शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

जमीन ताब्यात घेण्यासाठी गावात लष्कराला आणणाऱ्या कर्नलवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2019 22:35 IST

गुळाणी येथे कर्नल केदार विजय गायकवाड हे ४ लष्कराच्या गाड्यांमधून 30 ते ४० जवानांना घेऊन शस्त्रासह गावात आले होते.

दावडी : राजगुरूनगर (दावडी) : खेड तालुक्यातील गुळाणी येथे एका लष्करी कर्नलने जमिनीचा ताबा घेण्यासाठी चक्क 30 ते 40 जवान आणले होते. शेतात पेरलेल्या सोयाबीन पिकामध्ये ट्रॅक्टरने नांगरणी करून नुकसान केल्यामुळे या कर्नल केदार गायकवाड याच्याविरोधात खेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

याबाबत खेड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी दिलेल्या दिलेल्या माहितीनुसार मोनिका गणेश गाडे (रा. खालुब्रे ता खेड ) यांचे नांदावे सुनील नामदेव भरणे (रा माण ता. मुळशी ) यांनी गुळाणी येथील जमीन गट नंबर २४४ असलेली जमिन सन२०१८ खरेदी करून कागदपत्रे सातबारा वरती नावे झाल्याने या या सदर या जमिनीचे मालक भरणे व गाडे आहेत. ( दि २२ ) रोजी गुळाणी येथे कर्नल केदार विजय गायकवाड हे ४ लष्कराच्या गाड्यांमधून 30 ते ४० जवानांना घेऊन शस्त्रासह गावात आले होते. गायकवाड हे त्या जवानांना घेऊन गावामध्ये रायफल्स बेकायदा जमाव जमून फिरून दहशत निर्माण होईल असे कृत्य करत होते. त्यानंतर त्यांनी सदर जवानासह गाडे व भरणे यांच्या मालकीच्या शेतात ट्रॅक्टर लावून मशागत करण्यास सुरुवात केली. परंतु त्यांच्याबरोबर असलेले लष्कराचे जवान हे शस्त्रधारी असल्याने भीतीपोटी फिर्यादीने कुठल्याही प्रकारचा विरोध अथवा प्रतिबंध केला नाही. 

शेतात पेरलेल्या सोयाबीन पिकाचे नुकसान केले. कर्नल केदार गायकवाड यांनी जमिनीमध्ये येऊ नये म्हणून गाडे व भरणे कुटुंबीयांना व गावातील लोकांमध्ये भीती निर्माण व्हावी म्हणून याकरता शस्त्रांसह लष्करी जवान आणून दहशत निर्माण केलेली आहे .याबाबत खेड पोलीस ठाण्यात मोनिका गणेश गाडे यांनी कर्नल केदार गायकवाड यांच्याविरुद्ध फिर्याद गुन्हा दाखल केल्याचे सांगितले. 

याबाबात सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुळाणी येथील परिमल विजय गायकवाड यांच्या कुटुंबातील काही व्यक्तीनी वारस हक्कांनी मिळालेली जमीन दिलीप नामदेव भरणे ( रा. मुळशी ) यांना सन २०१८ विकली होती. मात्र, गायकवाड कुटुंबियांनी ही जमीन आमची आहे म्हणून या जमिनीचा वाद दिवाणी न्यायालयात दाखल केला होता. सध्या दावा दिवाणी न्यायालयात सुरू आहे. या घटनेबाबत तक्रार दाखल न झाल्याने खेड पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था बिघडू नये याकरिता सीआरपी कलम १४९न्वे राखण्यासाठी तालुका दंडाधिकारी तथा तहसिलदार यांच्याकडे पत्र व्यवहार केला होता.

टॅग्स :PuneपुणेIndian Armyभारतीय जवान