शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
18
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
19
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
20
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय

शहीद सैनिकांना देवाचे स्थान द्या - विक्रम गोखले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2018 2:19 AM

शहीद सैनिकांच्या वीरमातांचा सन्मान कार्यक्रम

पुणे : भारत देशाचे वीर जवान युद्धामध्ये धारातीर्थी पावले. त्यांच्या आठवणी श्रद्धेने लक्षात ठेवून सामान्य माणसाने याची दखल घ्यावी. आपण सकाळी उठल्यावर देवाला नतमस्तक होतो. त्याचप्रमाणे सैनिकांनाही नतमस्तक व्हावे. या वीर शहीदसैनिकांना देवाचे स्थान द्या, असे मत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी व्यक्त केले.

सैनिक मित्र परिवार आयोजित शहीद सैनिकांच्या वीरमातांचा सन्मान आणि भाऊबीज कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी ज्येष्ठ माजी क्रीडापटू अरुण दातार, रोटरी क्लब पूना मिडटाऊन सचिव अलका मोतीवाले, सेवा मित्रमंडळ अध्यक्ष शिरीष मोहिते, नारद मंदिर माजी उपाध्यक्ष शाहीर हेमंत मावळे, आदर्श मित्रमंडळ अध्यक्ष उदय जगताप उपस्थित होते. १९६५, १९७१चे भारत-पाकिस्तान युद्ध, १९८५ची नागालँड मोहीम, १९९९ चे कारगिल युद्ध अशा युद्धात शहीद झालेल्या सैनिकांच्या १४ वीरमातांचा सन्मान सोहळा साजरा केला.गोखले म्हणाले की, सैनिकाला नमस्कार करणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. समाजाने दोन व्यक्तींचा नेहमी आदर केला पाहिजे. पहिला म्हणजे सैनिक आणि दुसरा म्हणजे ज्या व्यक्तीमुळे आपले पोट भरते तो शेतकरी. सैनिक हा रात्रंदिवस जागून, देशाचे रक्षण करीत असतो. त्याने दिलेल्या बलिदानाची आपण सर्वांनी जाण राखली पाहिजे. माझ्या कुटुंबात मुलगा, भाचे, जावई हे सर्व सैनिक या विषयाशी निगडित आहेत. त्यामुळे या वीर जवान लोकांबद्दल तूर्त अभिमान आहे. वीर मातांच्या पत्नी, मुले, पती युद्धांमध्ये शहीद झाले या गोष्टीचे वाईट वाटून घेऊ नये. देशाचे रक्षण करून त्यांनी बलिदान दिले याचा आम्हाला सर्वांना अभिमान आहे. तुम्ही वीरमाता एकट्या नसून सर्व समाज तुमच्या पाठीशी आहे.प्रत्येकाने दररोज एक रुपया द्यावामी सर्वांना आवाहन करतो की, समाजातील प्रत्येक व्यक्तीने दररोज एक रुपया जरी या सैनिक आणि शेतकऱ्यांसाठी दिला. तरी हे आर्थिक दृष्ट्या संपन्न राहतील.

टॅग्स :Vikram Gokhaleविक्रम गोखलेMartyrशहीदSoldierसैनिक