शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
2
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
3
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
4
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
5
Rohini Acharya : "मला घाणेरड्या शिव्या दिल्या, मारायला चप्पल उचलली, आई-वडिलांना..."; रोहिणी यांची भावुक पोस्ट
6
प्यार किया तो डरना क्या! ८३ वर्षीय आजीच्या प्रेमात वेडा झाला २३ वर्षांचा तरुण, कुटुंबाने दिली साथ
7
याला म्हणतात धमाका शेअर...! फक्त 2 वर्षांत दिला 16000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल आता 5 बोनस शेअर वाटणार कंपनी
8
जैश टेरर मॉड्यूलवर मोठी कारवाई: अनंतनागमध्ये छाप्यानंतर हरियाणाची महिला डॉक्टर ताब्यात
9
अ‍ॅसिड फेकलं, छतावरुन ढकललं; 'तो' वाद टोकाला गेला, नवरा थेट बायकोच्या जीवावर उठला
10
Mumbai: वाकोला ते बीकेसी उन्नत मार्गाचे ८० टक्के काम पूर्ण; लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार!
11
गोरखपूरमध्ये उभारलं जातंय जागतिक दर्जाचे विज्ञान उद्यान; योगी सरकारने घेतला मोठा निर्णय
12
National Jamboree: ६१ वर्षांनंतर लखनौत ऐतिहासिक 'राष्ट्रीय जंबोरी'; ३२,००० हून अधिक स्काउट्स होणार सहभागी
13
घरबसल्या पैसे दुप्पट कसे होतील? तेजस्वी प्रकाशने सांगितला फॉर्म्युला, मुलींना दिला आर्थिक सल्ला
14
Mumbai: मुंबई महापालिकेच्या ३०० कोटींच्या उद्यान देखभालीच्या निविदा प्रक्रियेत संशयाच्या भोवरा
15
बिहार निवडणूक; 'या' मतदारसंघात भाजप उमेदवाराचा अवघ्या 30 मतांनी पराभव
16
IPL 2026 : रवींद्र जडेजाच्या पगारात ४ कोटींची कपात होण्यामागचं कारण काय? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
17
Tata Sierra आता नव्या रुपता! मिळणार ट्रिपल स्क्रीन सेटअप अन् अ‍ॅडव्हॉन्स फीचर्स, किती असेल किंमत? जाणून घ्या सविस्तर
18
BMC Election: सर्वपक्षीय १२८ माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेला पालिकेत हव्या १२५ जागा!
19
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: कसे कराल व्रत? शिवशंकर देतील शुभाशिर्वाद, कल्याण-मंगलच होणार!
20
Cyber Security: सर्वांचा डेटा आता होणार सुरक्षित, पुढील १८ महिन्यांत नियम आणखी कडक होणार!
Daily Top 2Weekly Top 5

जमीन ताब्यात घेण्यासाठी गावात लष्कराला आणणाऱ्या कर्नलवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2019 22:35 IST

गुळाणी येथे कर्नल केदार विजय गायकवाड हे ४ लष्कराच्या गाड्यांमधून 30 ते ४० जवानांना घेऊन शस्त्रासह गावात आले होते.

दावडी : राजगुरूनगर (दावडी) : खेड तालुक्यातील गुळाणी येथे एका लष्करी कर्नलने जमिनीचा ताबा घेण्यासाठी चक्क 30 ते 40 जवान आणले होते. शेतात पेरलेल्या सोयाबीन पिकामध्ये ट्रॅक्टरने नांगरणी करून नुकसान केल्यामुळे या कर्नल केदार गायकवाड याच्याविरोधात खेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

याबाबत खेड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी दिलेल्या दिलेल्या माहितीनुसार मोनिका गणेश गाडे (रा. खालुब्रे ता खेड ) यांचे नांदावे सुनील नामदेव भरणे (रा माण ता. मुळशी ) यांनी गुळाणी येथील जमीन गट नंबर २४४ असलेली जमिन सन२०१८ खरेदी करून कागदपत्रे सातबारा वरती नावे झाल्याने या या सदर या जमिनीचे मालक भरणे व गाडे आहेत. ( दि २२ ) रोजी गुळाणी येथे कर्नल केदार विजय गायकवाड हे ४ लष्कराच्या गाड्यांमधून 30 ते ४० जवानांना घेऊन शस्त्रासह गावात आले होते. गायकवाड हे त्या जवानांना घेऊन गावामध्ये रायफल्स बेकायदा जमाव जमून फिरून दहशत निर्माण होईल असे कृत्य करत होते. त्यानंतर त्यांनी सदर जवानासह गाडे व भरणे यांच्या मालकीच्या शेतात ट्रॅक्टर लावून मशागत करण्यास सुरुवात केली. परंतु त्यांच्याबरोबर असलेले लष्कराचे जवान हे शस्त्रधारी असल्याने भीतीपोटी फिर्यादीने कुठल्याही प्रकारचा विरोध अथवा प्रतिबंध केला नाही. 

शेतात पेरलेल्या सोयाबीन पिकाचे नुकसान केले. कर्नल केदार गायकवाड यांनी जमिनीमध्ये येऊ नये म्हणून गाडे व भरणे कुटुंबीयांना व गावातील लोकांमध्ये भीती निर्माण व्हावी म्हणून याकरता शस्त्रांसह लष्करी जवान आणून दहशत निर्माण केलेली आहे .याबाबत खेड पोलीस ठाण्यात मोनिका गणेश गाडे यांनी कर्नल केदार गायकवाड यांच्याविरुद्ध फिर्याद गुन्हा दाखल केल्याचे सांगितले. 

याबाबात सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुळाणी येथील परिमल विजय गायकवाड यांच्या कुटुंबातील काही व्यक्तीनी वारस हक्कांनी मिळालेली जमीन दिलीप नामदेव भरणे ( रा. मुळशी ) यांना सन २०१८ विकली होती. मात्र, गायकवाड कुटुंबियांनी ही जमीन आमची आहे म्हणून या जमिनीचा वाद दिवाणी न्यायालयात दाखल केला होता. सध्या दावा दिवाणी न्यायालयात सुरू आहे. या घटनेबाबत तक्रार दाखल न झाल्याने खेड पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था बिघडू नये याकरिता सीआरपी कलम १४९न्वे राखण्यासाठी तालुका दंडाधिकारी तथा तहसिलदार यांच्याकडे पत्र व्यवहार केला होता.

टॅग्स :PuneपुणेIndian Armyभारतीय जवान