शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

पाच टन कांदा फेकला उकिरड्यावर, उत्पादनाच्या खर्चाइतकाही दर नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2019 12:22 AM

कांद्याचे दर कोसळल्याने कळंब येथील शेतकऱ्याने ५ टन कांदा अक्षरश: उकिरड्यावर फेकून दिला. कांद्याच्या उत्पादनातून लाखो रुपयांची कमाई होईल, अशी स्वप्ने ज्या डोळ्यांनी पाहिली त्याच डोळ्यांत कांद्याने आज अक्षरश: पाणी आणले आहे.

कळंब - कांद्याचे दर कोसळल्याने कळंब येथील शेतकऱ्याने ५ टन कांदा अक्षरश: उकिरड्यावर फेकून दिला. कांद्याच्या उत्पादनातून लाखो रुपयांची कमाई होईल, अशी स्वप्ने ज्या डोळ्यांनी पाहिली त्याच डोळ्यांत कांद्याने आज अक्षरश: पाणी आणले आहे.कळंब येथील शेतकरी नामदेव शंकर गायकवाड यांनी त्यांच्या शेतामध्ये गट नंबर ३६१ व ३६२ मध्ये उसनवारी करून ५ एकर कांदापीक घेतले. जवळपास ७०० गोण्या कांदा भरून बाजारात विक्रीसाठी नेल्यानंतर २ रुपये किलोने भाव मिळाला. हताश झालेल्या नामदेव गायकवाड या शेतकºयाने उकिरड्यावर कांदा फेकून दिला.किमान कांद्याचे खत तयार होऊन शेतीला उपयोगी पडेल अशी अपेक्षा गायकवाड कुटुंबीयांना आहे. ५ एकर कांद्याचे पीक हातात घेण्यासाठी जवळपास १ लाख ७५ हजार रुपये खर्च झाला.ठोक भावाने आत्तापर्यंत विक्री करूनही हातात फक्त ६० हजार रुपये आले आहेत. उर्वरित कांदा सडून जाण्याच्या काळजीने नामदेव गायकवाड यांनी काळजावर दगड ठेवून तोटा सहन करून कांदा अक्षरश: उकिरड्यावर फेकून दिला. शासनाने कांद्यावर निर्यातीला घातलेली बंदी उठवावी, अशी मागणी गायकवाड कुटुंबीयांची आहे. 

टॅग्स :Puneपुणेonionकांदा