शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
3
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
4
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
5
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
6
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

पूरामुळे जिल्ह्यात कोट्यवधींचे नुकसान : नवल किशोर राम 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 9:00 PM

शहरासह जिल्ह्यातील काही भागात कमी वेळेत जोरदार वृष्टी झाल्याने पूरस्थिती निर्माण झाली.

ठळक मुद्दे८३२ जनावरे मृत : हजारो वाहने गेली पाण्याखालीग्रामीण भागाच्या तुलनेत शहरात मालमत्तेचे तुलनेने मोठे  नुकसान हवेलीतील खेड-शिवापूर, कात्रज, आंबेगाव येथे जोरदार पाऊस

पुणे : जिल्ह्यामध्ये बुधवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे पुणे शहर आणि जिल्ह्यामधे १४ जणांचा मृत्यू झाला असून, ९ जण बेपत्ता आहेत. लहान-मोठी ८३२ जनावरे मृत झाली आहेत. हवेली, पुरंदर आणि बारामती तालुक्याला पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे. शहरातील हजारो वाहने पाण्याखाली अथवा वाहून गेली असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले. सहकारनगरमधील अरण्येश्वर परिसरातील दीड ते दोन हजार वाहने पाण्याखाली गेली होती. त्यामुळे नागरिकांच्या मालमत्तेचे कोट्यवधी रुपयांच्या नुकसानीचा अंदाज आहे. शहरासह जिल्ह्यातील काही भागात कमी वेळेत जोरदार वृष्टी झाल्याने पूरस्थिती निर्माण झाली. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरात मालमत्तेचे तुलनेने मोठे  नुकसान झाले आहे. नाझरे धरणातून कऱ्हा नदीत मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आल्याने बारामती तालुक्यातील २१ गावांना फटका बसला. येथील ३८ मदत शिबिरामधे अडीच हजार नागरिकांना स्थलांतरीत करण्यात आले. पुणे शहरातील ३ हजार नागरिकांना काही काळासाठी इतरत्र हलविण्यात आले होते. हवेलीतील खेड-शिवापूर, कात्रज, आंबेगाव येथे जोरदार पाऊस झाला. येथील सात गावांना पावसाचा फटका बसला. पुरंदरमधील २४ आणि भोर तालुक्यातील एक गाव पावसामुळे बाधित झाले आहेत. दरड कोसळल्यामुळे हवेली आणि पुरंदरमधील प्रत्येकी २ आणि भोरमधील १ रस्ता बंद झाला. सासवड-जेजुरी मार्ग देखील काही काळासाठी बंद ठेवण्यात आला होता, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पत्रकार परिषदेने दिली. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत या वेळी उपस्थित होते. ------------------अतिवृष्टीमुळे मृत जनावरे

तालुका        लहान         मोठी         वाहून गेलेली (बेपत्ता)हवेली           ३५०              ४                 -पुणे शहर      १४               १६               १४पुरंदर            ४२४             २४                -एकूण           ७८८             ४४               १४          

टॅग्स :PuneपुणेNavalkishor Ramनवलकिशोर रामfloodपूरRainपाऊस