. तर मागील तीन महिन्यांमध्ये त्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून, अवघ्या तीन महिन्यांमध्ये तब्बल ९६ बेवारस रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

३१ ऑगस्ट या दिवशी दुपारी १०८ रुग्णवाहिकेने रत्नाबाई गायकवाड (वय ६०) या महिलेला वायसीएम रुग्णालयामध्ये आणण्यात आले. या महिलेला डॉक्टरांनी उपचारासाठी दाखल करून घेतले. मात्र उपचार सुरू असतानाच भाऊ रुग्णालयातून निघून गेला. दोन तासांपूर्वी भावाने बहिणीला वाचविण्यासाठी दाखल केले. मात्र भाऊच गायब झाल्याने डॉक्टरही चक्रावून गेले.

सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर भाऊ रुग्णालयातून निवांत जाताना दिसून आले. त्यानंतर दहा दिवसांनी आपला शोध सुरू असल्याची कुणकुण या भावाला लागली आणि तो बहिणीला पाहण्यासाठी रुग्णालयात पुन्हा हजर झाला. अनेक घटनांमध्ये स्वत:चे घरचेच सोडून गेल्याचे निदर्शनास आले आहे. व्यक्ती आजारी किंवा वयस्कर असेल तर ती व्यक्ती घरात नसलेली ठीक आहे, अशी मानसिकता होत आहे. त्यासाठी अशा रुग्णांना रक्ताचीच नाती सोडून जात आहेत.संस्थेच्या माध्यमातून जे काम केले जात आहे, ते कौतुकास्पद आहे. जनावरांपेक्षा वाईट वागणूक दिलेल्या बेवारस रुग्णांची सेवा केली जाते. नातेवाईक सोडून जात असल्याने एका रुग्णाला तीन, चार महिने रुग्णालयातच ठेवावे लागते. त्यामुळे रुग्णालय प्रशासनावरही ताण येतो. ज्या रुग्णांना नातेवाईक सोडून जातात, ते आजारी असतातच असे नाही. तर त्यांना आधाराची व आश्रयाची आवश्यकता असते. मात्र, आर्थिक परिस्थिती नसल्यानेही काही जण सोडून जातात. - डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता, वायसीएम रुग्णालय.तिला कोणच नाही. माझ्या घरची माणसे चांगली वागत नाहीत. कुठल्यातरी सरकारी दवाखान्यात तिचा शेवट होईल हा हेतू होता. - रुग्णाचे एक नातेवाईकरिअल लाइफ रिअल पीपल या संस्थेचा आधारवायसीएममध्ये अनेक बेवारस रुग्णांना दाखल केले जाते. त्यांना रिअल लाइफ रिअल पीपल ही संस्था मदत करते. त्यांना जेवण व त्यांची देखभाल केली जाते. रुग्णांच्या नातेवाइकांना शोधून त्यांना घरी पोहोचवणे, आश्रमात पाठवणे याची जबाबदारी संस्था घेते. तसेच उपचारादरम्यान एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाला, तर त्याच्यावर संस्थेमार्फत अंत्यसंस्कार केले जातात. आतापर्यंत १०४ मृतदेहांवर संस्थेमार्फत अंत्यसंस्कार केले आहेत. यामध्ये संस्थेचे संस्थापक एम. ए. हुसैन, सामाजिक कार्यकर्ते महादेव बोत्रे, आकाश शिरसाठ, मिलिंद माळी, दत्ता वाघमारे, कमल कांबळे, उल्हास चांगण, रेणुका शिंदे हे काम करतात.मी रिअल लाइफ रिअल पीपल या संस्थेच्या माध्यमातून वायसीएममध्ये २०१० पासून सेवा करत आहे. लोक कर्तव्य विसरले आहेत. शेकडो बेवारस रुग्ण दरवर्षी दाखल होतात. त्यापैकी अनेकांना स्वत:च्या घरच्यांनी सोडून दिलेले असते. अशा रुग्णांवर सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींचा आधार घेऊन उपचार केले जातात. त्यांना त्यांच्या घरी किंवा आश्रमामध्ये सोडले जाते. - एम. ए. हुसैन, संस्थापक रिअल लाइफ रिअल पीपल.

टॅग्स :Puneपुणे