शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

पुणे-नाशिक रेल्वेबाबत तोडगा काढा, अन्यथा जीएमआरटी स्थलांतरित करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 09:11 IST

डॉ. अमोल कोल्हे यांची केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान खात्याकडे मागणी

पुणे : पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पावरील आक्षेप टाळण्यासाठी ‘जीएमआरटी’ने तांत्रिक उपाय योजावेत किंवा ‘जीएमआरटी’ प्रकल्प कमी लोकसंख्या असलेल्या भागात स्थलांतरित करावा, अशी मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पीएमओ व विज्ञान, तंत्रज्ञान खात्याचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्याकडे केली.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी खोडद येथील जीएमआरटी प्रकल्पाच्या आक्षेपामुळे पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प रद्द करण्यात आल्याची माहिती लोकसभेत दिली. त्यामुळे खासदार डॉ. कोल्हे यांनी केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांना तत्काळ पत्र पाठवून जीएमआरटीच्या शास्त्रज्ञांनी पुणे-नाशिक रेल्वेच्या आक्षेपावर तांत्रिक उपाय योजावेत किंवा जीएमआरटी प्रकल्प योग्य भागात स्थलांतरित करावा, अशी मागणी केली.

वर्ष १९९६ मध्ये जीएमआरटीची स्थापना झाल्यापासून औद्योगिकीकरणावर निर्बंध आल्याने इंडस्ट्री करता येत नाही. नारायणगाव परिसरात साध्या वेल्डिंग वर्कशॉप्सला परवानगी देण्यासाठी व्यावसायिकांना बराच त्रास दिला. मोबाइल नेटवर्कला घेतलेल्या आक्षेपामुळे या भागात जवळपास एक-दोन वर्षे नेटवर्क उशिरा आले. एकंदरीत जीएमआरटी प्रकल्पामुळे या भागाच्या विकासाला खीळ बसली आहे. अशा परिस्थितीत प्रादेशिक विकासाची प्रचंड क्षमता असलेला पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प या भागाच्या विकासासाठी वरदान ठरणारा होता; परंतु जीएमआरटीने उपस्थित केलेल्या आक्षेपामुळे रखडला आहे.

पुणे जिल्ह्याचा झपाट्याने होत असलेला विकास आणि नागरीकरण लक्षात घेता या भागाच्या शाश्वत विकासाचा विचार करता या रेल्वे प्रकल्पावरील आक्षेप दूर करण्यासाठी जीएमआरटीच्या शास्त्रज्ञांनी तांत्रिक तोडगा काढावा, अशी भूमिका खासदार डॉ. कोल्हे यांनी घेतली असून जीएमआरटी प्रकल्प कर्कवृत्ताच्या जवळ असणे आवश्यक असल्याने ज्या भागात लोकसंख्या विरळ आहे, अशा भागात स्थलांतरित करावा, असे खासदार डॉ. कोल्हे यांनी केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडNashikनाशिकrailwayरेल्वे