शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
मूर्ती लहान, किर्ती महान! U19 वर्ल्ड कपआधी BCCI नं वैभव सूर्यवंशीकडे दिली थेट कॅप्टन्सीची जबाबदारी
4
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
5
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
6
India U19 Squad For ICC Men’s U19 World Cup : तोच पॅटर्न! अंडर १९ वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा
7
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
8
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
9
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
10
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
11
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
12
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
13
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
14
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
15
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
16
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
17
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
18
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
19
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
20
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करा, बच्चू कडूंना न्याय द्या..;अजित पवारांच्या कार्यक्रमात प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घातला गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 13:18 IST

कार्यकर्त्यांनी अजित पवार यांचा समोर राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, बच्चू कडूंना न्याय द्या अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे.

पुणेपुणे - उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे मॉडेल स्कूल व मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्राच्या लोकार्पण सोहळा कार्यक्रमात बोलत असतांना प्रहार शेतकरी संघटनेच्या कार्यक्रत्यांनी गोंधळ घातल्याची घटना घडली आहे. यावेळी अजित पवार यांनी आम्ही पण शेतकरी, आम्हाला सुद्धा शेतकऱ्यांची जाण आहे. चर्चा करून निर्णय घेतला पाहिजे. असं म्हणत कार्यकर्त्यांना समज दिली.  

कार्यकर्त्यांनी अजित पवार यांचा समोर राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, बच्चू कडूंना न्याय द्या, बच्चू कडू हे उपोषणाला बसलेत, त्यांना रक्ताची उलटी झालीय. तुम्ही न्याय द्या, शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा अशी मागणीही यावेळी प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली. यात महिला शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.

दरम्यान, बच्चू कडू यांनी ८ जूनपासून गुरुकुंजात राष्ट्रसंतांच्या महासमाधीपुढे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह शेतमजूर, दिव्यांग, ग्रामपंचायत कर्मचारी आदींसाठी अन्नत्याग उपोषण सुरू केले आहे. मात्र आज अजित पवार यांच्या कार्यक्रमात कार्यक्रत्यांनी गोंधळ घातल्यानंतर पवार यांनी त्यांच्याशी संवाद साधला. 

अजित पवार म्हणाले, बच्चू कडू यांच्यासोबत बैठक घेऊन विचार करण्यात येणार आहे. बावनकुळे यांनी कालच त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आहे.लवकरच यावर बैठक घेण्यात येणार आहे. आम्ही सुद्धा शेतकरी  आम्ही पण शेतकरी, आम्हाला सुद्धा शेतकऱ्यांची जाण आहे. चर्चा करून निर्णय घेतला पाहिजे. असेही ते यावेळी म्हणाले. तर या कार्यक्रमात मोठ्या संख्येने महिला शेतकरी उपस्थित होत्या. यावेळी आंदोलनकर्त्यांनी कार्यक्रम स्थळावर ठिया मांडला. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं.दरम्यान, कडू यांच्या उपोषणाचा शुक्रवारी सहावा दिवस होता. पालकमंत्री तोडगा घेऊन येतील, अशी आशा वर्तविण्यात येत होती. परंतु, त्यांच्या आश्वासनांना दाद न देता बच्चू कडू ठाम राहिले. काँग्रेस व शरद पवार गटाने या उपोषणाला पाठिंबा दिला.तत्पूर्वी, पालकमंत्र्यांनी बच्चू कडू यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद करून दिला होता. यावेळी दिव्यांगांच्या मानधन वाढीबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शविली. शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी लवकरच एक समिती गठित करण्यात येईल. कर्जाची वर्गवारी तयार करून अहवाल शासनाला सादर करण्यात येईल. येत्या पावसाळी अधिवेशनात त्याबाबत सरकार निर्णय घेईल, असे मंत्री बावनकुळे म्हणाले होते.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारBachhu Kaduबच्चू कडूChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस