शहरं
Join us  
Trending Stories
1
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
2
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
3
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
4
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
5
उद्धव ठाकरे सहकुटुंब शरद पवारांच्या घरी; संजय राऊतही उपस्थित, दिल्लीत घडामोडींना वेग!
6
बेवफा सोनिया...! प्रियकराच्या मदतीनं पतीला संपवलं; १ वर्ष कुणालाही नाही कळलं, पण एका चुकीनं...
7
कोट्यधीश बनवणारा शेअर... १ लाखाचे झाले ३.५० कोटी रुपये, एकेकाळी १० रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल अन् मुंबई रणजी टीम .... मधल्या काळात नेमकं काय-काय घडलं?
9
रक्षाबंधनाच्या मराठी शुभेच्छा; प्रेमळ Messages आणि भावपूर्ण Greetings पाठवा आपल्या बहीण-भावाला
10
कामाचं टेन्शन, लोनची झंझट... शांतीसाठी आलाय नवा विचित्र ट्रेंड, डॉक्टरांनी म्हटलं 'खतरनाक'
11
राहुल गांधींची 'डिनर डिप्लोमसी', थंड पडलेल्या INDIA आघाडीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न
12
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
13
विराट कोहलीचं आवडतं गाणं गाजतंय, यूट्यूबवर मिळालेत १० कोटी Views, तुम्ही ऐकलंय का?
14
विमानतळावर उतरताच UAEच्या विमानावर हवाईदलाने केला हल्ला, ४० जणांचा मृत्यू
15
National Flag : केवळ भारतच नव्हे, जगातील 'या' देशांच्या झेंड्यावरही आहे केशरी, पांढरा अन् हिरवा रंग!
16
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
17
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
18
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
19
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
20
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?

मुठेचे पात्र आक्रसल्याने पूरस्थितीचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2019 12:25 IST

नदीत झालेली अतिक्रमणे, टाकलेला राडारोडा, कचरा या गोष्टींमुळे नदीची वहनक्षमता कमी झाली आहे.  

ठळक मुद्देनदीपात्राचा घेतला घास : ‘जलसंपदा’ची पाणी सोडताना होतेय कसरत

पुणे : घाटमाथ्यावर झालेल्या अतिवृष्टीमुळे दोन दिवस-रात्र तब्बल ४५ हजार ४४७ क्युसेकने पाणी मुठा नदीत सोडावे लागले. पाण्याचा हा विसर्ग नैसर्गिक धोक्याच्या पातळीच्या निम्म्याने खाली आहे. नदीसह शहरातील नाल्यांचा घास घेतल्याने पन्नास हजार क्युसेक आतील विसर्गदेखील सोसवत नसल्याचे चित्र आहे. नदीत झालेली अतिक्रमणे, टाकलेला राडारोडा, कचरा या गोष्टींमुळे नदीची वहनक्षमता कमी झाली आहे.  खडकवासला साखळीतील टेमघर, पानशेत, मुळशी आणि खडकवासला ही धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. खडकवासलातून शनिवारी २७ हजार २०३ क्युसेकने पाणी मुठा नदीत सोडण्यात येत होते. त्यात सोमवारपर्यंत तब्बल ४५ हजार ४७४ पर्यंत वाढ करण्यात आली. धरणक्षेत्रात पावसाचा जोर असल्याने दोन दिवस याच वेगाने मुठा नदीत पाणी सोडण्यात येत होते. या पाण्यामुळे नदीलगतच्या सोसायट्या, झोपडवस्त्या आणि रुग्णालयातील कर्मचारी आणि रुग्णांनादेखील सुरक्षित स्थळी हलविण्याचे वेळ प्रशासनावर आली. जवळपास तेरा हजारांहून अधिक व्यक्तींची जिल्हा प्रशासनाने समाज मंदिर, शाळांमधे सोय केली. काही हजार रहिवाशांनी नातेवाईकांच्या घराचा आसरा घेतला. मात्र, अगदी पन्नास वर्षांपूर्वी याच नदीने तब्बल १ लाख १३ हजार क्युसेकचा विसर्ग लीलया वाहून नेला आहे. अगदी १९९७ लादेखील ९०,५७० क्युसेकचा विसर्ग या नदीतून पुढे गेला आहे. यंदा मात्र, ४५ हजार क्युसेकच्यावर विसर्ग जाताच जलसंपदाकडे विसर्ग कमी करण्यासाठी दबाव वाढू लागला. भरलेली धरणे आणि सुरू असलेला पाऊस यामुळे दोन दिवस जलसंपदाला पाण्याचा विसर्ग कमी करणेच शक्य नव्हते. त्यामुळे अधिकाºयांना विसर्ग आटोक्यात ठेवण्यासाठी कसरत करावी लागली. महाराष्ट्र इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूटचे (मेरी) माजी महासंचालक डी. एम. मोरे म्हणाले, की नदीचा वाहण्याचा नैसर्गिक मार्ग आणि पात्राची रुंदीही ठरलेली असते. मुठा नदीच्या पात्रातच नाल्यासारखे दोन्ही बाजूंनी काँक्रिटची भिंत बांधली आहे. नदीच्या पात्रातही घरे आहेत. ...........नदीकिनारी सिमेंटचे बांधकाम करणे धोकादायक आहे. कारण त्यामुळे तिथे पाणी मुरत नाही. कारण नदीकिनारची जमीन ही दलदलच असायला हवी. त्यात छोट्या जिवांची परिसंस्था जगत असते. तसेच त्या दलदलीमुळे पाणीही मुरत असते. परंतु, सिमेंटच्या भिंती बांधल्यामुळे पाणी मुरतच नाही. अशा जमिनीला पाणथळ म्हटले जाते. ते नैसर्गिकरीत्या जैवविविधतेसाठी आवश्यक असते. परंतु, अशी पाणथळ जमीन सिमेंटच्या भिंतीने नष्ट झाली आहे. ........४५ हजार क्युसेक विसर्गही झेपेनागरिबांपासून ते श्रीमंतांपर्यंत सर्वच स्तरातील व्यक्तींनी नदीपात्रावर अतिक्रमण केले आहे. त्यामुळे केवळ ४५ हजार क्युसेक पाण्याच्या विसर्गाने पूरस्थिती ओढविल्याचे चित्र होते. यापूर्वी इतक्या विसर्गामुळे पूरस्थिती उद्भवल्याचे स्मरत नाही. मुठा नदीची ही वाताहत खडकवासला धरणाच्या भींतीपासून पुढे सुरू होते. नांदेड परिसरात आणखी विदारक चित्र आहे. - डॉ. डी. एम. मोरे, माजी महासंचालक महाराष्ट्र इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट .........या पूर्वीचा विसर्ग (क्युसेकमध्ये)१९४३    ८०,७६६१९५४    १,०५,१४०१९५८     १,१३,३९२ १९८३    ८६,४९०१९९७    ९०,५७०५ आॅगस्ट २०१९    ४५,४७४..... 

टॅग्स :Puneपुणेmula muthaमुळा मुठाRainपाऊसWaterपाणीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका