शहरं
Join us  
Trending Stories
1
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
2
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
3
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
4
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
5
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
7
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
8
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात
9
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
10
Satish Shah Death: 'साराभाई वर्सेस साराभाई' फेम अभिनेते सतीश शाह यांचं निधन, ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
12
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
13
Virat Kohli: वनडे + टी-२० मध्ये सर्वाधिक धावा; कोहलीच्या डोक्यावर ताज, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
14
मुंबईत शिंदेसेना फक्त ६५ ते ७० जागाच लढवणार?; भाजपानं कंबर कसली, 'अबकी बार १५० पार'चा नारा
15
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास
16
कोण आहे सतीश शाह यांची पत्नी? दोघांना नव्हते मूल; जोडीदाराच्या निधनाने बसला धक्का
17
सामनावीर अन् मालिकावीर! रोहित शर्मा दुहेरी सन्मानावर म्हणाला- "मालिका हरलो असलो तरीही..."
18
Virat Kohli: 'रन मशीन' विराटची गगनभरारी! संगकाराला पछाडलं, आता फक्त सचिन तेंडुलकर पुढे
19
IND vs AUS: रोहितच्या सेंच्युरीसह किंग कोहलीची फिफ्टी; ऑस्ट्रेलिया विरुद्ध अखेरच्या वनडेत अविस्मरणीय शो!
20
मंगळ गोचर २०२५: २७ ऑक्टोबर रोजी मंगळ गोचर; पुढचे दोन महिने 'या' ५ राशींसाठी असणार खास!

Hadapsar Vidhan Sabha 2024: राज्यातील पाचवा सर्वात कमी मतदानाचा मतदारसंघ; हडपसरमध्ये केवळ ५०.११ टक्के नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2024 13:56 IST

हडपसर मतदारसंघात २०१९ मध्ये ४७.२३ टक्के मतदान झाले होते, त्या तुलनेत यंदा केवळ २.८८ टक्क्यांची वाढ झाली

पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (दि. २०) झालेल्या मतदानात मुंबई व पुणे जिल्ह्यात सर्वात कमी मतदानाची नोंद झाली. मात्र, राज्यातील पाचव्या सर्वात कमी मतदानाची नोंद पुण्यातील हडपसर मतदारसंघात झाली. अर्थातच हडपसर मतदारसंघातील ५०.११ टक्के मतदान जिल्ह्यातीलही सर्वात कमी ठरले. राज्यात सर्वात कमी मतदानात सहाव्या क्रमांकावर शिवाजीनगर मतदारसंघ आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत सर्वात कमी ४३.४३ टक्के मतदान पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात झाले होते.

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात बुधवारी मतदान झाले. त्यात सरासरी ६५.११ टक्के मतदानाची नोंद झाली, तर सर्वात कमी मतदान मुंबई शहर जिल्ह्यात ५२.०७, तर मुंबई उपनगर जिल्ह्यात ५५.७७ टक्के झाले. तर ठाण्यात ५६.०५ टक्के मतदान नोंदविण्यात आले. त्यानंतर पुणे जिल्ह्याचा क्रमांक असून, जिल्ह्यात ६१.०५ टक्के सरासरी मतदान झाले. मतदानाची ही आकडेवारी केवळ ईव्हीएमद्वारे झालेल्या मतांची असून, त्यात पोस्टल मतांची भर घातली जाणार आहे. त्यामुळे मतदानाचा टक्का आणखी वाढणार आहे. मात्र, त्यात फारशी वाढ होणार नाही, असे जिल्हा प्रशासनाचे म्हणणे आहे.

जिल्ह्यातील मतदानाच्या आकडेवारीनुसार सर्वात कमी मतदान हडपसर मतदारसंघात ५०.११ टक्के झाले आहे. राज्यातील हे मतदान पाचवे सर्वात कमी मतदान ठरले आहे. राज्यात सर्वात कमी मतदान कुलाबा मतदारसंघात ४४.४९ टक्के झाले आहे. त्याखालोखाल भिवंडी पूर्व ४९.२०, धारावी ४९.७०, चांदिवली ५०.०७ टक्के मतदान झाले आहे, तर सहाव्या क्रमांकावर पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर मतदारसंघ आहे. येथेही हडपसरपेक्षा थोडे जास्त अर्थात ५०.९० टक्के मतदान झाले आहे.

हडपसर मतदारसंघात २०१९ मध्ये ४७.२३ टक्के मतदान झाले होते. त्या तुलनेत यंदा केवळ २.८८ टक्क्यांची वाढ झाली आहे. मात्र, २००९ मध्ये मतदारसंघ पुनर्रचनेतून तयार झालेल्या या मतदारसंघात २००९ मध्येही ४५.४२ टक्केच मतदान नोंदविण्यात आले होते. त्यानंतर झालेल्या २०१४च्या निवडणुकीत मात्र, ५२.३५ टक्के मतदान झाले होते. यंदाच्या निवडणुकीत सहाव्या क्रमांकावर असलेल्या शिवाजीनगर मतदारसंघात २०१४चा अपवाद वगळता २००९ व २०१९ मध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी मतदान झाले होते. शिवाजीनगर मतदारसंघात २००९ मध्ये ४२.८५, २०१४ मध्ये ५१.९५, तर २०१९ मध्ये ४३.८६ टक्के मतदान झाले होते.

केंद्रीय निवडणूक आयोगाने शहरी मतदारांची अनास्था ही मतदानाची टक्केवारी घटण्यास कारणीभूत ठरत असल्याचे म्हटले होते. मतदान कमी झालेल्या शहरी भागांमध्ये प्रामुख्याने मुंबई, ठाणे व पुणे शहरांचा समावेश आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार मतदारांची जागृती, मतदार याद्यांचे शुद्धीकरण, मतदान केंद्रांची सुसूत्रता याचे नियोजन करण्यात आले. त्यामुुळे गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेतही मतदान जास्त झाल्याचे जिल्हा प्रशासनाचे म्हणणे आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४hadapsar-acहडपसरChetan Tupeचेतन तुपेAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवार