शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

Hadapsar Vidhan Sabha 2024: राज्यातील पाचवा सर्वात कमी मतदानाचा मतदारसंघ; हडपसरमध्ये केवळ ५०.११ टक्के नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2024 13:56 IST

हडपसर मतदारसंघात २०१९ मध्ये ४७.२३ टक्के मतदान झाले होते, त्या तुलनेत यंदा केवळ २.८८ टक्क्यांची वाढ झाली

पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (दि. २०) झालेल्या मतदानात मुंबई व पुणे जिल्ह्यात सर्वात कमी मतदानाची नोंद झाली. मात्र, राज्यातील पाचव्या सर्वात कमी मतदानाची नोंद पुण्यातील हडपसर मतदारसंघात झाली. अर्थातच हडपसर मतदारसंघातील ५०.११ टक्के मतदान जिल्ह्यातीलही सर्वात कमी ठरले. राज्यात सर्वात कमी मतदानात सहाव्या क्रमांकावर शिवाजीनगर मतदारसंघ आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत सर्वात कमी ४३.४३ टक्के मतदान पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात झाले होते.

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात बुधवारी मतदान झाले. त्यात सरासरी ६५.११ टक्के मतदानाची नोंद झाली, तर सर्वात कमी मतदान मुंबई शहर जिल्ह्यात ५२.०७, तर मुंबई उपनगर जिल्ह्यात ५५.७७ टक्के झाले. तर ठाण्यात ५६.०५ टक्के मतदान नोंदविण्यात आले. त्यानंतर पुणे जिल्ह्याचा क्रमांक असून, जिल्ह्यात ६१.०५ टक्के सरासरी मतदान झाले. मतदानाची ही आकडेवारी केवळ ईव्हीएमद्वारे झालेल्या मतांची असून, त्यात पोस्टल मतांची भर घातली जाणार आहे. त्यामुळे मतदानाचा टक्का आणखी वाढणार आहे. मात्र, त्यात फारशी वाढ होणार नाही, असे जिल्हा प्रशासनाचे म्हणणे आहे.

जिल्ह्यातील मतदानाच्या आकडेवारीनुसार सर्वात कमी मतदान हडपसर मतदारसंघात ५०.११ टक्के झाले आहे. राज्यातील हे मतदान पाचवे सर्वात कमी मतदान ठरले आहे. राज्यात सर्वात कमी मतदान कुलाबा मतदारसंघात ४४.४९ टक्के झाले आहे. त्याखालोखाल भिवंडी पूर्व ४९.२०, धारावी ४९.७०, चांदिवली ५०.०७ टक्के मतदान झाले आहे, तर सहाव्या क्रमांकावर पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर मतदारसंघ आहे. येथेही हडपसरपेक्षा थोडे जास्त अर्थात ५०.९० टक्के मतदान झाले आहे.

हडपसर मतदारसंघात २०१९ मध्ये ४७.२३ टक्के मतदान झाले होते. त्या तुलनेत यंदा केवळ २.८८ टक्क्यांची वाढ झाली आहे. मात्र, २००९ मध्ये मतदारसंघ पुनर्रचनेतून तयार झालेल्या या मतदारसंघात २००९ मध्येही ४५.४२ टक्केच मतदान नोंदविण्यात आले होते. त्यानंतर झालेल्या २०१४च्या निवडणुकीत मात्र, ५२.३५ टक्के मतदान झाले होते. यंदाच्या निवडणुकीत सहाव्या क्रमांकावर असलेल्या शिवाजीनगर मतदारसंघात २०१४चा अपवाद वगळता २००९ व २०१९ मध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी मतदान झाले होते. शिवाजीनगर मतदारसंघात २००९ मध्ये ४२.८५, २०१४ मध्ये ५१.९५, तर २०१९ मध्ये ४३.८६ टक्के मतदान झाले होते.

केंद्रीय निवडणूक आयोगाने शहरी मतदारांची अनास्था ही मतदानाची टक्केवारी घटण्यास कारणीभूत ठरत असल्याचे म्हटले होते. मतदान कमी झालेल्या शहरी भागांमध्ये प्रामुख्याने मुंबई, ठाणे व पुणे शहरांचा समावेश आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार मतदारांची जागृती, मतदार याद्यांचे शुद्धीकरण, मतदान केंद्रांची सुसूत्रता याचे नियोजन करण्यात आले. त्यामुुळे गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेतही मतदान जास्त झाल्याचे जिल्हा प्रशासनाचे म्हणणे आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४hadapsar-acहडपसरChetan Tupeचेतन तुपेAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवार