शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

Nirmala Sitharaman: त्या आल्या; पण बोलल्याच नाहीत....

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2022 13:00 IST

अर्थमंत्री निर्मला सीतारामण इंदापूर दौऱ्यावर असताना त्यांनी भाषण केले नाही...

इंदापूर : त्या आल्या, बुद्धवंदना केली. सभास्थानी आल्यानंतर भाषणांमधून त्यांच्याविषयी व्यक्त होत असणाऱ्या कृतज्ञतेबद्दल स्मित करून हात जोडत लोकभावनेची कदर केली. पण त्या एक शब्दही बोलल्या नाहीत. अवघ्या पंधरा ते वीस मिनिटात कार्यक्रम संपला. अशा प्रकारे इंदापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच दलितवस्तीत आलेल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या आजच्या दौऱ्यातील एक टप्पा संपला.

निमगाव केतकी गावाला भेट दिल्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन इंदापूर शहरात आल्या. येथील डॉ. आंबेडकरनगरमध्ये जेतवन बुद्धविहारातील बुद्धमूर्तीचे दर्शन घ्यायचे. त्यानंतर शेजारच्या सभागृहात भाजपच्या बारामती लोकसभा प्रवास योजनेच्या अनुषंगाने दुर्बल घटकांच्या प्रतिनिधीशी संवाद साधणे व त्यानंतर ललेंद्र शिंदे यांच्या घरी चहापान करणे असा त्यांचा नियोजित कार्यक्रम होता.

बुद्धवंदना झाल्यानंतर सभागृहात अर्थमंत्री सीतारामन यांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुले मंजूर असणाऱ्या लाभार्थींना प्रमाणपत्रे देण्यात आली. अन्नसुरक्षा योजनेंतर्गत अंतोदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजनेच्या लाभार्थींना धान्याचे वाटप करण्यात आले.

सीतारामन यांच्या भाषणाची कसर भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी भरून काढली. ते म्हणाले की, कोरोना व लॉकडाऊनच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी व अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नियोजन केल्यामुळे देशातील ८० कोटी गोरगरीब कुटुंबांना धान्य उपलब्ध झाले. इंदापूर नगरपरिषदेने स्वच्छता अभियानात मिळवलेल्या केंद्र व राज्यस्तरावरील पुरस्काराविषयीची माहिती त्यांनी दिली.

आ. भीमराव तापकीर यांनी प्रास्ताविक केले. रिपाइंचे शिवाजीराव मखरे यांनी मनोगत व्यक्त केले. संदीपान कडवळे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कैलास कदम, शकीलभाई सय्यद व त्यांच्या सहकाऱ्यांनी आभार मानले.

टॅग्स :PuneपुणेIndapurइंदापूरnirmala sitharamanनिर्मला सीतारामनBJPभाजपा