शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

शेतीला आवर्तन न मिळाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या   

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2018 8:11 PM

जलसंपदा विभागाकडून शेतीसाठी वेळेवर पाणी मिळत नसल्याच्या कारणावरून इंदापूर अर्बन बँकेचे विद्यामन संचालक व शेतकरी वसंत सोपाना पवार (वय ४८, रा. बेलवाडी) यांनी  विहिरीमध्ये उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना घडली.

पुणे -  जलसंपदा विभागाकडून शेतीसाठी वेळेवर पाणी मिळत नसल्याच्या कारणावरून इंदापूर अर्बन बँकेचे विद्यामन संचालक व शेतकरी वसंत सोपाना पवार (वय ४८, रा. बेलवाडी) यांनी  विहिरीमध्ये उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना घडली. आत्महत्या करण्यापूर्वी पवार यांनी दोन चिठ्या लिहून ठेवल्या असून आत्महत्येस जबाबदार असणाºयावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. यामध्ये जलसंपदाचे राज्यमंत्री विजय शिवतारे व पालकमंत्री गिरीष बापट यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. 

वालचंदनगर पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार वसंत पवार यांचे लासुर्णेमध्ये हार्डवेअर व शेतीसाठी लागणाºया रासायनिक खतांचे दुकान आहे. लासुर्णे व बेलवाडी परिसरामध्ये त्यांची शेती आहे. शनिवारी (दि. २१) रोजी लासुर्णे येथील दुकानबंद केल्यानंतर घरी गेलेच नव्हते. घरातील नागरिकांनी रात्रभर शोध घेतला. मात्र, त्यांचा शोध लागला नव्हता. रविवारी (दि. २२)रोजी सकाळी त्यांचा मृतदेह बेलवाडी गावच्या हद्दीतील जामदारवस्ती जवळील विहिरीमध्ये पाण्यावरती तरंगत असल्याचा आढळून आला. वालचंदनगर पोलिसांनी तातडीने मृतदेह पाण्यातुन बाहेर काढल्यानंतर त्यांच्या खिशामध्ये दोन चिठ्ठया आढळल्या आहेत. यामध्ये गेल्या दोन वर्षांपासून उन्हाळ्यामध्ये शेतीसाठी कालव्याचे पाणी मिळाले नसल्यामुळे पिके जळाल्यामुळे आर्थिक अडचणीमध्ये वाढ झाल्याने कर्जबाजारी पणामुळे आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून तपास वालचंदनगर पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक उत्तम भजनावळे यांच्या मार्गदर्शनाखाली साहय्यक फौजदार शिवाजी होले,महेंद्र फणसे करीत आहेत. 

मंत्र्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी 

 नीरा डाव्या कालव्यातून गेल्या वर्षी व य वर्षी उन्हाळी हंगामचे पाणी वेळेत न मिळाल्यामुळे आत्महत्येस जबाबदार असणारे जलसंपदा विभागाचे राज्यमंत्री विजय शिवतारे व पुणे जिल्हाचे पालकमंत्री गिरीष बापट यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी पवार यांनी मृत्यूपूर्वी चिठ्ठीमध्ये लिहून ठेवली आहे.

सरकारच्या विरोधात आवाज उठवावा 

माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, पंचायत समिती सदस्य अ‍ॅड. हेमंतराव नरुटे, कर्मयोगीचे संचालक वसंत मोहोळकर,मार्केट कमिटीचे माजी संचालक अनिल पवार,  दुधगंगाचे माजी अध्यक्ष शहाजी शिंदे, उपसरपंच प्रकाश चव्हाण यांनी शेतीसाठी पाणी प्रश्नावरून सरकारच्या विरोधात आवाज उठवून कुंटूबाला न्याय मिळवून देण्याची प्रयत्न करावा असे वसंत पवार यांनी मृत्यूपूर्वी चिठ्ठीमध्ये लिहून ठेवले आहे.

रास्ता रोकोचा दिला होता इशारा 

जलसंपदा विभागाच्या भोंगळ कारभरामुळे निरा डाव्या कालव्यातुन उन्हाळी पाण्याचे आवर्तन मिळण्यास विलंब होत असल्यामुळे वसंत पवार व परिसरातील शेतक-यांनी १३ एप्रिल रोजी लासुर्णे जवळील चिखली फाटा येथे ४२ व ४३ क्रमांकाच्या वितरिकेस पाणी सोडण्यासाठी रास्तारोको आंदोलनाचा इशारा दिला होता. जलसंपदा विभागाच्या अधिका-यांनी ४२ व ४३ क्रमांकांच्या वितरिकेस १७ व १९ एप्रिल रोजी पाणी सोडण्याचे आश्वासन दिले होते.परंतु अद्याप या दोन्हीही वितरिकेस पाणी सोडण्यात आलेले नाही. यामुळे या परीसरातील सात हजार एकरातील पिके जळण्याच्या  मार्गावर आहेत.

 पवार यांनी मृत्यूपूर्वी लिहलेल्या दोन चिठ्ठ्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत. या चिठ्ठ्यांमध्ये आत्महत्येस मंत्र्यांना जबाबदार धरावे, असा उल्लेख आहे. या आत्महत्येबाबत योग्या ती काळजी  घेऊन तपास करण्यात येत आहे. 

- उत्तम भजनावळे, सहायक पोलिस निरिक्षक, वालचंदनगर पोलिस ठाणे

टॅग्स :FarmerशेतकरीSuicideआत्महत्याPuneपुणेagricultureशेतीWaterपाणी