शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

बळीराजा चिंतेत; राज्यात अनेक ठिकाणी पेरण्या खोळंबल्या, शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2022 12:08 IST

राज्यातील मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात चांगल्या व सर्वदूर पावसाची प्रतीक्षा

पुणे : राज्यात विशेषत: कोकण व विदर्भात चांगला पाऊस होत असला तरी मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात चांगल्या व सर्वदूर पावसाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पेरण्या खोळंबल्या असून शेतकरी चिंतेत पडला आहे. येत्या चार दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी मध्यम ते चांगल्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तर कोकणात काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडेल.

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पालघर, ठाणे, मुंबईत येत्या तीन दिवसात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर मध्य महाराष्ट्रात बहुतांश जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्याच्या घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

राज्यात गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजपर्यंत झालेला पाऊस (मिमीमध्ये) : डहाणू ३० मिमी, कोल्हापूर ८, महाबळेश्वर २५, पुणे २, सातारा ३, यवतमाळ ५ , ब्रह्मपुरी २, अमरावती १.

शहरात काही भागात पाऊस

पुण्यात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारी काही काळ उन्हाचा चटका वाढल्यानंतर दुपारनंतर हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या. काही भागात त्याचा जोर जास्त होता. अक्षय मेझरमेंट या खासगी संस्थेने केलेल्या नोंदीनुसार कात्रज परिसरात ८.४ तर खडकवासला परिसरात ५.८ मिमी पाऊस झाला.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊसWaterपाणीDamधरणMaharashtraमहाराष्ट्र